शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भात पिकांची नर्सरी नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Published: July 24, 2015 12:42 AM

पवनी तालुक्यात चार नक्षत्राचा अपुरा पाऊस पडल्यामुळे रोवणीसाठी टाकण्यात आलेले भात पिकाची रोपे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत.

पावसाची दडी : शेतकरी चिंतातूर, धरण नावपुरतेच आसगाव/चौ. : पवनी तालुक्यात चार नक्षत्राचा अपुरा पाऊस पडल्यामुळे रोवणीसाठी टाकण्यात आलेले भात पिकाची रोपे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहेत.पावसाचा अंदाज घेवून यावर्षी शेतकऱ्यानी शेतात हलक्या प्रजातीची धान रोपे रोवणीसाठी शेतात घातली होती. यावर्षी शेतात साठवण्याजोकता एकाही नक्षत्राचा पाऊस पडला नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्याची कोरडवाहू शेतीतील रोवणी होणार नाही. हलक्या प्रजातीच्या बियान्याची भात पिकाची मुदत १२० ते १४० दिवसाची असते. या पिकांची रोवण्याची मदत ३० ते ४० दिवस असते. परंतु ६० दिवसाचा कालावधी होवूनही शेतात पाणी साचला नसल्यामुळे शेतकऱ्यांना या रोपाची लागवड करता आली नाही. परिणामी ही भात रोपे पिवळी पडली असून नष्ट झाल्यासारखी दिसत आहेत. जरी पाऊस मोठा झाला व रोवणी झाली तरी यांचा उत्पन्नावर मात्र मोठा फरक पडत असतो. त्यामुळे उशिरा रोवणी झाली तर उत्पन्न मात्र अर्ध्यावर येते अशावेळी शेतकरी शेतात, रोवणी करण्याची हिंमत करीत नाही. कारण खर्च रूपया आमदानी आठ आणे अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे. यावर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे फक्त ज्याचे कृषी पंप सुरू झाले आहेत. त्याचीच २५ टक्के पर्यंत रोवणी झाली आहे. त्यांनाही विजेच्या भारनियमनामुळे रोवणी पाणी पूर्ण वेळ देता यत नाही, अशी परिस्थिती आहे.इंदिरा सागर धरण ठरले पांढरा हत्तीपवनी तालुक्यात इंदिरा सागर धरण बांधून झाले याला २५ वर्षांचा इतिहास आहे. परंतु उजवा कालवा व डावा कालवा यांचे काम संपूर्ण असल्यामुळे व कालव्याचे पाणी शेतात सोडण्यासाठी छोटे कालवे पूर्ण न केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करता येत नाही. परिणामी धरणात पाणीसाठा असूनही सिंचन होवू शकत नाही. काही प्रमाणात उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. परंतु जिथे ज्याला मिळेल तोच या पाण्याचा उपयोग करीत आहे. त्यामुळे छोटे कालवे बनविणे गरजेचे आहे.(वार्ताहर)