शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

जप्त रक्कम जाते कुठे ?

By admin | Updated: October 5, 2014 23:01 IST

निवडणुकीच्या काळात मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळविण्याच्या प्रयत्नात अनेक उमेदवार असतात. यावर अंकूश घालण्यासाठी निवडणूक आयोगाची करडी नजर असते. नाकेबंदी करुन वाहनांची

मतदारांत संभ्रम : नाकाबंदी, वाहन तपासणी केवळ फार्स असल्याची चर्चाचंद्रपूर : निवडणुकीच्या काळात मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळविण्याच्या प्रयत्नात अनेक उमेदवार असतात. यावर अंकूश घालण्यासाठी निवडणूक आयोगाची करडी नजर असते. नाकेबंदी करुन वाहनांची तपासणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आहेत. तपासणी दरम्यान लाखो रुपयांची रोकड सापडते. मात्र, जप्त केलेल्या रक्कमेचे पुढे काय होते, ही रक्कम जाते कुठे? असा प्रश्न मतदारांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाभरात प्रमुख मार्गावर पोलीस चौकी उभारुन वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तर निवडणूक विभागानेही पथक गठीत केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात पत्तीस ते चाळीस लाख रुपयांची रोकड सापडली आहे. मात्र, या रक्कमेचे पुढे काय झाले, हे मतदारांना माहितच नाही. पोलिसांकडून दुचाकी व चारचाकी वाहनांची चौकशी केली जात असून चौकशी दरम्यान संशय आल्यास किंवा माहिती देताना वाहनधारक अडखळल्यास त्याला ताब्यात घेतात. त्याची कसून चौकशी केली जाते. तर उमेदवारांचे निवासस्थान तसेच जनसंपर्क कार्यालयावरही नजर ठेवण्यात आली आहे. उमेदवाराच्या घरी व प्रचार कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर आयोगाची नजर आहे. या चौकशीचा मात्र, सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ओळखपत्र दाखवा, तुमच्या परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्तीचे नाव सांगा, आदी प्रश्न विचारुन पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. निवडणूक काळात एखाद्याकडे रक्कम आढळल्यास त्या रक्कमेचा तपशील देणे गरजेचे आहे. अन्यथा सीआरपीसी कलम ४१ (ड) अंर्तगत बेहिशोबी अथवा संशयास्पद रक्कम जवळ बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहे. मोठी रक्कम आढळ्यास आणि अशावेळी चौकशीत समाधानकारक उत्तर, कागदपत्रे नसल्यास रक्कम जप्त करण्याची कायद्यात तरतुद आहे. रक्कमेचा प्राप्तिकर भरला आहे किंवा नाही याची चौकशी केली जाते. कागदपत्र न्यायालयात सादर केल्यानंतरच ती रक्कम संबधीला परत केली जाते. जर ही रक्कम निवडणूक कामासंबधीत असली तर, ती निवडणूक विभागाच्या खर्च संनियंत्रण विभागात जमा केली जाते. (स्थानिक प्रतिनिधी)