शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

नावीन्यपूर्ण संकल्पनेतून स्वच्छतेचे कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:32 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या बाकी आहेत.

ठळक मुद्देरवींद्र जगताप : भंडारा येथे स्वच्छ शक्ती दिवस कार्यक्रम, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या बाकी आहेत. त्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन हा विषय आहे. स्थानिक स्तरावर घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करून शाश्वत स्वच्छतेचे चक्र पूर्ण करायचे आहे. याकरिता विविध क्षेत्रातील महिलांनी नाविण्यपूर्ण कल्पनांचा वापर करून स्वच्छतेचे कार्य अधिक तेज गतीने निरंतरपणे करीत राहावे असे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने स्वच्छ शक्ती दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, विस्तार अधिकारी वर्मा यांची उपस्थिती होती.सीईओ जगताप म्हणाले, देशभरात स्वच्छतेचे कार्य करणाºया लोकांनी केलेल्या स्वच्छतेच्या कार्यामधून ३ लाख लोकांचे जीव वाचविल्याचे सिध्द झाले आहे. ग्रामस्तरावर १४ व्या वित्त आयोगामाधून घनकचरा व्यवस्थापनासाठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता गावात घनकचºयाचे व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करता येणार आहे. बायोगॅस प्लॉन्टच्या माध्यमातून त्यावर प्रक्रीया करून त्याचा खत म्हणून उपयोगात आणता येणार आहे. स्वच्छतेची पहिली पायरी झाली आहे. स्वच्छतेचे हे चक्र पूर्ण करण्यासाठी स्थानिकस्तरावर महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.शासनाने वैयक्तिक शौचालय मंजूर केले आहेत. ही शौचालये ३१ जानेवारी पर्यंत बांधून घ्यायची होती, परंतू त्यांचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेली नाहीत. पुन्हा त्यांना मुदतवाढ मिळाली असून आता फेब्रुवारी २०१९ अखेरपर्यंत शौचालयाचे बांधकाम करता येणार आहेत. त्यामुळे सरपंचांनी या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देवून गावात नागरिकांना तातडीने शौचालयाचे निमार्णासाठी प्रबोधन करावे, असे आवाहनही जगताप यांनी केले.यावेळी हरीयाना राज्यात कुरूक्षेत्रमध्ये महिलांचे राज्यस्तरीय महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. सीईईओ जगताप यांच्यासह जिल्ह्यातील महिला सरपंचांनी मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतला.त्यानंतर जिल्ह्यतील स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या महिला सरपंच, महिला स्वच्छता गृही, बचतगटाच्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, अबाधा फाऊंडेशन तुमसर, हेल्पींग हॅण्ड फाऊंडेशन माडगी, असर फाऊंडेशन कलासंच, सरस्वती आदिवासी महिला गृप लोहारा तसेच पंचायत समितीस्तरावर कार्यरत पाणी व स्वच्छता केंद्राचे गट समन्वयक व समुह समन्वयक यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप यांच्या हस्ते स्वच्छ शक्ती पुरस्काराचे प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. संचालन व आभार राजेश येरणे यांनी मानले.