बालकामगारांच्या जीवाची पर्वा कुणाला?
By Admin | Updated: June 11, 2014 23:10 IST2014-06-11T23:10:06+5:302014-06-11T23:10:06+5:30
‘‘बालपण दे गा देवा, जसा तोंडात साखरेचा रवा’’ या म्हणीप्रमाणे बालपणीचा काळ म्हणजे सुवर्णकाळ असतो. मात्र प्रत्येकाच्या आयुष्यातील हा बालपण सारखाच असेल, असे नाही. जगातील बहुतांश बालके

बालकामगारांच्या जीवाची पर्वा कुणाला?
भंडारा : ‘‘बालपण दे गा देवा, जसा तोंडात साखरेचा रवा’’ या म्हणीप्रमाणे बालपणीचा काळ म्हणजे सुवर्णकाळ असतो. मात्र प्रत्येकाच्या आयुष्यातील हा बालपण सारखाच असेल, असे नाही. जगातील बहुतांश बालके आजही बाल कामगार म्हणून आपले
जीवन जगत आहेत. ना कुणाचीही सामाजिक बांधिलकी व प्रयत्नांचे फळ त्यांच्या नशिबी अजूनही आलेले नाही. बाल कामगारांच्या जीवाची पर्वा कुणाला आहे असा हाडामांसाला सडेतोड उत्तर देणारी संजीवनी तरी मिळालेली नाही.
दि.१२ जून हा जागतिक बाल मजुरी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येत असताना समाजात जनजागृतीपर आम्ही ही छोटेखानी माहिती आपल्या वाचकांना देत आहोत. भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाखांच्या घरात आहे. त्यात किशोरावस्था गाठलेल्यांची संख्या ३५ ते ४० टक्क्यांच्या घरात आहे. या पैकी जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त बाल कामगारांची संख्या आहे. ही आकडेवारी अनधिकृत असली तरी वास्तविकतेला धक्का देणारी आहे. शासकीय दप्तरी बालकामगारांची संख्या ही फक्त बोटांवर मोजण्याइतकीच आहे. बालकांचे हक्क, त्यांचे अधिकार हिरावून घेऊन त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत कित्येक ठिकाणी त्यांना राबवून घेतले जाते. इमारत बांधकाम असो की उपहारगृह असो, बुटबॉलिश असो की चहाच्या टपरीवर असो. बालकामगार आपल्याला हमखास दिसतात. या बालकामगारांच्या डोळ्यातील वेदना प्रत्येकाला खुणावत असल्या तरी त्यांच्या हक्कासाठी लढणारा देवदूत तरी अजूनपावेतो मैदानात उतरलेला नाही. (शहर प्रतिनिधी)