शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

जलयुक्त शिवारच्या धर्तीवर ‘जलक्रांती अभियान’ राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:45 AM

जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या जलसंधारण नदी विकास व गंगा मंत्रालयाच्या वतीने राज्यातील ३४ जिल्ह्यात जलक्रांती अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देसमित्या स्थापन करण्याचे शासनाचे निर्देश। निधी मागणीसाठी प्रस्ताव आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या जलसंधारण नदी विकास व गंगा मंत्रालयाच्या वतीने राज्यातील ३४ जिल्ह्यात जलक्रांती अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानासाठी राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्ह्यास्तरीय व तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याचेनिर्देश देण्यात आले आहेत.सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत पाणी टंचाई परिस्थितीवर कामयस्वरुपी मात करण्यासाठी 'जलयुक्त शिवार अभियान' राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानासाठी राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सर्वांसाठी पाणी, टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत पाणी टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विभाग जिल्हा व तालुकास्तरीय समित्या अस्तित्वात आहेत. आता याच समित्यांमार्फत व जलयुक्त शिवार अभियानाच्या धर्तीवर जलक्रांती अभियान राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये कामकाज जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत अस्तित्वात विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांमार्फत हाताळण्यात यावे, राज्य व ग्रामस्तरावर जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत समिती अस्तित्वात नसल्यामुळे राज्य व ग्रामस्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय समितीची कार्यकक्षा राज्यात जलक्रांती अभियानाचे नियोजन, संनियंत्रण व अंमलबजावणी करणे, अभिसरणात्मक दृष्टीकोनातून जलस्त्रोतांचा विकास जल व्यवस्थापनाकरिता मार्गदर्शन करणे, जिल्हा पातळीवरील समितीने सादर केलेल्या प्रस्तावाच्या शिफारशीची छाननी करणे, मार्गदर्शक तत्व व निकषानुसार जलक्रांती अभियानाची तालुका व गावपताळीवरील समिती मार्फत अंमलबजावणी होत असल्याची खात्री करणे, निधी मागणी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.अशी राहणार ग्रामपातळीसमितीची रचना ग्रामस्तरीय समितीत सरपंच अध्यक्ष राहणार असून तलाठी, आरोग्य अधिकारी, सभापती पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी, महिला स्वयंसहायता गटाचे प्रतिनिधी मुख्याध्यापक, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांचा समावेश राहणार आहे. जलक्रांती अभियाना अंतर्गत दरवर्षी राज्यस्तरीय समितीच्या सुचनेनुसार गावांची निवड करून कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार