शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

खडकाळ शेतजमिनीवर फुलविली भाजीपाला बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:41 IST

परंपरागत भातशेतीला फाटा देत खडकाळ जमिनीवर ३२ एकरात बागायती शेती फुलविण्याची किमया मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव शिवारात बंडू बारापात्रे यांनी केली.

ठळक मुद्देडोंगरदेव शिवार : शेतकऱ्याने भाजीपाला उत्पादनातून साधला प्रगतीचा मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परंपरागत भातशेतीला फाटा देत खडकाळ जमिनीवर ३२ एकरात बागायती शेती फुलविण्याची किमया मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव शिवारात बंडू बारापात्रे यांनी केली. भाजीपाला उत्पादनातून त्यांनी प्रगतीचा मार्ग साधला असून शेतकऱ्यांना परंपरागत शेती सोडून नगदी पिकाकडे वळण्यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात.भंडारा जिल्हा म्हणजे भातशेती असे समीकरण झाले आहे. शेतकरी परंपरागत भात शेतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही पीकाचा विचार करीत नाही. त्यामुळे सातत्याने आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी बिटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी आपल्या शेतात प्रयोग केला आहे. खडकाळ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ३२ एकरात त्यांनी भाजीपाला उत्पादनाचा प्रयोग सुरु केला. आज त्यांच्या शेतात विविध भाजीपाला पिकांसह फळबागही फुलली आहे.जिल्ह्यात त्यांनी नवा आदर्श निर्माण केला असून आज त्यांचे शेत म्हणजे कृषीविभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा झाली आहे. या शेतात पोहचताच हिरवेगार शेत डोळ्याला सुखावते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत त्यांनी शेती पिकविली आहे. शेतकºयांनी जे बाजारात विकते तेच पिकवावे असा सल्ला बंडू बारापात्रे देतात. भाजीपाला पिकाला जिल्ह्यात चांगली मागणी आहे. केवळ ४० दिवसापासून नगदी उत्पन्न देणारे यासारखे दुसरे पीक नाही असे ते सांगतात. या शेतात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मल्चिंग पेपर व ड्रिपचा उपयोग केला आहे.उच्चदर्जाचा भाजीपाला पिकविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भेंडी पिकातून त्यांनी चांगले उत्पन्न मिळाले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भेंडीलाचांगला भाव मिळतो. यामुळे शेतकऱ्यांनी आतापासून योग्य नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.डोंगरदेव येथील माझ्या ३२ एकरात बागायती शेती केली आहे. दररोज किमान १५ ते २० हजार रुपयाचे उत्पन्न हातात येत आहे. दोन एकरात लावलेल्या पपईतून ११ लाख ८५ हजार रुपयांचे उत्पन्न वर्षभरात हातात आले. आता शेतकऱ्यांनी शेतीत बदल स्वीकारून भाजीपाला पिकासाठी पुढे येणे गरजेचे आहे.- बंडू बारापात्रे,अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी