शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कुणाची सत्ता येणार, काेण हाेणार अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितींची निवडणूक २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दाेन टप्प्यात पार पडली. १९ जानेवारी राेजी ५२ गट आणि १०४ गणांची मतमाेजणी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसपा एक आणि चार अपक्ष निवडून आले. मतदारांनी कुणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे निवडणूक निकाल लागताच जुळवाजुळव सुरू झाली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रामविकास मंत्रालयाचे पत्र आले. निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा जीव भांड्यात पडला. आता पुन्हा सत्ता समीकरणे जुळविण्याला वेग आला. मात्र, कुणालाही जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसल्याने कुणाची सत्ता येणार व काेण जिल्हा परिषद अध्यक्ष हाेणार अशा चर्चांना उधाण आले आहे.भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितींची निवडणूक २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दाेन टप्प्यात पार पडली. १९ जानेवारी राेजी ५२ गट आणि १०४ गणांची मतमाेजणी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसपा एक आणि चार अपक्ष निवडून आले. मतदारांनी कुणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे निवडणूक निकाल लागताच जुळवाजुळव सुरू झाली. सर्वात माेठा पक्ष काँग्रेस असल्याने त्यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नाही असे बाेलले जात हाेते. राष्ट्रवादी काँग्रेससाेबत जाईल अशा सर्वांचा अंदाज हाेता आणि आताही आहे. मात्र, नेत्यांनी काेणताही काैल दिला नाही. अशातच सत्ता स्थापनेची अधिसूचना लांबत गेली आणि सत्ता स्थापनेची चर्चा पुन्हा अडगळीत पडली.तब्बल तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गत मंगळवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने पत्र काढले. पंचायत समिती सभापती आरक्षण साेडत काढण्याची सूचना दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मार्ग माेकळा झाला.आता पुन्हा सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्ता स्थापन करणार की आणखी नवे समीकरण जन्माला येणार याबाबत चर्चा सुरू आहे.अनेकजण सभापती पदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. आता २२ एप्रिल राेजी पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण साेडत निघाल्यानंतर नेते काय निर्णय घेतात आणि कुणाची सत्ता स्थापन हाेते हे कळणार आहे. तूर्तासतरी केवळ चर्चांना उधाण आले आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काेण विराजमान हाेताे याची उत्सुकता आहे.

२१ महिन्यांचे दीर्घ प्रशासक राज संपुष्टात येणार- जिल्हा परिषदेची मुदत १५ जुलै २०२० राेजी संपली. मात्र त्या काळात काेराेना संसर्ग असल्याने निवडणूक घेणे शक्य नव्हते. परिणामी १६ जुलै राेजी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त झाले. तेव्हापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने मिनी मंत्रालयाच्या कारभार सुरू आहे. १९ जानेवारीला निकाल घाेषित झाल्यानंतरही तब्बल चार महिने सत्ता स्थापनेसाठी प्रतीक्षा करावी लागली. जवळपास २१ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रशासकराज जिल्ह्याचे अनुभवले.

नेत्यांचे माैन अन्  इच्छुक अस्वस्थ- तब्बल तीन महिन्यांनंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र नेते अद्यापही माैन आहेत. काेणत्याही पक्षाच्या नेत्याला विचारले तर लवकरच निर्णय हाेईल, असे उत्तर दिले जाते. नेते काहीच बाेलत नसल्याने इच्छुक मात्र अस्वस्थ हाेत आहे. काहींना नेत्यांनी शब्द दिला आहे तर काही स्पर्धेत आहेत. त्यांचा जीव मात्र टांगणीला आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदZP Electionजिल्हा परिषद