शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

■ अपुऱ्या अव्यवस्थेमुळे धानाची पोती उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST

चुल्हाड (सिहोरा) : धान उत्पादक पट्ट्यातील सिहोरा परिसरात गोदामाच्या अभावाने धानाची पोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. या ...

चुल्हाड (सिहोरा) : धान उत्पादक पट्ट्यातील सिहोरा परिसरात गोदामाच्या अभावाने धानाची पोती खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. या धानाच्या पोत्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. येथील अपुऱ्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात येत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.

सिहोरा परिसरात बारमाही सिंचनाची सोय असल्याने शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. चांदपूर जलाशयाचे पाणी खरीप आणि उन्हाळी धान पिकांना वितरित करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता तथा कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कृती आराखड्याने परिसरातील शेत-शिवारात पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे परिसरात धानाचे उत्पादन अधिक प्रमाणात शेतकरी घेत आहेत. खरीप आणि उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरीप हंगामातील धान खरेदीने हाऊसफुल्ल असणारे खाजगी गोदाम रिकामे करण्यात येत नाही. यामुळे तीन महिन्यांच्या अवधीत पुन्हा उन्हाळी धान खरेदी प्रक्रिया येत असल्याने संस्थाना पोती सुरक्षित ठेवण्यात अडचणी येत आहेत. या परिसरात धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धानाची पोती उघड्यावर ठेवण्यात आली असली तरी बहुतांश पोत्यांना वाळवी लागली असल्याचे चित्र आहे. उघड्यावर असणाऱ्या पोत्यांची नासधूस जनावरे करीत आहेत. खरेदी केलेल्या धानाची पोती शासनाच्या अखत्यारीत येत असली तरी बारदानाअभावी केंद्राबाहेर असणारी पोती शेतकऱ्यांची आहेत. या पोत्यांची जनावरांनी नासधूस केली आहे. अवकाळी पावसाचा फटकाही या पोत्यांना बसला आहे. सिहोरा परिसरात गोदाम नसल्याने हे विदारक चित्र निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

काखेत कळसा अन् गावाला वळसा

शासकीय इमारतीचे बांधकाम करताना जागेची समस्या येत आहे. परंतु जागेची समस्या गावात नाही. गावात आता सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, सभामंडपाचा अनुशेष नाही. बांधकाम मंजुरीचा अतिरेक होताना दिसून येत आहे. गावकुशीबाहेरील रस्ते सिमेंटचे झाले आहेत. कंत्राटदार पांदण रस्तेही सिमेंटचे करण्याच्या नादात आहेत. परंतु शेतकऱ्यांची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी गोदाम निर्मितीला विकासाच्या श्रेणीत आणले जात नाही. यामुळे अवकाळी पावसाचा कहर सुरू होताच शेतकऱ्यांचे रडगाणे सुरू होत आहे.