शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

५०० हेक्टर क्षमतेच्या तलावांची लीज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:34 IST

भंडारा आणि गोंदिया हे तलावाचे जिल्हे असून तलावांची लीज कमी करण्याची मागणी मासेमारी संस्थांनी केली होती. आता ५०० हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावांना लीज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची घोषणा : गोसे प्रकल्प दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भंडारा आणि गोंदिया हे तलावाचे जिल्हे असून तलावांची लीज कमी करण्याची मागणी मासेमारी संस्थांनी केली होती. आता ५०० हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावांना लीज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.भंडारा जिल्ह्यातील ५१८ कोटी ६४ लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण शनिवारी साकोली येथे करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात असलेल्या ५०० ते हजार हेक्टर क्षमतेच्या तलावांना ६०० तर हजार हेक्टरवरील तलावांसाठी ९०० रूपये लीज आकारली जाईल. तलावाचे कंत्राट केवळ मासेमारी संस्थांनाच देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोसे प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नसून येत्या दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाला निधी दिल्यामुळे ५० हजार हेक्टर सिंचन झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतकºयांना १२ ते १४ तास वीज देण्याची मागणी केली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते साकोली येथे तीन कोटी २३ लाख २३ हजार रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालय इमारतीचे लोकार्पण, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडेगाव येथे चार कोटी ९९ लाख २३ हजार रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कार्यशाळा व प्रशिक्षण इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील विविध रस्ते आणि विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.या सोहळ्याला विजय राहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे उपस्थित होते.धानाच्या तणसापासून इथेनॉल -नितीन गडकरीभंडारा येथे बॉयो एव्हीएशन फ्युल हब निर्माण करण्याचा माणस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यामुळे धानाच्या तणसापासून इथेलॉनची निर्मिती होवून धानाला पर्याय मिळेल. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तसेच तरूणांच्या हातांना काम मिळेल, शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.मुख्यमंत्री सडक योजनेत ७५० कोटींचे रस्तेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत ७५० कोटींचे रस्ते जिल्ह्याला देण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ४ लाख ६१ हजार परिवाराने शासकीय योजनांचा लाभ घेतला. दीड लाख शेतकऱ्यांना वर्ग २ ते वर्ग १ चा लाभ मिळाला. ९९ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगत भंडारा येथील महिला रुग्णालयासाठी ५० कोटी रुपये देण्यात आल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पChief Ministerमुख्यमंत्री