शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

मृत्यूच्या दाढेत दोन कुटुंबांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:28 IST

प्रत्येकाला घर असे शासनाकडून सांगण्यात येत आहे, पंरतु रेंगेपार येथील दोन कुटुंब वैनगंगेच्या अगदी काठावरील घरात वास्तव्याला आहेत. साक्षात मृत्यूच्या दाढेत राहत असून १३ पैकी ११ कुटुंबांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळाला.

ठळक मुद्देवैनगंगा नदी काठावरील रेंगेपार येथील प्रकार : १३ पैकी ११ परिवारांना मिळाले घरकूल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाला घर असे शासनाकडून सांगण्यात येत आहे, पंरतु रेंगेपार येथील दोन कुटुंब वैनगंगेच्या अगदी काठावरील घरात वास्तव्याला आहेत. साक्षात मृत्यूच्या दाढेत राहत असून १३ पैकी ११ कुटुंबांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळाला. केवळ दोन कुटुंबांना नियमात बसत नाही म्हणून वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यापैकी एक विधवा महिला आहे. वैनगंगा नदीला सध्या पूर आला आहे. सदर पुरात घर वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मले घर देता का जी घर, असा आर्त टाहो महिलेने फोडला आहे.तुमसर तालुक्यात रेंगेपार (पांजरा) असे १३०० लोकवस्तीचे गाव आहे. अगदी नदी काठावर येथे १३ घरे आहेत. मागील २० वर्षापासून १३ कुटुंबे येथे वास्तव्याला होती. दिवसेंदिवस वैनगंगा नदीचे पात्र सोडून गावाच्या दिशेने झपाट्याने सरकत गेली. सध्या वैनगंगा नदीचे पात्र गावाजवळ भिडले आहे. १३ कुटुंबात १०२ सदस्यांचा समावेश होता. आंदोलने केल्यानंतर प्रशासनाने गावाशेजारी पंतप्रधान आवास योजनेतून ११ कुटुंबांना घरकुल मंजूर केली, पंरतु दोन कुटुंबांना नियमांचा आधार घेत घरकुल मंजूर केले नाही.या कुटुंबात विधवा महिला कलाबाई शेंडे व गुलाब कावळे यांचा समावेश आहे. कलाबाई यांच्या कुटुंबात दोन तर कावळे यांच्या कुटुंबात सहा सदस्यांचा समावेश आहे. दोन्ही कुटुंबांची घरे नदी काठावर असून नदी व घरांचे अंतर केवळ एका फुटापेक्षाही कमी आहे. घराचे मागील दार उघडले तर नदी समोर दिसते. भयाणस्थितीत दोन्ही कुटुंब वास्तव्य करीत आहेत. वैनगंगेचा प्रवाह भूखंड नदीकाठावर आदळतो. त्यामुळे खालील माती पाण्यासोबत वाहून जात आहे. त्यामुळे भूस्खलनाचा येथे मोठा धोका आहे.शासनाने येथे वरिष्ठ अधिकाºयांचे पथक पाठवून पाहणी केली होती. त्यानंतर ११ कुटुंबांना घरकुल मंजूर केली. धोकादायक घरे असा उल्लेख शासनदप्तरी नोंद आहे हे विशेष. राज्याच्या विधीमंडळात व संसदेत येथील घरांचा प्रश्न येथील लोकप्रतिनिधींनी मांडला होता. त्या अनुषंगाने कारवाई झाली, परंतु दोन कुटूंबाना कोणता नियम आडवा येत आहे. याचे उत्तर प्रशासनाकडून मिळाले नाही. घरकूल यादीतील प्रतिक्षा यादीतही दोन कुटुंबांची नावे नाहीत.कलाबाई यांनी आम्हाला जलसमाधीशिवाय पर्याय दिसत नाही, अशा वेदना बोलून दाखविल्या. घर देता का घर, अशी विनंती करुनही त्यांचा लाभ मिळत नाही अशी व्यथा डोळ्यात अश्रू आणून कलाबाईनी मांडली. 'शासन प्रत्येकाले घर देईन म्हणते, मले कव्हा भेटन' अशा शब्दात त्यांनी शासन व प्रशासनाकडे मागणी केली आहे. माझी मृत्यूशी दररोज भेट होते, परंतु सरकारशी भेट होत नाही, अशी खंत कलाबाईनी व्यक्त केली.रेंगेपार येथील १३ पैकी ११ कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. दोन कुटूंबाना ते नाकारण्यात आले. नियमांचा आधार घेऊन त्यांना घरकूल मंजूर केले नाही. नदीपात्रात दोन्ही घरे समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे. अनर्थ घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. मानवी दृष्टीकोनातून वरिष्ठ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी येथे विचार करावा.-हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य, तुमसर