शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

थबकलेली रेल्वेची चाके पुन्हा धडधडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

आता १ ऑक्टोबरपासून रेल्वेचा प्रवास खुला करण्यात आला आहे. मुंबई - हावडा मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे प्रवासी गाड्या पूर्ववत सुरू होणार आहेत. प्रवास करण्यासाठी जुने दर कायम असून जुन्या वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. कोरोना काळात प्रवास करण्यास असलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. प्रवाशांना वेळेवर तिकीट मिळणार असून केव्हाही आणि कुठेही प्रवास करण्याची मुभा राहणार आहे. 

तथागत मेश्रामलोकमत न्यूज नेटवर्कवरठी : कोरोना संसर्गामुळे दीड वर्षांपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक अनियमित आहे. यामुळे  प्रवाशांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने १ ऑक्टोबरपासून थबकलेल्या प्रवासी रेल्वे गाड्याची चाके रेल्वे रुळावर धावणार आहेत. जुने दर व वेळापत्रकानुसार गाड्या धावणार असल्याने प्रतीक्षेत असलेले प्रवासी सुखावले आहेत.प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून रेल्वेची ओळख आहे. स्वस्त व सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे ओळखली जातो. कोरोनाच्या प्रभावामुळे मार्च २०२० पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास बंद होता. दरम्यानच्या काळात काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू झाली. तिकिटाचे दर, नियम व अटी आणि सामान्य प्रवाशांना असलेल्या बंदीमुळे प्रवास करणे परवडत नव्हते. रेल्वे प्रवासी गाड्यांची संख्या तुरळक होती. सामान्य तिकीट विक्री बंद असल्याने अनेकांना प्रवास करणे महागात पडत होते. कोरोना काळात नियमित तिकिटाचे दर वाढल्याने अनेकांना आर्थिक फटका बसत होता.आता १ ऑक्टोबरपासून रेल्वेचा प्रवास खुला करण्यात आला आहे. मुंबई - हावडा मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे प्रवासी गाड्या पूर्ववत सुरू होणार आहेत. प्रवास करण्यासाठी जुने दर कायम असून जुन्या वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. कोरोना काळात प्रवास करण्यास असलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. प्रवाशांना वेळेवर तिकीट मिळणार असून केव्हाही आणि कुठेही प्रवास करण्याची मुभा राहणार आहे. रेल्वे प्रवास बंदीच्या काळात अनेक संकटाचा सामना करावा लागला. नोकरीनिमित्त प्रवास करणे अवघड झाले होते.  सामान्य प्रवाशांना बंदी  व तिकिटाचे वाढीव दरामुळे आर्थिक नुकसान होत होते. सामान्य लोकांसाठी रेल्वे पूर्ववत सुरू होणार असल्याने प्रवाशांना संजीवनी मिळणार असल्याची माहिती  रेल्वे प्रवासी संघाचे प्रा. बबन मेश्राम, व्यापारी संघाचे सुधीर बागडे, संजय मिरासे, वैद्यकीय संघटनेचे  अतुल भोवते, मोबाईल विक्रेता संघाचे विवेक मोटघरे, किराणा दुकान संघटनेचे नवीन पशिने व सचिन बन्सोड यांनी दिली. 

भंडारा रोड येथून धावणार १०८ गाड्या- मुंबई-हावडा मार्गावर असलेल्या भंडारा रेल्वे स्थानकावरून दररोज १०८ प्रवासी गाड्या धावणार आहेत. यापैकी ६२ गाड्यांचा थांबा भंडारा रोड रेल्वे स्थानकावर नाही. नियमित थांबा असणाऱ्या ४६ प्रवासी गाड्या आहेत. यात ६ लोकल गाड्या आहेत.  ४ लोकल गाड्या इतवारी ते गोंदिया दरम्यान धावत असून एक लोकल तिरोडी व एक रायपूरपर्यंत धावणार आहे.रेल्वे फाटकावर ताण- तिसऱ्या रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने वाहनांची वर्दळ रेल्वे फाटक परिसरातून सुरू आहे. रेल्वे फाटकामुळे  वाहतुकीसाठी अडचण वाढली आहे. १ तारखेपासून रेल्वे गाड्यांची संख्या दुपटीने वाढणार असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होणार आहे. पुढील एक महिनाभर रेल्वे फाटकावर ताण पडणार असून स्थानिक पोलीस प्रशासनाची तारांबळ होणार आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे