३३ अहवालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:01:04+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातून रविवारी १८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर यापुर्वी पाठविलेल्या १५ अशा ३३ अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तर जिल्ह्यातील विविध फ्ल्यु ओपीडीमध्ये तपासणी करण्यात आलेल्यापैकी तीव्र श्वासनदहाच्या ४८ व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

३३ अहवालाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत पाठविलेल्या २११ नमुन्यांपैकी १७८ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३३ अहवालाची प्रतीक्षा आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. हॉस्पिटल क्वारंटाईनमधून ११० व्यक्तींना तर आयसोलेशन वॉर्डातून ६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रभावी उपाययोजना करीत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून रविवारी १८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर यापुर्वी पाठविलेल्या १५ अशा ३३ अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तर जिल्ह्यातील विविध फ्ल्यु ओपीडीमध्ये तपासणी करण्यात आलेल्यापैकी तीव्र श्वासनदहाच्या ४८ व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ४७ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ३५ व्यक्तींचे नमूने निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. तर १२ व्यक्तींचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सध्या १८ व्यक्ती दाखल असून आतापर्यंत येथून ६३ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे तर नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात २७ व्यक्ती दाखल असून तेथून ११० व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. १ मार्च ते २० एप्रिल दरम्यान महानगर व परराज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या २२ हजार ३९५ झाली आहे. यापैकी दहा हजार ८८२ व्यक्तींचा होमक्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. ११ हजार ५७३ व्यक्ती गृहविलगीकरण कक्षात दाखल आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव भंडारा जिल्ह्यात होवू नये, जिल्हा कोरोनामुक्त रहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून जीवनावश्यक व्यवहार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.