अतिवृष्टीत पडलेल्या घरांची नुकसान भरपाई केव्हा मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:57+5:302021-02-05T08:41:57+5:30

तुमसर तालुक्यातील नदीकाठावरील गावात महापूर आला होता. वैनगंगा व बाव न थ डी नदीचे पाणी गावात शिरले होते. गावातील ...

When will the houses damaged due to heavy rains be compensated? | अतिवृष्टीत पडलेल्या घरांची नुकसान भरपाई केव्हा मिळणार!

अतिवृष्टीत पडलेल्या घरांची नुकसान भरपाई केव्हा मिळणार!

तुमसर तालुक्यातील नदीकाठावरील गावात महापूर आला होता. वैनगंगा व बाव न थ डी नदीचे पाणी गावात शिरले होते. गावातील अनेक घरांना त्याचा फटका बसला होता. काहींची घरे भुईसपाट झाली होती, तर काही नागरिकांच्या घरांची पडझड झाली होती. महसूल प्रशासनाने मोका पंचनामा केला. हा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. परंतु अजूनपर्यंत शासनातर्फे कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. काहींना भाड्याच्या घरात राहावे लागत असून काही नागरिक पडक्या घरातच वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका झालेला आहे. एक ते दीड महिन्यात नुकसानभरपाई मिळेल, असे शासनाने जाहीर केले होते. काही लोकप्रतिनिधींनीसुद्धा गावात जाऊन पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्या होत्या. घरे पडलेल्यांना आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन हवेतच विरले आहे.

दुसरीकडे मोहाडी तालुक्यातील घरे पडलेल्या नागरिकांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली. परंतु तुमचा तालुक्यातील नागरिकांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. शासन आणि प्रशासनाने तत्काळ नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के. के. पंचबुद्धे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: When will the houses damaged due to heavy rains be compensated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.