पाण्यासाठी महिलाचा मोर्चा धडकला पवनी पालिकेवर
By Admin | Updated: May 20, 2016 00:43 IST2016-05-20T00:43:23+5:302016-05-20T00:43:23+5:30
कमी पाणी पुरवठा, पाणी पुरवठा वेळेत बदल करावा आदी समस्येकरीता डॉ.आंबेडकर चौक व सोमवारी वॉर्डातील संतप्त महिलांनी नगरपरीषदेत धडक दिली.

पाण्यासाठी महिलाचा मोर्चा धडकला पवनी पालिकेवर
पाणीटंचाई : समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा
पवनी : कमी पाणी पुरवठा, पाणी पुरवठा वेळेत बदल करावा आदी समस्येकरीता डॉ.आंबेडकर चौक व सोमवारी वॉर्डातील संतप्त महिलांनी नगरपरीषदेत धडक दिली. या महिलांनी १५ दिवसात समस्या सुटली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या वॉर्डात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग राहत आहे. त्यामुळे घरातील बहूतेक सर्व लोक दिवसभर कामावर जातात. या वॉर्डात नगरपालिका दुपारी २ ते २.३० वेळेत नळांना पाणी पुरवठा करते. दुपारच्या या तीव्र उन्हात मोठ्या संख्येतील कुटुंबांना या पाणी पुरवठ्याच्या वेळेमुळे पाण्यासून वंचित राहावे लागत आहे. तसेच या वॉर्डांना इतर वॉर्डाच्या तुलनेत फारच कमी वेळ पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे येथील जनतला कमी पाणी मिळते. या वॉर्डात मोठ्या प्रमाणात टिल्लू पंप लावण्यात येत असल्यामुळे इतरांना पाणी कमी येते. तरीही नगर पालिकेकडून काहीही कार्यवाही करीत नाही.
त्यामुळे या वार्डातील संतप्त महिलांनी नगर पालिकेमध्ये धडक देवून पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करून सकाळी किंवा सायंकाळी पाणी पुरवठा करावा. कमी पाणी पुरवठा होत असल्यामुळे पुरवठा वेळ वाढवून द्यावा आदी मागण्या या महिला करीता होत्या.
याची सूचना कर्मचाऱ्यांनी नगर पालिका पदाधिकाऱ्यांना दिल्यामुळे न.प. उपाध्यक्ष डॉ.विजय ठक्कर नगर पालिका सदस्य भाष्कर उरकुडकर, नगर पालिका पाणी पुरवठा प्रमुख हे नगर पालिका मध्ये दाखल होताच या संतप्त महिलांनी आपल्या समस्या सांगून मागण्यांचे निवेदन या पदाधिकाऱ्यांना देवून १५ दिवसात समस्या सुटली नाही तर आंदोलनाचा ईशारा दिला. याप्रसंगी डॉ.विजय ठक्कर यांनी १५ दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी मिना बावनकर, मोनाली वानखेडे, उषा तलमले, वंदना दडवे, अर्चना दडवे, छाया करकाडे, निशा गणात्रा, कामीनी करकाडे, विशाखा गजभिये, रजनी करकाडे, जयश्री बोदेले, सुरेखा गजभिये, सरुबाई शेंडे, शिवकन्या रामटेके, उज्वला मोटघरे, छाया रामटेके, शशिकला शेंडे, वैशाली सुखदेवे, लिला दडवे, अर्चना सुर्यवंशी, मंगला जांभुळकर, वनीता बावनकर, अर्चना करकाडे, सुवर्णा भांबोरे, मंगला फुलबांधे, पुष्पा सुर्यवंशी, गिता करकाडे, सीमा मेश्राम, सिता मुळे, आशा करकाडे, मिरा उपरीकर, माया वासनीक, उषा नागोसे, देवका करकाडे, वानखेडे, भावना दडवे, शिल्पा करकाडे, शालू दडवे, मंजू करकाडे, मीना मुळे, शेंडे, संतोषी तलमले, आशा तलमले, नंदा मुंडले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. (शहर प्रतिनिधी)