शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पावणेतीन कोटींच्या धान घोटाळ्यात १५ जणांवर गुन्हा; दोन ग्रेडरवर अटकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:32 IST

आंबागड येथील प्रकरण

तुमसर (भंडारा) : नाकाडोंगरी येथील धान खरेदी केंद्रात सुमारे चार कोटींचा अपहार झाल्याची शाई वाळत नाही तोच तुमसर तालुक्यातील आंबागड येथे आधारभूत धान खरेदी केंद्रात दोन कोटी ७१ लाख ३४ हजार रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली. जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकूण १५ जणांचा समावेश असून दोन ग्रेडर यांना अटक करण्यात आली आहे.

अरविंद भगवान दास भुतांगे व स्वप्निल राजेश शामकुवर दोन्ही रा. आंबागड अशी अटक केलेल्या ग्रेडर यांची नावे आहेत. अन्य जणांवर गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये राधेशाम तोलाजी रहांगडाले (अध्यक्ष), संचालक म्हणून गोपीचंद कवळू बावनकर, सुधीर चंदुलाल ठाकरे, संजय फत्तु कावळे, निलकंठ रतिराम मोरे, घनशाम झागडुसाव जांभुळपाने, राजेश सुखराम शामकुवर, नंदलाल डोमाजी रहांगडाले, बुधराज पंढरी पटले, श्रीपत अंतु कोकोडे, गणेश उदेसिंग पंचरे, रत्नमाला भगवान भुतांगे, सचिव अनिल तोलाजी रहांगडाले तर ग्रेडर अरविंद भगवानदास भुतांगे व स्वप्नील राजेश शामकुवर यांचा समावेश आहे.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आंबागड, ता. तुमसर या नावाने असलेल्या संस्थेमध्ये असलेल्या १५ जणांनी संगनमत करून आंबागड येथे धान खरेदी केंद्र असलेल्या धान खरेदी हंगाम सन २०२१-२०२२ मध्ये खरीप हंगामाचे प्रत्यक्ष धान खरेदी न करता धान खरेदी केल्याचे खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची व मार्केटिंग फेडरेशन व शेतकऱ्याची दोन कोटी ७१ लाख ३४ हजार ४३८ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी १५ जणांविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन राजकुमार करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीfraudधोकेबाजीFarmerशेतकरीbhandara-acभंडाराCrime Newsगुन्हेगारी