शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

कालव्यातील पाणी गळतीने वैरण सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 5:00 AM

  तुलसीदास रावते   लोकमत न्यूज नेटवर्क पवनारा : बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याला गळती लागली असून शेकडाे एकरात पाणी साचले आहे. ...

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : शेकडाे एकरात पाणीच पाणी

  तुलसीदास रावते  लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याला गळती लागली असून शेकडाे एकरात पाणी साचले आहे. शेतात असलेले वैरण या पाण्याने सडले असून आता जनावरांना चारा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उन्हाळी धानासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी आंदाेलनाच्या प्रवित्र्यात आहे. आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्यावर माेठ्या प्रमाणात सिंचन केले जाते. परंतु गत दाेन महिन्यांपासून कालव्याच्या मुख्य गेटला गळती लागली आहे. हजाराे लिटर पाणी कालव्यातून वाहून जात आहे. कालव्यातील हे पाणी पाटसऱ्यांच्या माध्यमातून शेतात शिरत आहे. शेतात सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. विशेष म्हणजे धानाची मळणी झाल्यानंतर माेठ्या प्रमाणात वैरण शेतातच हाेते. या पाण्याने तणसाचे ढिग सडले आहे. अशा परिस्थतीत वर्षभर जनावरांचा चारा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी धानाचे कडपा ओले झाल्याने शेतकऱ्यांना माेठा फटका बसला हाेता. आधीच निसर्गाच्या दृष्टचक्राने शेतकरी हतबल झाला आहे. मात्र बावनथडी प्रकल्पाचे अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी कृष्णकुमार रहांगडाले म्हणाले, आधी धानकडपा आणि आता तणस ओले हाेत आहे. वर्षभर जनावरांचा चारा कसा पुरवायचा असा प्रश्न असल्याचे सांगितले. बावनथडी प्रकल्पाच्या भाेंगळ कारभाराने शेतकरी त्रस्त झाल्याचे सरपंच प्रतिमा अशाेक ठाकूर यांनी सांगितले. २४ डिसेंबरला  बघेडा येथे आंदाेलन एकीकडे पाण्याचा अपव्यय हाेत असताना कारली वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळी धानासाठी पाणी मिळत नाही. बावनथडीचे पाणी सिंचनासाठी साेडले नाही तर २४ डिसेंबर राेजी बघेडा येथे आंदाेलन करण्याचा इशारा सरपंच प्रतिमा ठाकूर, उपसरपंच गाेपीचंद गायकवाड, सदन चाैधरी, कृष्णकुमार रहांगडाले, रतनलाल पारधी, दिनदयाल बिसने यांनी दिला आहे.

पाण्याचा अपव्ययगत दोन महिन्यांपासून कालव्याच्या मुख्य गेटमधून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत असून दुसरीकडे शेतकरी सिंचनासाठी पाणी मागत आहेत. मात्र त्यांना सिंचनासाठी पाणी सोडले जात नाही. प्रकल्प प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे एकीकडे शेतकरी पाण्यासाठी आंदोलनाची भूमीका घेत आहेत तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पagricultureशेती