शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

■ अपुऱ्या अव्यवस्थेमुळे धानाची पोती उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST

चुल्हाड (सिहोरा) : धान उत्पादक पट्ट्यातील सिहोरा परिसरात गोदामाच्या अभावाने धानाची पोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. या ...

चुल्हाड (सिहोरा) : धान उत्पादक पट्ट्यातील सिहोरा परिसरात गोदामाच्या अभावाने धानाची पोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. या धानाच्या पोत्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. येथील अपुऱ्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात येत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.

सिहोरा परिसरात बारमाही सिंचनाची सोय असल्याने शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. चांदपूर जलाशयाचे पाणी खरीप आणि उन्हाळी धान पिकांना वितरित करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता तथा कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कृती आराखड्याने परिसरातील शेत-शिवारात पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे परिसरात धानाचे उत्पादन अधिक प्रमाणात शेतकरी घेत आहेत. खरीप आणि उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरीप हंगामातील धान खरेदीने हाऊसफुल्ल असणारे खाजगी गोदाम रिकामे करण्यात येत नाही. यामुळे तीन महिन्यांच्या अवधीत पुन्हा उन्हाळी धान खरेदी प्रक्रिया येत असल्याने संस्थाना पोती सुरक्षित ठेवण्यात अडचणी येत आहेत. या परिसरात धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धानाची पोती उघड्यावर ठेवण्यात आली असली तरी बहुतांश पोत्यांना वाळवी लागली असल्याचे चित्र आहे. उघड्यावर असणाऱ्या पोत्यांची नासधूस जनावरे करीत आहेत. खरेदी केलेल्या धानाची पोती शासनाच्या अखत्यारीत येत असली तरी बारदानाअभावी केंद्राबाहेर असणारी पोती शेतकऱ्यांची आहेत. या पोत्यांची जनावरांनी नासधूस केली आहे. अवकाळी पावसाचा फटकाही या पोत्यांना बसला आहे. सिहोरा परिसरात गोदाम नसल्याने हे विदारक चित्र निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

काखेत कळसा अन् गावाला वळसा

शासकीय इमारतीचे बांधकाम करताना जागेची समस्या येत आहे. परंतु जागेची समस्या गावात नाही. गावात आता सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, सभामंडपाचा अनुशेष नाही. बांधकाम मंजुरीचा अतिरेक होताना दिसून येत आहे. गावकुशीबाहेरील रस्ते सिमेंटचे झाले आहेत. कंत्राटदार पांदण रस्तेही सिमेंटचे करण्याच्या नादात आहेत. परंतु शेतकऱ्यांची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी गोदाम निर्मितीला विकासाच्या श्रेणीत आणले जात नाही. यामुळे अवकाळी पावसाचा कहर सुरू होताच शेतकऱ्यांचे रडगाणे सुरू होत आहे.