शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीला जलपर्णीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:01 IST

भंडारा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरुन वैनगंगा नदी वाहते. गतवर्षी नदीला महापूर आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छ झाली होती. मात्र त्यानंतर प्रशासनासह नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे नदी काठावर कचरा साचला आहे. जिल्ह्यात गोसे प्रकल्पामुळे वैनगंगेचा वाहता प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाहते पाणी बंद झाले असून पाण्यावर जलपर्णी दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देपाण्याला दुर्गंधी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी नदी स्वच्छता गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची जीवनदायीनी असणाऱ्या वैनगंगा नदीला जलपर्णीचा विळखा वाढत चालला असून नदीचे पाणी दुषित झाले आहे. नदीपात्रातील पाण्यावर ठिकठिकाणी जलपर्णी वनस्पतीचे आच्छादन वाढले असून पाण्यावर शेवाळ पसरले आहे. त्यामुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरत असून नदीकाठच्या नागरिकांसह शहरवासीयांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.भंडारा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरुन वैनगंगा नदी वाहते. गतवर्षी नदीला महापूर आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छ झाली होती. मात्र त्यानंतर प्रशासनासह नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे नदी काठावर कचरा साचला आहे. जिल्ह्यात गोसे प्रकल्पामुळे वैनगंगेचा वाहता प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाहते पाणी बंद झाले असून पाण्यावर जलपर्णी दिवसेंदिवस वाढत आहे. यातच नदीपात्रात अनेक गावातील सांडपाणी देखील मिसळत असून नागनदीचे पाणी सोडण्यात येत असल्याने वैनगंगा दुषित होत चालली आहे.नदीकाठच्या नागरिकांना दूषीत पाण्याने विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. शहरापासून अवघ्या काही अंतरावर वैनगंगा नदी असल्याने येथे अनेक तरुण जमा होतात.अनेकदा शेतकरी नदीमध्ये मृत जनावरे टाकतात. तसेच ठिकठिकाणचा कचरा व सांडपाणी नदीत मिसळत असल्याने नदी धोका वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने वैनगंगा नदी स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी गत काही वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. अनेकदा आंदोलन व निवेदन देवून नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्यात आले नाही. याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात नदीचे पाणी पिण्यास धोकादयक ठरणार आहे. शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान मंजूर होवूनही याकडे दुर्लक्ष आहे. यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.नदीच्या पाण्याला हिरवट-लालसर रंगनागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमिकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर लाल झाला आहे.

टॅग्स :riverनदी