शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बेराेजगारी, महागाई, युवकांच्या प्रश्नांवर कधी बोलणार? राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 7:05 AM

राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल, साकोलीतील सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारला जोश

लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा: पंतप्रधान देशातील बेराेजगारी, महागाई, शेतकरी युवकांच्या प्रश्नांवर बाेलत नाहीत, त्याऐवजी धर्म, हिंदू-मुस्लीम जातीय तेढ वाढेल असेच बाेलतात, देशात ओबीसींची संख्या माेठी आहे, मात्र त्यांची भागीदारी कुठेच दिसत नाही. आमचे सरकार आल्यावर सर्वच जातींचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करून विविध वर्गांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळेल, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. 

महाआघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे राहुल गांधी यांची शनिवारी महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा जनतेच्या प्रतिसादाने यशस्वी ठरली. गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात झालेल्या सभेत जनतेचा उत्साह ओसंडून वाहत होता. सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

धर्माच्या नावावर विभागले जाते - थोरातराज्याचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात ज्या वेळी लोकशाही, राज्यघटना आणि जनतेचा विचार अडचणीत आला त्या प्रत्येक वेळी विदर्भातील जनता भक्कमपणे पाठीशी उभी राहिली आहे. आज तीच वेळ आहे. मोदी सरकारने भेदाभेद करून धर्माच्या नावावर माणसांना विभागण्याचे काम केले. 

घोषणापत्रात सर्वांना न्याय - पटोलेकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, पक्षाने आणलेल्या घोषणापत्रात सर्वांना न्याय, जनतेची भागिदारीचे वचन दिले आहे. या देशातील जंगल, जल, जमिनीवर जनतेचा हक्क आहे, अदानींचा नाही. जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणाचा मुद्दा घेतल्याबद्दल त्यांनी जनतेच्या वतीने राहुल गांधी यांचे आभार मानले.

जनतेला वाचवा - पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मोदी सरकारने केलेल्या सर्व घोषणा जनतेची फसवणूक करणाऱ्या आहेत. या देशाने १० वर्षात घेतलेल्या अनुभवातून पुन्हा जुने दिवस आणले पाहिजे आणि भरडलेल्या जनतेला वाचविले पाहिजे ही भावना देशभर जागृत झाली आहे. मोदी सरकारच्या काळात देशात १ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज सरासरी ३० शेतकरी आत्महत्या करतात.  

भीती का वाटते? - वडेट्टीवारविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मोदी सरकार गरिबांचे नसून जुमलेबाज आणि लुटारूंचे आहे. सोन्यावर ३ टक्के, हिऱ्यावर २ टक्के जीएसटी लावणारे हे सरकार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर १८ टक्के जीएसटी लावत आहे. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’ म्हणत जनतेच्या मनात विश्वास पेरला. हा देश गांधींनीच बनविला आणि उभा केला. त्यामुळे आता गांधी नावाची भीती मोदींना वाटत आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडाराRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस