शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

झोपडपट्टीवासीयांना सुविधा केव्हा मिळणार?

By admin | Updated: April 4, 2015 00:17 IST

पवनी तालुक्यातील पालोरा येथील काही कुटूंबानी गावाच्या मध्यभागी अतिक्रमण करून झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करीत आहेत.

मालकी हक्काचे पट्टे देण्याची मागणी : ग्रामपंचायतने पुढाकार घेण्याची मागणीपालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील पालोरा येथील काही कुटूंबानी गावाच्या मध्यभागी अतिक्रमण करून झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करीत आहेत. मागील १० वर्षापासून वास्तव्याला असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. परिणामता काळोख्या अंदारात, चिखलाचे रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाहीत. जंगली डुकरे, सरपणारे प्राणी यांच्यापासून जिवाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी झोपडपट्टीवासीयांनी केली आहे.पालोरा हे गाव जवळपास दोन हजार लोकवस्तीचे आहे. येथे अनेक गरीब गरजू कुटूंब वास्तव्याला आहेत. जवळपास २० कुटूंबानी गावाजवळच्या खाली जागेवर अतिक्रमण केले आहे. मागील दहा वर्षापासून जीव मुठीत घेवून आपल्या कुटूंबासह राहत आहेत. संबंधित प्रशासनाने त्यांच्यावर दंड ही ढोकावला आहे. त्यांनी पोटाला मारून प्रशासनाकडे दंडही भरले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही.प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही हे करू ते करू म्हणून आश्वासनाची खैरात वाटली जाते. मात्र निवडणूक संपताच सर्व काही विसरले जात आहे. येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, पथदिवे नाहीत, रस्ते नाहीत पावसाळ्यात तर सर्वत्र चिखल पाहायला मिळते. झोपडपट्टी सभोवताल पाणीच पाणी असते. दररोज रात्री कुणाच्या ना कुणाच्या झोपड्यात सरपडणारे प्राणी पहायला मिळतात. जीव मुठीत घेवून दररोज रात्र काढीत आहे. पिण्याचे पाणी मिळावे म्हणून काही सुविधा देण्यात यावे म्हणून येथील नागरिकांनी अनेकदा मागणी केली. मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येथील का? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)