शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गाव उंचावर... सांगा कसे पाेहाेचेल नळाचे पाणी, गावकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 17:34 IST

गाेबरवाही पाणीपुरवठा याेजना येथे चिंचाेली गाव उंचावर असल्याचे सर्वांना माहीत हाेते. मात्र याकडे दुर्लक्ष करीत पाईपलाईन टाकण्यात आली. व आता तांत्रिक कारण पुढे करत गावाला दुसरी नळ याेजना देता येणार नाही असे अधिकारी सांगत आहेत.

ठळक मुद्देचिंचाेलीचा प्रकार : गावकऱ्यांची पाण्यासाठी दाेन किमी पायपीट

भंडारा : गाेबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेचे पाणी तालुक्यातील चिंचाेली येथील गावकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. गाव उंचावर आणि याेजना सखल भागात असल्याने नळाचे पाणी गावात पाेहाेचत नाही. परिणामी, गावकऱ्यांना पाण्यासाठी दाेन किमीची पायपीट करावी लागते. लाखाे रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने असंताेष निर्माण झाला आहे.

गाेबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा याेजना २०१८ मध्ये पूर्णत्वास आली. या याेजनेअंतर्गत चिंचाेली गावाचाही समावेश आहे. ८० टक्के नागरिकांनी नळ जाेडणी केली. सुरुवातीला आठवडाभर नळयाेजनेचे पाणी आले. त्यानंतर या गावात याेजनेचे पाणी पाेहाेचले नाही. चिंचाेली गाव उंचावर असल्याने पाणी पाेहाेचण्यास अडचण येत असल्याचे सांगण्यात येते. गावात जलस्रोत आहेत; परंतु येथील पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे गाेड्या पाण्यासाठी बाराही महिने या नागरिकांना दाेन किमी अंतरावरून पाणी आणावे लागते. यासंदर्भात ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीला निवेदन दिले. परंतु अद्यापपर्यंत समस्या दूर झाली नाही.

पाण्यासाठी आंदाेलनाचा इशारा

दरराेज रेल्वे रुळाजवळ जाऊन पाणी आणावे लागते. महिलांना माेठी कसरत करावी लागते. ही समस्या साेडविण्यासाठी सरपंच देवदास झाडेकर, ग्रा. पं. सदस्य विजय राणे, अनिल ठाकरे, विक्रम राणे यांनी नागपूर येथे जाऊन जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. तीन वर्षांपासून पाण्यासाठी कशी पायपीट करावी लागते ही समस्या तत्काळ दूर झाली नाही, तर आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

लाखाे रुपयांचा खर्च पाण्यात

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत गाेबरवाही पाणीपुरवठा याेजना येथे चिंचाेली गाव उंचावर असल्याचे सर्वांना माहीत हाेते. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत पाईपलाईन टाकण्यात आली. त्यावर लाखाे रुपये खर्च करण्यात आला. त्याचवेळी याेग्य नियाेजन करून पाईपलाईन टाकली असती तर गावकऱ्यांना पाणी मिळाले असते. आता तांत्रिक कारण पुढे करण्यात येत आहे. गावाला आता दुसरी नळ याेजना देता येणार नाही, असे अधिकारी सांगत आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिकWaterपाणीwater shortageपाणीकपात