वन्यप्राण्याचा अपघातातील वाहने बेपत्ताच
By Admin | Updated: January 5, 2015 22:57 IST2015-01-05T22:57:30+5:302015-01-05T22:57:30+5:30
तालुक्याला नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्रप्रकल्पाचे जंगलला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राणाची संख्या मोठी आहे. हे वन्यप्राणी इकडून तिकडे भ्रमण करतांना वाहनांच्या अपघताला बळी पडतात.

वन्यप्राण्याचा अपघातातील वाहने बेपत्ताच
साकोली : तालुक्याला नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्रप्रकल्पाचे जंगलला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राणाची संख्या मोठी आहे. हे वन्यप्राणी इकडून तिकडे भ्रमण करतांना वाहनांच्या अपघताला बळी पडतात. मात्र वाहनात सापडतच नाही. त्यामुळे या वन्यप्राण्याचा मृत्यू अपघात झाला की त्यांची शिकार करुन अपघाताचे रुप देण्यात आले हा चौकशीचा मुद्दा बनला आहे.
साकोली तालुक्यातून राष्ट्रीय महामार्गासोबतच राज्य मार्गही जातात. या मार्गावर अनेकदा वन्यप्राण्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाल्याचे आढळून आले. मागील वर्षी उकारा फाट्याजवळ एक बिबटाचा अपघाती मृत्यू झाला.
यावर्षी त्याच ठिकाणी एक हरणाचा अपघाती मृत्यू दहा दिवसापूर्वी झाला. तर दोनवर्षापूर्वी मुंडीपारजवळ एक सांभराचा तर भंडारा तालुक्यातील करडी मार्गावरही एका बिबट्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वनविभागाचे अपघातातील वन्यप्राण्यांचा पंचनामा तयार करू न हे मृत वन्यप्राणी जाळून प्रकरण बंद केले. मात्र अपघातील वाहनांचा कधी शोध घेण्याचा प्रयत्नच करण्यात आला नाही, असा आरोप होत आहे.
जंगलातील तलावावर अतिक्रमण
परिसरात अनेक तलाव असून बरीच तलाव हे जंगलाला लागून आहेत. वाढती लोकसंख्या व जमिनीचे क्षेत्रफळ मर्यादीत यामुळे बऱ्याच लोकांनी तलाव परिसरात शेती काढल्या. त्यामुळे तलावाचे क्षेत्र कमी झाले. परिणामी या जंगला शेजारील तलवात पाणी राहत नाही व दिवसभर शेतात माणसे असल्यामुळे हे वन्यप्राणी पाण्यासाठी गावाचा आसरा घेत आहेत.
अवैध वृक्षतोड कारणीभूत
बेरोजगारीची झळ शहराबरोबरच ग्रामीण भागातही आहे. पोटाची खडगी भरण्यासाठी लोकांनी जंगल तोडून लाकडे विकण्याचा गोरखधंदा सुरू केला. त्यामुळे जंगलातील लोकांची गर्दीमुळे वन्यप्राणी ईतरत्र सैरावैरा पळतांना दिसतात. (तालुका प्रतिनिधी)