शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

गोदामे हाऊसफुल्ल; धानाचे मोजमाप झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार भंडारा जिल्ह्यात पीक लागवडीखालील क्षेत्र २ लाख १० हजार हेक्टर आर आहे. यापैकी सुमारे १ लाख ...

प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार भंडारा जिल्ह्यात पीक लागवडीखालील क्षेत्र २ लाख १० हजार हेक्टर आर आहे. यापैकी सुमारे १ लाख ८२ हजार हेक्टर आर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात धानाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात तीन लाख पेक्षा अधिक शेतकरी संख्या आहे. मुख्य पीक धानाचे घेतले जाते. यात हलके, मध्यम व अधिक कालावधीच्या धानाची लागवड केली जाते. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत धानाचे उत्पन्न हाती येते. जिल्ह्यात खरीप व उन्हाळी हंगामात लाखो टन धानाचे उत्पादन होते. कुबेर नगरी तुमसर येथे राज्यातील सर्वात मोठी धानाची बाजारपेठ आहे. येथे हंगामात १२ हजार पेक्षा अधिक पोती धानाची आवक दिवसाला व्हायची.

धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना आठवडाभर प्रतीक्षा करावी लागायची. सकाळी ११ वाजता सुरू होणारे धानाचे मोजमाप दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहायचे; मात्र यंदा तशी स्थिती नाही. कारण राज्य शासनाने केंद्र शासनाच्या हमीभाव व्यतिरिक्त धानाला ७०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान (बोनस) वाढीची घोषणा केली. यानंतर २१ डिसेंबर रोजी या संदर्भात शासन परिपत्रक जारी केले.

शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान्य विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रति क्विंटल सातशे रुपये बोनस मिळणार आहे. याचा परिणाम, तसेच यंदा जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी त्यानंतर पिकांवर मोठ्या प्रमाणात झालेला मावा, तुडतुडा या किडींचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे तुमसर येथील बाजार समितीत धानाची आवक प्रचंड मंदावली आहे. आजस्थितीत तुमसर बाजार समिती येथे २५०० ते तीन हजार पोते धानाची आवक आहे, तर दुसरीकडे हमीभाव केंद्रावर धानाची प्रचंड आवक वाढली आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे भंडारा जिल्ह्यात ७५ हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहेत. आजपर्यंत आठ लाख क्विंटलपेक्षा अधिक धानाची खरेदी जिल्हा प्रशासनाने केली आहे. अनेक केंद्रावरील गोदामे भरल्याने धानाचे मोजमाप बंद आहे, तर हजारो पोते धान केंद्रावर असुरक्षितपणे विक्रीच्या प्रतीक्षेत पडून आहे. एकूणच महाआघाडी शासनाच्या सानुग्रह अनुदानामुळे तुमसरसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये धानाची आवक प्रचंड घटली असल्याचे बोलले जाते.

बॉक्स

हमीभावानुसारच चुकारे

सन २०२०-२१ हंगामासाठी केंद्र शासनाने साधारण धानाला १८६८, तर उच्चश्रेणी धानाला १८८८ रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. राज्य शासनाने ७०० रुपये प्रति क्विंटल धानाला भाववाढ केली आहे, पण सध्या केंद्रावर धान्य विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना १८६८ रुपये प्रति क्विंटल दराने चुकारे मिळत आहेत.