शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

■ अपुऱ्या अव्यवस्थेमुळे धानाची पोती उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST

चुल्हाड (सिहोरा) : धान उत्पादक पट्ट्यातील सिहोरा परिसरात गोदामाच्या अभावाने धानाची पोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. या ...

चुल्हाड (सिहोरा) : धान उत्पादक पट्ट्यातील सिहोरा परिसरात गोदामाच्या अभावाने धानाची पोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. या धानाच्या पोत्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. येथील अपुऱ्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात येत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.

सिहोरा परिसरात बारमाही सिंचनाची सोय असल्याने शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. चांदपूर जलाशयाचे पाणी खरीप आणि उन्हाळी धान पिकांना वितरित करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता तथा कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कृती आराखड्याने परिसरातील शेत-शिवारात पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे परिसरात धानाचे उत्पादन अधिक प्रमाणात शेतकरी घेत आहेत. खरीप आणि उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरीप हंगामातील धान खरेदीने हाऊसफुल्ल असणारे खाजगी गोदाम रिकामे करण्यात येत नाही. यामुळे तीन महिन्यांच्या अवधीत पुन्हा उन्हाळी धान खरेदी प्रक्रिया येत असल्याने संस्थाना पोती सुरक्षित ठेवण्यात अडचणी येत आहेत. या परिसरात धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धानाची पोती उघड्यावर ठेवण्यात आली असली तरी बहुतांश पोत्यांना वाळवी लागली असल्याचे चित्र आहे. उघड्यावर असणाऱ्या पोत्यांची नासधूस जनावरे करीत आहेत. खरेदी केलेल्या धानाची पोती शासनाच्या अखत्यारीत येत असली तरी बारदानाअभावी केंद्राबाहेर असणारी पोती शेतकऱ्यांची आहेत. या पोत्यांची जनावरांनी नासधूस केली आहे. अवकाळी पावसाचा फटकाही या पोत्यांना बसला आहे. सिहोरा परिसरात गोदाम नसल्याने हे विदारक चित्र निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

काखेत कळसा अन् गावाला वळसा

शासकीय इमारतीचे बांधकाम करताना जागेची समस्या येत आहे. परंतु जागेची समस्या गावात नाही. गावात आता सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, सभामंडपाचा अनुशेष नाही. बांधकाम मंजुरीचा अतिरेक होताना दिसून येत आहे. गावकुशीबाहेरील रस्ते सिमेंटचे झाले आहेत. कंत्राटदार पांदण रस्तेही सिमेंटचे करण्याच्या नादात आहेत. परंतु शेतकऱ्यांची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी गोदाम निर्मितीला विकासाच्या श्रेणीत आणले जात नाही. यामुळे अवकाळी पावसाचा कहर सुरू होताच शेतकऱ्यांचे रडगाणे सुरू होत आहे.