शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

विहिरी कोरड्या होऊ लागल्याने पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:01 AM

आॅनलाईन लोकमतकेशोरी : गावालगत असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी धानपीक लागवडीची सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील विहिरी झपाट्याने कोरड्या पडू लागल्या आहेत. या प्रकारामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची समस्या उग्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विभाग व ग्रामपंचायतने गावालगतच्या शेतकºयांनी धान पिकाची लागवड करू नये, असा आदेश शेतकºयांना ...

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : प्रशासनाचे आदेश धुळकावले

आॅनलाईन लोकमतकेशोरी : गावालगत असलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी धानपीक लागवडीची सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील विहिरी झपाट्याने कोरड्या पडू लागल्या आहेत. या प्रकारामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची समस्या उग्ररुप धारण करण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विभाग व ग्रामपंचायतने गावालगतच्या शेतकºयांनी धान पिकाची लागवड करू नये, असा आदेश शेतकºयांना देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाचे पºहे टाकले आहेत. गावालगत शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी बोअरद्वारे २४ तास मोटार चालू ठेवल्याने गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाळा सुरू होण्यास अजून दोन महिने शिल्लक असताना विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.मार्च, एप्रिल, मे व जून या चार महिन्यांपर्यंत गावातील विहिरींचे पाणी नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. उन्हाळा चालू होण्यापूर्वीच विहिरीतील पाणी पातळी ७० टक्केपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरींची काय अवस्था होईल, याची नागरिकांना चिंता वाटू लागली आहे.उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली तर सर्व ग्रामस्थांना मोठा त्रास होईल व पाण्यासाठी उन्हातान्हात त्यांना भटकंती करावी लागेल. याची दक्षता आताच घेतलेली बरी, असे नागरिकांचे मत आहे. त्यासाठी उन्हाळी पीक न घेण्याचे आदेश देण्याची गरज आहे. याप्रकरणी कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीने विशेष लक्ष देऊन उन्हाळी पीक घेवू नये, असे आदेश शेतकºयांना देण्यात यावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.