शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
4
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
5
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
6
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
7
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
8
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
9
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
10
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
11
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
12
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
13
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
14
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
15
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
16
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
17
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
18
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
19
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
20
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?

प्रवाशांच्या जीवाची कोण घेणार हमी?

By admin | Updated: May 30, 2014 23:29 IST

सध्या खासगी प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ मोठय़ा प्रमाणात वाढलेले आहे. वाहनामध्ये प्रवासी कोंबून भरधाव वाहने धावत असल्याने अपघात झाल्यास मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भंडारा :  सध्या खासगी प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ मोठय़ा प्रमाणात वाढलेले आहे. वाहनामध्ये प्रवासी कोंबून भरधाव वाहने धावत असल्याने अपघात झाल्यास मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध प्रवासी वाहतुकीस प्रवाशांची जोखीम कोण घेणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. भंडारा शहरातून ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. यात प्रवाशांची सुरक्षा, गाडीची बैठक व्यवस्था व त्यात बसविण्यात येणारे प्रवासी याची पाहणी केली असतावरील वास्तव समोर आले. भंडारा शहरातून तुमसर, पवनी, वरठी, मोहाडी, साकोली, लाखनी या मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. सहा, आठ आसनी वाहनातही १५ ते २0 प्रवासी कोंबून भरले जातात.धावपळीच्या काळात कोणाला वेळ नसल्याने अनेक जण मिळेल त्या वाहनाने गाव जवळ करण्याचा प्रयत्न करीत असतात. तुमसर भंडारा या ठिकाणची बाजारपेठ मोठी असल्याने  दिवसाकरीता या दोन्ही शहरात लाखोंची उलाढाल होत असते. शासकीय व इतर कामांसाठी हजारो नागरिक ग्रामीण भागातून शहरात येत असतात. परंतु ग्रामीण भागात वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने ऑटो रिक्षा किंवा कालीपिली जीप, अँपे या वाहनाने प्रवास करावा लागतो. मात्र खासगी वाहनातून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात येत असल्याचे गाडीचा कधी अपघात होईल याची शाश्‍वती नसते. एका फेरीत जास्त पैसा कमविण्याच्या प्रयत्नात वाहनचालक प्रवासी कोंबून बसवितात. चालकाच्या आसनावरही प्रवासी बसविण्यात येत असल्याने चालकाला अगदी एका पायावर वाहन चालवावे लागते. त्यातच खड्डे चुकविताना प्रसंगी अपघातही होतात. त्यात निष्पात प्रवाशांना जीव गमवावा लागतो. या प्रकाराकडे मात्र पोलीस वाहतूक विभाग आणि परिवहन विभागाचे साफ दुर्लक्ष झालेले आहे. दहावीपेक्षा कमी शिक्षण असलेल्यांना परिवहन विभाग वाहन चालविण्याचा परवाना देत नाही. त्यामुळे विनापरवानाच वाहने चालविली जातात. अपघात होवून प्रवाशांचा मृत्यू झाल्यास प्रवाशाला भरपाइृची रक्कमही मिळत नाही. या अपघाताची दखलही घेतली जात नाही.नोकर्‍या मिळत नाही, दुसरा कामधंदा नाही, त्यामुळे अनेक जण कर्ज काढून प्रवासी गाडी घेतात. गाडीचा हप्ता व पोलिसांचाही हप्ता देण्यासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशी बसवून पैसे मिळविण्याकडे कल असतो. याशिवाय वाहनांची संध्या जास्त झाल्याने दिवसातून जास्त फेर्‍या होत नसल्यामुळे वाहनधारकांना जीवावर उदार होवून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरावे लागते.ज्या मार्गावर अशी वाहतुक चालते त्या सर्व मार्गावर वाहतूक पोलीस आहेत मात्र या वाहतुक पोलिसांच्या हातात पेन आणि पावती पुस्तक असतो. महिना झाला म्हणजे त्यांना वसुलीचे टार्गेट पूर्ण करून द्यावे लागते. त्यामुळे ते अशा वाहनांमध्ये प्रवाशी किती आहेत, हे पाहण्यापेक्षा वाहनधारकाने पावती फाडली का हेच पाहतात. जे वाहनधारक हप्ता देत नाहीत त्यांच्या वाहनविरूद्ध कारवाई करतात. (वार्ताहर)