शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

नावीन्यपूर्ण संकल्पनेतून स्वच्छतेचे कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:32 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या बाकी आहेत.

ठळक मुद्देरवींद्र जगताप : भंडारा येथे स्वच्छ शक्ती दिवस कार्यक्रम, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या बाकी आहेत. त्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन हा विषय आहे. स्थानिक स्तरावर घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करून शाश्वत स्वच्छतेचे चक्र पूर्ण करायचे आहे. याकरिता विविध क्षेत्रातील महिलांनी नाविण्यपूर्ण कल्पनांचा वापर करून स्वच्छतेचे कार्य अधिक तेज गतीने निरंतरपणे करीत राहावे असे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने स्वच्छ शक्ती दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, विस्तार अधिकारी वर्मा यांची उपस्थिती होती.सीईओ जगताप म्हणाले, देशभरात स्वच्छतेचे कार्य करणाºया लोकांनी केलेल्या स्वच्छतेच्या कार्यामधून ३ लाख लोकांचे जीव वाचविल्याचे सिध्द झाले आहे. ग्रामस्तरावर १४ व्या वित्त आयोगामाधून घनकचरा व्यवस्थापनासाठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता गावात घनकचºयाचे व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करता येणार आहे. बायोगॅस प्लॉन्टच्या माध्यमातून त्यावर प्रक्रीया करून त्याचा खत म्हणून उपयोगात आणता येणार आहे. स्वच्छतेची पहिली पायरी झाली आहे. स्वच्छतेचे हे चक्र पूर्ण करण्यासाठी स्थानिकस्तरावर महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.शासनाने वैयक्तिक शौचालय मंजूर केले आहेत. ही शौचालये ३१ जानेवारी पर्यंत बांधून घ्यायची होती, परंतू त्यांचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेली नाहीत. पुन्हा त्यांना मुदतवाढ मिळाली असून आता फेब्रुवारी २०१९ अखेरपर्यंत शौचालयाचे बांधकाम करता येणार आहेत. त्यामुळे सरपंचांनी या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देवून गावात नागरिकांना तातडीने शौचालयाचे निमार्णासाठी प्रबोधन करावे, असे आवाहनही जगताप यांनी केले.यावेळी हरीयाना राज्यात कुरूक्षेत्रमध्ये महिलांचे राज्यस्तरीय महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. सीईईओ जगताप यांच्यासह जिल्ह्यातील महिला सरपंचांनी मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतला.त्यानंतर जिल्ह्यतील स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या महिला सरपंच, महिला स्वच्छता गृही, बचतगटाच्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, अबाधा फाऊंडेशन तुमसर, हेल्पींग हॅण्ड फाऊंडेशन माडगी, असर फाऊंडेशन कलासंच, सरस्वती आदिवासी महिला गृप लोहारा तसेच पंचायत समितीस्तरावर कार्यरत पाणी व स्वच्छता केंद्राचे गट समन्वयक व समुह समन्वयक यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप यांच्या हस्ते स्वच्छ शक्ती पुरस्काराचे प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. संचालन व आभार राजेश येरणे यांनी मानले.