शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

तहसीलदारांच्या रुजू होण्याची प्रतीक्षा! आधी चौकशी नंतर रुजू हेच समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:41 IST

Bhandara : मोहाडीत चर्चा; सांगा साहेब, कामे होणार तरी कशी?

राजू बांते लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्याचे शासन निर्णय झाला. त्याला सतरा दिवस उलटूनही तहसीलदार प्राजक्ता बुरांडे रुजू झाल्या नाहीत. यामुळे मोहाडीकरांना त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा आहे.

मोहाडी तालुक्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, गाव पातळीवरील पुढाऱ्यांपासून तर वरिष्ठ नेत्यांपर्यंत सारेच अधिकाऱ्यांना त्रासवून सोडतात, असा समज रूढ झाला आहे. त्यामुळे अधिकारी वर्ग येथे येण्यास कचरतात, अशीही चर्चा आहे. अधिकारी महसूल विभागातील असो की, अन्य विभागातील; आधी चौकशी करूनच रुजू होत असल्याचा अनेकांचा जुना अनुभव आहे. यामुळेच तर कदाचित, नवनियुक्त तहसिलदार प्राजक्ता बोराडे यांच्या रुजू होण्याला येथे विलंब होत नसावा ना, अशीही शंका आता नागरिकांमध्ये घेतली जात आहे.

अधिकाऱ्यांची पदस्थापनामहसूल व वन विभागाने ७ फेब्रुवारी रोजी तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला. यातील सात अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी पाच महिला अधिकाऱ्यांची तहसीलदार म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राजक्ता बुरांडे यांच्या नावाचाही समावेश आहे. या महत्वाच्या पदावरील अधिकाऱ्याच्या रूजू होण्यातील विलंबामुळे प्रशासकीय कामे अडली आहेत. यावर प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

काय म्हणतो नियम !जिल्ह्यात बदली झाली असेल, तर तीन दिवसांत, जिल्ह्याबाहेर बदली झाली असेल तर सात दिवस बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे लागते, असा सर्वसामान्य नियम आहे. अधिकारी रूजू झाले नाहीत तर त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. पर्याप्त कारण असेल तर विभाग ते ग्राह्यही धरते. पर्याप्त कारण नसेल तर कारवाई होते. अनेकदा बदली होऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाच्या कामानिमित्त थांबवले किंवा शासनाच्या चुकीमुळे बदलीच्या ठिकाणी रूजू व्हायला विलंबही लागतो. अशा वेळी हा विलंब ग्राह्य धरला जातो.

१७ दिवस लोटले तरी पदावर रूजू नाहीतनिर्णय न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. सोयीची पदस्थापना बघणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा मार्ग दाखवला जावा, अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा