शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

धरणातील पाणीच ठरू शकते टंचाईत उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:48 IST

भंडारा जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अशा स्थितीत प्रकल्पात असलेले पाणी नदीपात्रात सोडल्यास पाणीटंचाईवर मात होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी राखीव असते, परंतु ते पाणी योग्यवेळी सोडले जात नसल्याने टंचाईचा सामना करावा लागतो.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मत : पाणीटंचाई कृती आराखड्यात धरणातील पाणी सोडणे असावे लेखाशीर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : भंडारा जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अशा स्थितीत प्रकल्पात असलेले पाणी नदीपात्रात सोडल्यास पाणीटंचाईवर मात होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी राखीव असते, परंतु ते पाणी योग्यवेळी सोडले जात नसल्याने टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करताना धरणातून पाणी सोडण्याच्या नियोजनाचे लेखाशीर्ष असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.भंडारा जिल्ह्यात गत तीन-चार वर्षांपासून सरासरीच्या २५ ते ३० टक्के पाऊस कमी होता. त्याचा परिणाम भुजल पातळीसह पिण्याचे पाणी आणि सिंचनावरही होत आहे. यंदा तर जिल्ह्यातील बहुतांश सर्व नद्या आटल्या आहेत. नदीपात्र वाळवंटासारखे भासत आहे. विहिरींनी तळ गाठला असून हातपंपावर हापसून दमल्यानंतर एक कळशी पाणी मिळते. पाण्याअभावी सिंचन धोक्यात आले आहे. अशा स्थितीत जलव्यवस्थापन आणि उन्हाळ्यात त्याचे योग्य वितरण आवश्यक झाले आहेत.भंडारा जिल्ह्यात पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो. परंतु हा पाऊस नद्यावाटे वाहून जातो. काही प्रकल्पात पाणी साठविले जाते. परंतु मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. जलसंधारणाचे कामेही कुचकामी ठरली आहे. त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. एप्रिल महिन्यातच जलपातळीत खालावून पाणीटंचाई निर्माण होते. निसर्गाचे पावसाळ्यातील पाणी वाहून जावू न देता ते धरणाच्या माध्यातून संग्रहित ठेवल्यास टंचाईत महत्त्वाचे ठरू शकते. पाण्याचे नैसर्गीक स्त्रोत योग्यरीत्या सांभाळून त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या पाणीटंचाईवर मात म्हणून ईटियाडोह, पेंच, बावनथडी धरणातून पाणी सोडले जाते. परंतू हे पाणी पाटबंधारे विभागाकडून विकत घ्यावे लागते. किंवा शासनाची शिफारस असावी लागते. या पाण्याच्या नियोजनाकरिता कृती आराखड्यात त्याचा समावेश केला तर उन्हाळ्याच्या दिवसात मोठा दिलासा मिळू शकतो.भंडारा जिल्ह्यात नदी-नाल्यांच्या काठावर शंभर ते १२५ नळयोजना कार्यान्वीत आहे. यातील बहुतेक नळयोजना नदी-नाल्यावर अवलंबून आहे. नदीचे पाणी आटले की नळयोजना अखेरचा श्वास मोजायला लागतात. पुन्हा नवीन जलस्त्रोताकरिता कोट्यवधी रूपयांचा निधी तत्काळ खर्चाच्या नावाने मंजुर होतो. यातील बराचसा निधी नकारात्मक निधीने खर्च केला जातो. परिणामी पैशाचा दुरूपयोग होतो. हे टाळण्यासाठी मंत्रालयस्तरावरून अभ्यासाऐवजी पाणीटंचाई आराखडा अंतर्गत धरणाचे पाणी सोडल्याचा नियम लेखाशिर्ष झाल्यास अत्यल्पनिधीत नियमित पाणी उपलब्ध होवू शकतो. नदी-नाले पाणीदार होवून पशु-पक्षी आणि सिंचनाला पाणी तर मिळेल. मुख्य म्हणजे पाणीटंचाईची भटकंती थांबेल. लाखनी तालुक्याला गोसे व निम्नचुलबंदचे पाणी मिळाल्यास बाराही महिने पीक घेता येईल. धरणाचे कामे तत्परतेने पूर्ण केल्यास चुलबंद समोर तलाव, नाले तुडूंब भरतील.याचा प्रत्येक खरीप हंगामात पालांदूर परिसरात अनुभवायला मिळाला. मºहेगाव नाल्याला गोसेचे पाणी आॅक्टोबर महिन्यात सोडण्यात आल्याने महिनाभर धानाला प्रवाहित करून शेतकऱ्यांसह नागरिकांनासुद्धा पाणी मिळाले.उपसा सिंचन ठरू शकते जीवनदायीपागोरा, नेरला उपसा सिंचनचे पाणी चुलबंदसह नाल्यात सोडण्याचा प्रयोग करण्यात आला. मांगलीबांध, मचारणा, जेवनाळा, कवळी खैरी या भागात त्याचा प्रत्येय आला. १२ पंपापैकी तीन पंपानी पाणी उपसा करून एका पाण्याने जाणारी शेती वाचली. याचाच संदर्भ लक्षात घेवून जिल्ह्यातील इतरही धरणाचे पाणी टंचाईत आराखड्यात समाविष्ट करून सोडल्यास मोठा दिलासा मिळू शकतो.

टॅग्स :Damधरण