शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

अडीच हजार शेतकरी नवीन वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:02 PM

सिंचनातून समृध्दीचे स्वप्न पाहत शेकडो शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीकडे अर्ज दिले. साकोली उपविभागातील अडीच हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अडीच वर्षात एकाही शेतकऱ्याच्या कृषी पंपाला वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष खदखदत आहे.

ठळक मुद्देसाकोली उपविभाग : अडीच वर्षात एकही जोडणी नाही

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : सिंचनातून समृध्दीचे स्वप्न पाहत शेकडो शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीकडे अर्ज दिले. साकोली उपविभागातील अडीच हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अडीच वर्षात एकाही शेतकऱ्याच्या कृषी पंपाला वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष खदखदत आहे.शासनाने वीज जोडणीचा अनुशेष दूर करण्यासाठी धडक योजना हाती घेतली आहे. साकोली उपविभागातील लाखनी, लाखांदूर आणि साकोली तालुक्यातील सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे रितसर अर्ज जून २०१६ पूर्वी दाखल केले. मात्र अद्यापही त्यांना वीज जोडणी मिळाली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध केली आहे. परंत वीज जोडणी अभावी त्यांना सिंचन करुन हंगामात दोन पीक घेता येणे अशक्य झाले आहे.पालांदूर महावितरण कार्यालयांतर्गत परिसरातील शेतकऱ्यांना ३१ महिन्यांपासून वीज जोडणी मिळाली नाही. डिमांड भरुन इतके दिवस लोटूनही महावितरणकडे शेतकऱ्यांना जोडणी देण्यास वेळ नाही. यापरिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बोअरवेल, विहिर खोदून पाण्याची व्यवस्था केली. परंतू पाण्याअभावी त्यांचे उत्पन्न वाढू शकत नाही. पालकमंत्र्यांनी याबाबत अनेकदा लेखी सुचना दिल्या आहेत. परंतु त्याचा फायदा शेतकºयांना झाला नाही.महावितरण कार्यालयाअंतर्गत साकोली विभागातील साकोली, लाखनी, लाखांदूर या तीन तालुक्यातील अडीच हजार शेतकरी डिमांड भरुन वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अलीकडे तर महावितरण कंपनीने डिमांड देणेच बंद केले. या सर्व प्रकारामुळे शेतकरी मेटाकूटीस आले आहे. वीज वितरण कार्यालयात शेतकºयांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात.शेतात वीज खांब मात्र जोडणी नाहीपालांदूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वीज खांब उभे आहेत. परंतू वीज कनेक्शन देणे बंद आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच आता वीज वितरण कंपनी एका शेतकऱ्याला एक रोहित्र देण्याचे धोरण आखत आहे. यातून केवळ कंत्राटदाराला फायदा होईल आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकरी आला रडकुंडीलाअनुसूचित जाती कोट्यातून डीपीसी अंतर्गत पालांदूर येथील शेतकरी महेश कोचे यांना जुन २०१७ मध्ये वीज कनेक्शन मंजूर झाले आहे. यासंदर्भात वारंवार महावितरण कार्यालयाचे उंबरठे झीजवून थकले आहे. अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वीज जोडणी मिळाली नसल्याने ते रडकुंडीला आले आहे.सिंचनासाठी सौर उर्जेवरील यंत्रणा देण्याचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी शासन अनुदानही देणार आहेत.-अनिल गेडाम,कार्यकारी अभियंता, साकोली