शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

दोन हजार शिक्षक जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी ठरतात पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST

शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ चे शिक्षक बदली धोरण रद्द करून नवीन धोरण ठरविले आहे. हे धोरण ठरविण्यासाठी पुणे येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट तयार करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२०मध्ये या अभ्यास गटाने राज्य व विभाग स्तरावरील शिक्षक संघटना, जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी, त्या विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बदली धोरण ठरविण्यासाठी शिफारशी मागितल्या.

ठळक मुद्दे६०० बदल्यांची शक्यता : सोयीनुसार बदल्यांच्या विचाराने मतमतांतरे

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाकडून जिल्हा परिषदेच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या नवीन धारेणानुसार सूचना जाहीर केल्या आहेत. या नव्या धोरणानुसार एकाच शाळेत पाच वर्षे सेवा झालेले जवळपास दोन हजार शिक्षक पात्र ठरणार असून त्यातील ६०० शिक्षकांचीबदली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नव्या धोरणात बऱ्याच सुधारणा असल्या तरीही सोयीनुसार बदली व्हावी, या विचारानेच बदली प्रक्रियेत मतमतांतरे कायम आहेत.शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ चे शिक्षक बदली धोरण रद्द करून नवीन धोरण ठरविले आहे. हे धोरण ठरविण्यासाठी पुणे येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट तयार करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२०मध्ये या अभ्यास गटाने राज्य व विभाग स्तरावरील शिक्षक संघटना, जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी, त्या विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बदली धोरण ठरविण्यासाठी शिफारशी मागितल्या. त्यानुसार शिक्षकांच्या बदलीचे नवीन धोरण निश्चित करण्यात आले. आता या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील ८१७ शाळांतील दोन हजार  शिक्षक बदलीस पात्र ठरणारे आहेत. यातील जवळपास सहाशे शिक्षकांची बदली होणार आहे. या नवीन धोरणाबाबतही शिक्षकांची कुरबूर सुरूच आहे.सध्या शिक्षकवर्ग विद्यार्थी शोधासाठी धावपळ करीत आहेत. अशात आता नवीन धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्या आल्याने चर्चेला उधाण आहे. 

कोणते बदल अपेक्षित आहे?यापूर्वीच्या बदल्यांमध्ये विस्थापित किंवा रॅण्डम पद्धतीने ज्या शिक्षकांची गैरसोय झाली, अशांना यावर्षीच्या बदली प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. महिलांसाठी प्रतिकूल क्षेत्र घोषित केले पाहिजे. प्रतिकूल क्षेत्रात सेवा केलेल्या शिक्षिकांना यावर्षी सेवा कालावधीची अट न लावता विनंतीने बदली दिली पाहिजे. ३१ मे ऐवजी ३० जूनपर्यंतची सेवा बदलीसाठी ग्राह्य धरावी. जे आंतर जिल्हा बदली झालेत, त्यांच्यासाठी दहा वर्षे सेवेची अट बाळगावी. यापूर्वीच्या धोरणाप्रमाणे अवघड पाच मुख्य क्षेत्रात तीन वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना यावर्षी बदलीची संधी द्यावी. पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत अर्ज करण्याची तदतूद असावी. 

काय बदल केले?एकाच शाळेत पाच वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांचीच बदली होणार. शिक्षकांचा नोकरीत नसणारा जोडीदार दिव्यांग, मानसिक विकलांग किंवा व्याधीग्रस्त असल्यास त्या शिक्षकाला विशेष संवर्ग भाग-१ चा फायदा मिळणार. माजी सैनिक असणारे जे शिक्षक आहेत त्यांनाही विशेष संवर्ग-१ चा लाभ मिळणार. बदली प्रक्रिया राबविताना प्रत्येक टप्प्यावर रिक्त जागा दिसणार असल्याने शिक्षक विस्थापित होणार नाही. तसेच संवर्ग-१ व २ यांनी एकदा बदली घेतल्याने पुढील तीन वर्षे बदली घेणार नाही. 

मागील बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या शिक्षकांना बदलीची संधी मिळावी. ३१ मे ऐवजी ३० जून ही तारीख ग्राह्य धरावी. यासोबत प्रशासकीय बदलीसाठी ५ वर्षे व विनंती बदलीसाठी तीन वर्षे एकाच शाळेतील सेवा आवश्यक ठरावी. महिला शिक्षकांकरिता प्रतिकूल क्षेत्र घोषित करावे व त्यांनाही संधी द्यावी.-मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा

 

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली