शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मृत्यूच्या दाढेत दोन कुटुंबांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:28 IST

प्रत्येकाला घर असे शासनाकडून सांगण्यात येत आहे, पंरतु रेंगेपार येथील दोन कुटुंब वैनगंगेच्या अगदी काठावरील घरात वास्तव्याला आहेत. साक्षात मृत्यूच्या दाढेत राहत असून १३ पैकी ११ कुटुंबांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळाला.

ठळक मुद्देवैनगंगा नदी काठावरील रेंगेपार येथील प्रकार : १३ पैकी ११ परिवारांना मिळाले घरकूल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाला घर असे शासनाकडून सांगण्यात येत आहे, पंरतु रेंगेपार येथील दोन कुटुंब वैनगंगेच्या अगदी काठावरील घरात वास्तव्याला आहेत. साक्षात मृत्यूच्या दाढेत राहत असून १३ पैकी ११ कुटुंबांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळाला. केवळ दोन कुटुंबांना नियमात बसत नाही म्हणून वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यापैकी एक विधवा महिला आहे. वैनगंगा नदीला सध्या पूर आला आहे. सदर पुरात घर वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मले घर देता का जी घर, असा आर्त टाहो महिलेने फोडला आहे.तुमसर तालुक्यात रेंगेपार (पांजरा) असे १३०० लोकवस्तीचे गाव आहे. अगदी नदी काठावर येथे १३ घरे आहेत. मागील २० वर्षापासून १३ कुटुंबे येथे वास्तव्याला होती. दिवसेंदिवस वैनगंगा नदीचे पात्र सोडून गावाच्या दिशेने झपाट्याने सरकत गेली. सध्या वैनगंगा नदीचे पात्र गावाजवळ भिडले आहे. १३ कुटुंबात १०२ सदस्यांचा समावेश होता. आंदोलने केल्यानंतर प्रशासनाने गावाशेजारी पंतप्रधान आवास योजनेतून ११ कुटुंबांना घरकुल मंजूर केली, पंरतु दोन कुटुंबांना नियमांचा आधार घेत घरकुल मंजूर केले नाही.या कुटुंबात विधवा महिला कलाबाई शेंडे व गुलाब कावळे यांचा समावेश आहे. कलाबाई यांच्या कुटुंबात दोन तर कावळे यांच्या कुटुंबात सहा सदस्यांचा समावेश आहे. दोन्ही कुटुंबांची घरे नदी काठावर असून नदी व घरांचे अंतर केवळ एका फुटापेक्षाही कमी आहे. घराचे मागील दार उघडले तर नदी समोर दिसते. भयाणस्थितीत दोन्ही कुटुंब वास्तव्य करीत आहेत. वैनगंगेचा प्रवाह भूखंड नदीकाठावर आदळतो. त्यामुळे खालील माती पाण्यासोबत वाहून जात आहे. त्यामुळे भूस्खलनाचा येथे मोठा धोका आहे.शासनाने येथे वरिष्ठ अधिकाºयांचे पथक पाठवून पाहणी केली होती. त्यानंतर ११ कुटुंबांना घरकुल मंजूर केली. धोकादायक घरे असा उल्लेख शासनदप्तरी नोंद आहे हे विशेष. राज्याच्या विधीमंडळात व संसदेत येथील घरांचा प्रश्न येथील लोकप्रतिनिधींनी मांडला होता. त्या अनुषंगाने कारवाई झाली, परंतु दोन कुटूंबाना कोणता नियम आडवा येत आहे. याचे उत्तर प्रशासनाकडून मिळाले नाही. घरकूल यादीतील प्रतिक्षा यादीतही दोन कुटुंबांची नावे नाहीत.कलाबाई यांनी आम्हाला जलसमाधीशिवाय पर्याय दिसत नाही, अशा वेदना बोलून दाखविल्या. घर देता का घर, अशी विनंती करुनही त्यांचा लाभ मिळत नाही अशी व्यथा डोळ्यात अश्रू आणून कलाबाईनी मांडली. 'शासन प्रत्येकाले घर देईन म्हणते, मले कव्हा भेटन' अशा शब्दात त्यांनी शासन व प्रशासनाकडे मागणी केली आहे. माझी मृत्यूशी दररोज भेट होते, परंतु सरकारशी भेट होत नाही, अशी खंत कलाबाईनी व्यक्त केली.रेंगेपार येथील १३ पैकी ११ कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. दोन कुटूंबाना ते नाकारण्यात आले. नियमांचा आधार घेऊन त्यांना घरकूल मंजूर केले नाही. नदीपात्रात दोन्ही घरे समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे. अनर्थ घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. मानवी दृष्टीकोनातून वरिष्ठ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी येथे विचार करावा.-हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य, तुमसर