सायबर गुन्ह्यांसंदर्भात महिलांनी सतर्क रहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:25+5:30
जिल्हा माहिती कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सेफ वूमन व महिला सुरक्षा’ या विषयावर येथील सामाजिक न्याय भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माहिती कार्यालयाचे सुनीलदत्त जांभुळे, रंजना खोब्रागडे, अरुणा बांते, पडोळे उपस्थित होते.

सायबर गुन्ह्यांसंदर्भात महिलांनी सतर्क रहावे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत. विशेषत: महिला व बालकांविरूद्धच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. इंटरनेटच्या मदतीने महिलांचे लैगिंक शोषन, फसवणूक आदी गुन्हे घडत आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यासंदर्भात महिलांनी अधिक सतर्क व जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. अशी फसवणूक होत असल्यास तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मृणालिनी वंजारी यांनी येथे केले.
जिल्हा माहिती कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सेफ वूमन व महिला सुरक्षा’ या विषयावर येथील सामाजिक न्याय भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माहिती कार्यालयाचे सुनीलदत्त जांभुळे, रंजना खोब्रागडे, अरुणा बांते, पडोळे उपस्थित होते. मृणालिनी वंजारी म्हणाल्या, हैदराबाद प्रकरण तसेच निर्भया हत्याकांडासारखे गुन्हे समाजात होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. इंटरनेटचा सतत वापर केल्याने मुलांमध्ये हिंसक भावना निर्माण होत असून मुलांना अशा विकृत मानसिकतेपासून पालकांनी परावृत्त करावे तरच अशा घटना घडणार नाही. समाजाची मुली व महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. योग्य व्यासपीठ न मिळाल्याने ग्रामीण भागातील मुली मागे राहतात. अशा मुलींना सायबर गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते.
पालकांनी मुला-मुलींमध्ये भेदभाव करू नये, महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदीप काठोळे यांनी महिलांनी कुटुंबात चांगले संस्कार करण्याचे आवाहन केले. आभार रंजना खोब्रागडे यांनी मानले.
पतीला परमेश्वर न समजता बेस्ट फ्रेंड समजा
आजच्या परिस्थितीत महिलांनी पती परमेश्वर न समजता बेस्ट फ्रेंड समजावे. त्यामुळे त्यांच्यात असलेले गैरसमज दूर होईल. कुटुंबात पुरूष, महिला समानतेचे संस्कार रूजवावे, महिलांनी स्वयंसंरक्षणासाठी महिलांनी अभ्यास करावा. अत्याचार प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, निर्भिडपणा शासन अलर्ट आहे. तसेच खोटी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल होवू शकतो. कायद्याचा गैरवापर टाळा, असे मृणालिनी वंजारी यांनी सांगितले.