शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नावीन्यपूर्ण संकल्पनेतून स्वच्छतेचे कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:32 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या बाकी आहेत.

ठळक मुद्देरवींद्र जगताप : भंडारा येथे स्वच्छ शक्ती दिवस कार्यक्रम, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या बाकी आहेत. त्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन हा विषय आहे. स्थानिक स्तरावर घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करून शाश्वत स्वच्छतेचे चक्र पूर्ण करायचे आहे. याकरिता विविध क्षेत्रातील महिलांनी नाविण्यपूर्ण कल्पनांचा वापर करून स्वच्छतेचे कार्य अधिक तेज गतीने निरंतरपणे करीत राहावे असे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने स्वच्छ शक्ती दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, विस्तार अधिकारी वर्मा यांची उपस्थिती होती.सीईओ जगताप म्हणाले, देशभरात स्वच्छतेचे कार्य करणाºया लोकांनी केलेल्या स्वच्छतेच्या कार्यामधून ३ लाख लोकांचे जीव वाचविल्याचे सिध्द झाले आहे. ग्रामस्तरावर १४ व्या वित्त आयोगामाधून घनकचरा व्यवस्थापनासाठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता गावात घनकचºयाचे व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करता येणार आहे. बायोगॅस प्लॉन्टच्या माध्यमातून त्यावर प्रक्रीया करून त्याचा खत म्हणून उपयोगात आणता येणार आहे. स्वच्छतेची पहिली पायरी झाली आहे. स्वच्छतेचे हे चक्र पूर्ण करण्यासाठी स्थानिकस्तरावर महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.शासनाने वैयक्तिक शौचालय मंजूर केले आहेत. ही शौचालये ३१ जानेवारी पर्यंत बांधून घ्यायची होती, परंतू त्यांचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेली नाहीत. पुन्हा त्यांना मुदतवाढ मिळाली असून आता फेब्रुवारी २०१९ अखेरपर्यंत शौचालयाचे बांधकाम करता येणार आहेत. त्यामुळे सरपंचांनी या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देवून गावात नागरिकांना तातडीने शौचालयाचे निमार्णासाठी प्रबोधन करावे, असे आवाहनही जगताप यांनी केले.यावेळी हरीयाना राज्यात कुरूक्षेत्रमध्ये महिलांचे राज्यस्तरीय महिला संमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. सीईईओ जगताप यांच्यासह जिल्ह्यातील महिला सरपंचांनी मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतला.त्यानंतर जिल्ह्यतील स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या महिला सरपंच, महिला स्वच्छता गृही, बचतगटाच्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, अबाधा फाऊंडेशन तुमसर, हेल्पींग हॅण्ड फाऊंडेशन माडगी, असर फाऊंडेशन कलासंच, सरस्वती आदिवासी महिला गृप लोहारा तसेच पंचायत समितीस्तरावर कार्यरत पाणी व स्वच्छता केंद्राचे गट समन्वयक व समुह समन्वयक यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप यांच्या हस्ते स्वच्छ शक्ती पुरस्काराचे प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. संचालन व आभार राजेश येरणे यांनी मानले.