लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत नऊ महिन्यांपासून कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजविला आहे. या भयानक महामारी पासून बचावात्मक उपाय म्हणून सर्वात प्रथम मास्कचा उपयोग प्रामुख्याने करावा, असे आवाहन नेहमी करण्यात येते. मात्र या मास्क वापराने साथरोगांचा फैलाव कमी करता येतो, अशी बाब आता समोर येऊ लागली आहे. सध्या जिल्ह्यात ११ हजार ९६२ रुग्णांची संख्या झाली आहे.राज्यशासन असो की जिल्हा प्रशासन कोरोनापासून बचावासाठी मास्क आपला मुख्य संरक्षक आहे, मात्र सदैव आणि योग्य वापर करावा, असे आवाहन नेहमी करण्यात येते यासोबत साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत कमी वीस सेकंद हात धुवावे, अल्कोहोल युक्त हॅन्ड सनीटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने नेहमी करण्यात येते. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांकडून माहिती विचारली असता कोरूना संक्रमण काळात मास्कचे नियमित वापर आपण करीत आहोत मात्र सातत्याने वापर केल्यास साथ रोगांचा फैलाव आपण टाळू शकतो. याबाबत नागरिकांनीही त्याला प्रतिसाद देत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ओपीडी मध्ये रुग्ण संख्या घटल्याचेही वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.
मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळामास्कच्या वापराने कोरोना संसर्गाचा फायदा कमी करण्यास मदत तर होतेच याशिवाय स्वाइन फ्लू एलर्जी यासह हवेमुळे होणारे अन्न संसर्गही होत नाही कुठल्याही क्लिप पासून या मासमुने आपला बचाव होऊ शकतो परिणामी रुग्णांची संख्या सातत्याने घटून सुरक्षित वातावरण निर्मिती होऊ शकते यावर नागरिकांमध्ये जनजागृती करणे अतिआवश्यक आहे.
विषाणूजन्य आजारकोरोना संकटकाळात विषाणूजन्य आजाराचे रुग्ण थोड्या फार कमी प्रमाणात आढळले असले तरी स्वाइन फ्लू, टीव्ही यासह अन्य रुग्णही थोड्याफार प्रमाणात पहावयास मिळाले जास्त वापर सातत्याने होत असल्याने अन्य विषाणूजन्य तापाची साथ असो किंवा अन्य संसर्ग त्यावर काही प्रमाणात आळा घालता येऊ शकला आहे.
कोरोना संकट काळात मास्त वापर करावा, असे आवाहन नेहमी करण्यात येत असते. या सोबतच इतर व्हायरल आजार देखील या मास्कमुळे रोखता येऊ शकतात. विशेषतः विषाणूजन्य आजारांना यामुळे हमखास आळा बसू शकतो.- डॉ निखिल डोकरीमारे,आरएमओ, बाह्यरुग्ण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा