शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पक्ष संघटनेसाठी कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 9:49 PM

भाजप सरकारने सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याशिवाय गावागावात जावून जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घ्या.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

आॅनलाईन लोकमतभंडारा : भाजप सरकारने सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याशिवाय गावागावात जावून जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घ्या. जनतेच्या समस्या निराकरणासाठी रस्त्यावर येऊन सरकारचे हे अपयश जनतेच्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेता तथा खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी केले.भंडारा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरिक्षकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी आमदार अनिल बावनकर, दिलीप बन्सोड, प्रदेश सचिव धनंजय दलाल, विजय शिवणकर नरेश माहेश्वरी, दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, मजूर संघाचे अध्यक्ष कैलाश नशिने, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, अभिषेक कारेमारे, कल्याणी भुरे उपस्थित होते.यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, भंडारा विधानसभा क्षेत्रात ४५५ बुथ आहेत. प्रत्येक बुथची जबाबदारी स्वतंत्ररित्या निरिक्षकांना देण्यात येत आहे. त्या निरिक्षकावर त्या-त्या गावाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निरिक्षकांनी गावातील जनतेच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतले पाहिजे. जनतेच्या समस्या निराकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पक्ष संघटनवाढीसाठी तळागाळातील जनतेच्या मदतीसाठी धावून जावून त्या समस्या सोडवा, असे सांगून बुथ निरीक्षकांचा आढावा आपण स्वत: दर महिन्याला घेणार असल्याचे आवर्जुन सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे आदींनी मार्गदर्शन केले. बैठकीचे संचालन धनंजय दलाल यांनी केले.