शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

मोहाडीत महिलांची पाण्यासाठी होतेय भटकंती; प्रशासनाने नियोजन न केल्याने पाणी टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 15:15 IST

Bhandara : उपाययोजनांची गती वाढवा; बंधारा बांधण्याचे काम झाले सुरू

सिराज शेख लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : नगरपंचायत प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे मोहाडीवासीयांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून नळाला दोन दिवसाआड पाणी येत असल्याने महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. मोहाडी शहराला उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो हे माहीत असतानाही नगर पंचायत प्रशासनाने यासाठी पूर्वीच कोणतेही नियोजन न केल्याने यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

नगरपंचायतीतर्फे सूर नदीवर लाखो खर्चुन करून बंधारा बांधून पेंचचे पाणी अडविले जाते. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत नाही. पदाधिकारी व अधिकारी यांच्यात असलेल्या समन्वय नसल्याने पेंचचे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा भुर्दंड अप्रत्यक्षपणे जनतेवर बसत असतो. 

बंधारा बांधण्याचे काम झाले सुरूसात-आठ दिवसांपासून सूर नदीबर पुलाला लागून बंधारा बांधण्याचे कार्य सुरू आहे. बंधारा बांधून झाल्यानंतर पेंच प्रकल्प अधिकाऱ्यांना विनवणी करून व पाण्याचे पैसे भरून पाणी आणले जाईल, तेव्हा कोठे मोहाडीवासीयांना दररोज नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळू शकेल व तेही अशुद्ध पाणी.

पैसे द्या पाणी न्या...सूर नदीवर जेथे मोहाडी शहराला पाणीपुरवठा करणारा पंप हाऊस आहे, त्या ठिकाणी तीन महिन्यांअगोदरच बंधारा बांधला असता तर शेतकऱ्यांसाठी सोडलेले पाणी नदीत येऊन पाणी अडविण्यात यश आले असते आणि पेंच प्रकल्पाचे पाणी पैसे देऊन घेण्याची वेळ आली नसती. मागील महिन्यापर्यंत सूर नदी पात्रातून पाणी वाहत होते. तेच पाणी जर पूर्वी अडविले गेले असते तर जून महिन्यापर्यंत पेंच प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले असते.

पेंचचे पाणी नगरपंचायतीसाठी, लाभ अनेक ग्रामपंचायतींनामोहाडी नगरपंचायत पाण्याचे पैसे भरून पेंचचे पाणी आणते. परंतु पेंच प्रकल्पापासून मोहाडी पाणीपुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहोचताना मधात अनेक ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी सूर नदीकाठावर आहेत. त्या ग्रामपंचायती फुकटात या पाण्याचा लाभ घेतात. एवढेच नाही तर नदीत ठिकठिकाणी असलेल्या खड्यात हे पाणी साचून राहते व त्याचा फायदा जनावरांनासुद्धा होतो. परंतु या पाण्याच्या भुर्दंड नगरपंचायत भरत असते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाणीटंचाई विषयाखाली पेंचच्या पाण्याचा कोणताही पैसा न देता पेंच प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकbhandara-acभंडारा