शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार?

By admin | Updated: October 5, 2014 23:00 IST

आधीच अल्प पाऊस त्यातही शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली. भारनियमनाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. एका पाण्याखाली धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व कारणाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी

उसर्रा : आधीच अल्प पाऊस त्यातही शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली. भारनियमनाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. एका पाण्याखाली धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व कारणाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.उसर्रा परिसरातील उसर्रा, सालई (खुर्द), टांगा, काटेबाम्हणी, टाकला, सिहरी, ताडगाव, धोप, मालदा, सालई बु., विहिरीगाव, बपेरा, आंबागड आदी भागात धानाचे उत्पादन घेतले जाते. सुरुवातीला अल्प पाऊस असल्याने काहींनी पऱ्हे सुद्धा टाकले नाही. तर ज्यांच्याकडे पाण्याचे साधन आहे अशांनी धानपिकाची लागवड केली. काहींनी निसर्गावर अवलंबून धान पिकाची लागवड केली. एक दोन पाऊस खूप जोरदार पडले. तेव्हा शेतकऱ्यांना आशा पल्लवीत झाल्या. नंतर पावसाने दडी मारली तेव्हा बावनथडी धरणातून पाणी शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र बावनथडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना पोहचविणे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना जमले नाही. याचे कारण म्हणजे पादचाऱ्याचे काम अद्यापही न झाल्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचू शकले नाही.यातच धान पिकाला मावा, तुडतुडा, खोडकिडासारख्या रोगांची लागण झाली. यात धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना एका पाण्याची आवश्यकता आहे. ज़्यांच्याकडे पाण्याची सुविधा जसे विहिर, बोअरवेल आहेत. परंतु सध्या परिसरात जास्तीचे भारनियमन सुरु असून अल्पवेळेत शेतकऱ्यांना वीज पुरवावी लागते. त्यामुळे शेतकरी वेळेवर शेतात पाणी देऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी धानपिकासाठी बँका, वित्तीय संस्थेकडून कर्ज काढले. कर्जासाठी बँकेचे पदाधिकारी तगादा लावत आहेत. पण पिकच होणार नाही तर कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काही दिवसाअगोदर परिसरात रानडुकरांनी हैदोस घालून धानपिके नष्ट झाली होती हे विशेष. या सर्व कारणाने बळीराजा दूरावला असून यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार यात काही शंका नाही. (वार्ताहर)