शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

वैनगंगा झाली ‘प्रदूषणमय’

By admin | Updated: February 22, 2016 01:00 IST

जीवनदायीनी वैनगंगा नदी रासायनिक द्रव्य व पदार्थामुळे दूषित झाली असून नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.

पर्यटन व धार्मिकस्थळ माडगी येथील प्रकार : वैनगंगा स्वच्छ मिशन राबविण्याची गरजमोहन भोयर तुमसरजीवनदायीनी वैनगंगा नदी रासायनिक द्रव्य व पदार्थामुळे दूषित झाली असून नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. स्वच्छ गंगा अभियान राबविला जात आहे. वैनगंगा प्रदूषणमुक्त केव्हा होईल. मानवी जिवनासह पशूंचे आरोग्य धोक्यात आले आहे. मध्यप्रदेशातील शिवणी येथे वैनगंगेचा उगम होतो. बावनथडी नदी मध्यप्रदेशातूनच उगम होऊन बपेरा येथे बावनथडीचा संगम वैनगंगेत होते. बावनथडी नदीवर राजीव सागर धरण बांधण्यात आले. वैनगंगा नदीवर मांडगी येथे अदानी वीज समूह व राज्य शासनाचा संयुक्त धापेवाडा सिंचन प्रकल्प किंमत ४५० कोटी बांधण्यात आला. बॅरेजमुळे पाणी अडविण्यात आले. बॅरेजच्या पलीकडे पाण्याचा नदीत ठणठणाट आहे तर बॅरेजच्या अलीकडे अथांग पाणी आहे. नियमानुसार नदीचा प्रवाह बंद करता येत नाही, म्हणून अतिशय बारिक धारेच्या नदीत प्रवाह २४ तास सुरु राहतो, परंतु ही धार नदीत पाहिजे तसा पाणी उपलब्ध करु शकत नाही.माडगी येथे भगवान नृसिंह व विरसिंहाचे जागृत मंदिर असून तिर्थस्थळ आहे. येथे दररोज शेकडो भावीक भेट देतात. मृत्यू पश्चात संस्कार म्हणून दररोज येथे पिंडदान कार्यक्रम होतात. मंदिराच्या अगदी पायथ्याशी रासायनिक द्रव्य व पदार्थाचा भला मोठा थर येथे जमला आहे. परिसरातील नदीपात्रात असा थर सर्वत्र दिसतो. नदी पात्रही अस्वच्छ आहे. कागद, प्लॉस्टिक पिशव्यांचा येथे खच पडून आहे. नदीपात्रातून रेती माफीयांच्या आर्शिवादाने रेती गायब झाली आहे. नदी पात्रात वाळू ऐवजी माती दिसत आहे. अनेक भाविक नदीपात्रात चारचाकी व दूचाकी वाहने घेऊन जातात. स्वच्छतेचा मंत्र सध्या देशात गाजत आहे, परंतु मिनी कन्याकुमारी व मिनी पंढरीकडे शासन, प्रशासन तथा स्वयंसेवी संस्थेचे सुध्दा दुर्लक्ष दिसत आहे. स्थानिक व परिसरातील लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीपूर्वी (पंचायत समिती, जिल्हा परिषद) गावागावात झाडू घेऊन गाव स्वच्छ करण्यात हिराहिरीने सहभागी होत होते ते सध्या गायब झाले आहेत.तुमसर तालुक्यातून वैनगंगेच्या सुमारे ६० ते ७० किमीचा प्रवास करते. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी येथूनच पूरविले जाते. जलकुंभाच्या विहिरी नदीपात्रात तयार केल्या आहेत. रासायनिक द्रव्य तथा पदार्थ नदी पात्रात मिसळल्याने निश्चितच मानव व पशुंच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे रासायनिक द्रव्य व पदार्थ कुठून वाहत आले याची माहिती प्रशासनाने घेण्याची गरज आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सीमा येथे आहेत तर माडगी व देव्हाडा घाट तुमसर व मोहाडी तालुक्यात येतो. शेकडो भाविक व पर्यटक येथे भेट देतात. तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर हे स्थळ असल्याने अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी येथूनच प्रवास करतात, परंतु त्यांचे नदी पात्राकडे दुर्लक्ष होणे गंभीर बाब आहे.येथे दोन्ही तालुका प्रशासन व लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थानी वैनगंगा स्वच्छ मिशन राबविण्याची गरज आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे संवर्धन करण्यासाठी वैनगंगा महोत्सवची रूपरेखा आखली आहे, हे येथे विशेष. त्यामुळे जिल्ह्याची जिवनवाहिनीला स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याची गरज आहे.नदी पात्रात पाणी वाहण्याची गती अत्यंत कमी असल्याने शेवाळासह इतर वनस्पतीची येथे झपाट्याने वाढ होत आहे. येथील पाण्याच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्यास अंगाला खाज सुटते. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य असेल काय? असा प्रश्न पडतो. येथील पाण्याचे नमूने घेऊन प्रयोगशाळेत पाठवून नेमके उत्तर शोधता येईल. परंतु राजकीय इच्छाशक्तीची व अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावण्याची मानसिकता तयार करावी लागेल. नेमची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे कामं केली तर सर्व प्रश्न नक्कीच अनुत्तरीत राहतील. हेच खरे.