शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

गाव उंचावर... सांगा कसे पाेहाेचेल नळाचे पाणी, गावकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 17:34 IST

गाेबरवाही पाणीपुरवठा याेजना येथे चिंचाेली गाव उंचावर असल्याचे सर्वांना माहीत हाेते. मात्र याकडे दुर्लक्ष करीत पाईपलाईन टाकण्यात आली. व आता तांत्रिक कारण पुढे करत गावाला दुसरी नळ याेजना देता येणार नाही असे अधिकारी सांगत आहेत.

ठळक मुद्देचिंचाेलीचा प्रकार : गावकऱ्यांची पाण्यासाठी दाेन किमी पायपीट

भंडारा : गाेबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेचे पाणी तालुक्यातील चिंचाेली येथील गावकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. गाव उंचावर आणि याेजना सखल भागात असल्याने नळाचे पाणी गावात पाेहाेचत नाही. परिणामी, गावकऱ्यांना पाण्यासाठी दाेन किमीची पायपीट करावी लागते. लाखाे रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने असंताेष निर्माण झाला आहे.

गाेबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा याेजना २०१८ मध्ये पूर्णत्वास आली. या याेजनेअंतर्गत चिंचाेली गावाचाही समावेश आहे. ८० टक्के नागरिकांनी नळ जाेडणी केली. सुरुवातीला आठवडाभर नळयाेजनेचे पाणी आले. त्यानंतर या गावात याेजनेचे पाणी पाेहाेचले नाही. चिंचाेली गाव उंचावर असल्याने पाणी पाेहाेचण्यास अडचण येत असल्याचे सांगण्यात येते. गावात जलस्रोत आहेत; परंतु येथील पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे गाेड्या पाण्यासाठी बाराही महिने या नागरिकांना दाेन किमी अंतरावरून पाणी आणावे लागते. यासंदर्भात ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीला निवेदन दिले. परंतु अद्यापपर्यंत समस्या दूर झाली नाही.

पाण्यासाठी आंदाेलनाचा इशारा

दरराेज रेल्वे रुळाजवळ जाऊन पाणी आणावे लागते. महिलांना माेठी कसरत करावी लागते. ही समस्या साेडविण्यासाठी सरपंच देवदास झाडेकर, ग्रा. पं. सदस्य विजय राणे, अनिल ठाकरे, विक्रम राणे यांनी नागपूर येथे जाऊन जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. तीन वर्षांपासून पाण्यासाठी कशी पायपीट करावी लागते ही समस्या तत्काळ दूर झाली नाही, तर आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

लाखाे रुपयांचा खर्च पाण्यात

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत गाेबरवाही पाणीपुरवठा याेजना येथे चिंचाेली गाव उंचावर असल्याचे सर्वांना माहीत हाेते. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत पाईपलाईन टाकण्यात आली. त्यावर लाखाे रुपये खर्च करण्यात आला. त्याचवेळी याेग्य नियाेजन करून पाईपलाईन टाकली असती तर गावकऱ्यांना पाणी मिळाले असते. आता तांत्रिक कारण पुढे करण्यात येत आहे. गावाला आता दुसरी नळ याेजना देता येणार नाही, असे अधिकारी सांगत आहे.

टॅग्स :GovernmentसरकारSocialसामाजिकWaterपाणीwater shortageपाणीकपात