शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

गाव उंचावर... सांगा कसे पाेहाेचेल नळाचे पाणी, गावकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 17:34 IST

गाेबरवाही पाणीपुरवठा याेजना येथे चिंचाेली गाव उंचावर असल्याचे सर्वांना माहीत हाेते. मात्र याकडे दुर्लक्ष करीत पाईपलाईन टाकण्यात आली. व आता तांत्रिक कारण पुढे करत गावाला दुसरी नळ याेजना देता येणार नाही असे अधिकारी सांगत आहेत.

ठळक मुद्देचिंचाेलीचा प्रकार : गावकऱ्यांची पाण्यासाठी दाेन किमी पायपीट

भंडारा : गाेबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेचे पाणी तालुक्यातील चिंचाेली येथील गावकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. गाव उंचावर आणि याेजना सखल भागात असल्याने नळाचे पाणी गावात पाेहाेचत नाही. परिणामी, गावकऱ्यांना पाण्यासाठी दाेन किमीची पायपीट करावी लागते. लाखाे रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने असंताेष निर्माण झाला आहे.

गाेबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा याेजना २०१८ मध्ये पूर्णत्वास आली. या याेजनेअंतर्गत चिंचाेली गावाचाही समावेश आहे. ८० टक्के नागरिकांनी नळ जाेडणी केली. सुरुवातीला आठवडाभर नळयाेजनेचे पाणी आले. त्यानंतर या गावात याेजनेचे पाणी पाेहाेचले नाही. चिंचाेली गाव उंचावर असल्याने पाणी पाेहाेचण्यास अडचण येत असल्याचे सांगण्यात येते. गावात जलस्रोत आहेत; परंतु येथील पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे गाेड्या पाण्यासाठी बाराही महिने या नागरिकांना दाेन किमी अंतरावरून पाणी आणावे लागते. यासंदर्भात ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीला निवेदन दिले. परंतु अद्यापपर्यंत समस्या दूर झाली नाही.

पाण्यासाठी आंदाेलनाचा इशारा

दरराेज रेल्वे रुळाजवळ जाऊन पाणी आणावे लागते. महिलांना माेठी कसरत करावी लागते. ही समस्या साेडविण्यासाठी सरपंच देवदास झाडेकर, ग्रा. पं. सदस्य विजय राणे, अनिल ठाकरे, विक्रम राणे यांनी नागपूर येथे जाऊन जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. तीन वर्षांपासून पाण्यासाठी कशी पायपीट करावी लागते ही समस्या तत्काळ दूर झाली नाही, तर आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

लाखाे रुपयांचा खर्च पाण्यात

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत गाेबरवाही पाणीपुरवठा याेजना येथे चिंचाेली गाव उंचावर असल्याचे सर्वांना माहीत हाेते. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत पाईपलाईन टाकण्यात आली. त्यावर लाखाे रुपये खर्च करण्यात आला. त्याचवेळी याेग्य नियाेजन करून पाईपलाईन टाकली असती तर गावकऱ्यांना पाणी मिळाले असते. आता तांत्रिक कारण पुढे करण्यात येत आहे. गावाला आता दुसरी नळ याेजना देता येणार नाही, असे अधिकारी सांगत आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिकWaterपाणीwater shortageपाणीकपात