शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार?

By admin | Updated: October 5, 2014 23:00 IST

आधीच अल्प पाऊस त्यातही शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली. भारनियमनाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. एका पाण्याखाली धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व कारणाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी

उसर्रा : आधीच अल्प पाऊस त्यातही शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली. भारनियमनाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. एका पाण्याखाली धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व कारणाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.उसर्रा परिसरातील उसर्रा, सालई (खुर्द), टांगा, काटेबाम्हणी, टाकला, सिहरी, ताडगाव, धोप, मालदा, सालई बु., विहिरीगाव, बपेरा, आंबागड आदी भागात धानाचे उत्पादन घेतले जाते. सुरुवातीला अल्प पाऊस असल्याने काहींनी पऱ्हे सुद्धा टाकले नाही. तर ज्यांच्याकडे पाण्याचे साधन आहे अशांनी धानपिकाची लागवड केली. काहींनी निसर्गावर अवलंबून धान पिकाची लागवड केली. एक दोन पाऊस खूप जोरदार पडले. तेव्हा शेतकऱ्यांना आशा पल्लवीत झाल्या. नंतर पावसाने दडी मारली तेव्हा बावनथडी धरणातून पाणी शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र बावनथडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना पोहचविणे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना जमले नाही. याचे कारण म्हणजे पादचाऱ्याचे काम अद्यापही न झाल्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचू शकले नाही.यातच धान पिकाला मावा, तुडतुडा, खोडकिडासारख्या रोगांची लागण झाली. यात धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना एका पाण्याची आवश्यकता आहे. ज़्यांच्याकडे पाण्याची सुविधा जसे विहिर, बोअरवेल आहेत. परंतु सध्या परिसरात जास्तीचे भारनियमन सुरु असून अल्पवेळेत शेतकऱ्यांना वीज पुरवावी लागते. त्यामुळे शेतकरी वेळेवर शेतात पाणी देऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी धानपिकासाठी बँका, वित्तीय संस्थेकडून कर्ज काढले. कर्जासाठी बँकेचे पदाधिकारी तगादा लावत आहेत. पण पिकच होणार नाही तर कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काही दिवसाअगोदर परिसरात रानडुकरांनी हैदोस घालून धानपिके नष्ट झाली होती हे विशेष. या सर्व कारणाने बळीराजा दूरावला असून यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार यात काही शंका नाही. (वार्ताहर)