शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

वैनगंगा नदीला जलपर्णीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:01 IST

भंडारा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरुन वैनगंगा नदी वाहते. गतवर्षी नदीला महापूर आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छ झाली होती. मात्र त्यानंतर प्रशासनासह नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे नदी काठावर कचरा साचला आहे. जिल्ह्यात गोसे प्रकल्पामुळे वैनगंगेचा वाहता प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाहते पाणी बंद झाले असून पाण्यावर जलपर्णी दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देपाण्याला दुर्गंधी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी नदी स्वच्छता गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची जीवनदायीनी असणाऱ्या वैनगंगा नदीला जलपर्णीचा विळखा वाढत चालला असून नदीचे पाणी दुषित झाले आहे. नदीपात्रातील पाण्यावर ठिकठिकाणी जलपर्णी वनस्पतीचे आच्छादन वाढले असून पाण्यावर शेवाळ पसरले आहे. त्यामुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरत असून नदीकाठच्या नागरिकांसह शहरवासीयांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.भंडारा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरुन वैनगंगा नदी वाहते. गतवर्षी नदीला महापूर आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छ झाली होती. मात्र त्यानंतर प्रशासनासह नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे नदी काठावर कचरा साचला आहे. जिल्ह्यात गोसे प्रकल्पामुळे वैनगंगेचा वाहता प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाहते पाणी बंद झाले असून पाण्यावर जलपर्णी दिवसेंदिवस वाढत आहे. यातच नदीपात्रात अनेक गावातील सांडपाणी देखील मिसळत असून नागनदीचे पाणी सोडण्यात येत असल्याने वैनगंगा दुषित होत चालली आहे.नदीकाठच्या नागरिकांना दूषीत पाण्याने विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. शहरापासून अवघ्या काही अंतरावर वैनगंगा नदी असल्याने येथे अनेक तरुण जमा होतात.अनेकदा शेतकरी नदीमध्ये मृत जनावरे टाकतात. तसेच ठिकठिकाणचा कचरा व सांडपाणी नदीत मिसळत असल्याने नदी धोका वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने वैनगंगा नदी स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी गत काही वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. अनेकदा आंदोलन व निवेदन देवून नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्यात आले नाही. याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात नदीचे पाणी पिण्यास धोकादयक ठरणार आहे. शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान मंजूर होवूनही याकडे दुर्लक्ष आहे. यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.नदीच्या पाण्याला हिरवट-लालसर रंगनागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमिकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक पाणी नागनदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील संपूर्ण जलसाठा दूषित झाला आहे. धरणात पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा - कारधा पर्यंत वैनगंगा नदी दुथडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर लाल झाला आहे.

टॅग्स :riverनदी