शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नागरी सुविधांअभावी रखडले पुनर्वसन

By admin | Updated: January 6, 2015 22:55 IST

हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून २६ वर्षांपूर्वी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांची लाखो

व्यथा प्रकल्पग्रस्तांची : गोसेखुर्दशिवाय जिल्ह्यातील सिंचन अपूर्ण भंडारा : हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून २६ वर्षांपूर्वी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात आली होती. परंतु, या प्रकल्पापासून बाधित झालेल्या ३४ गावांपैकी मेंढा, मालची, पाथरी, सावरगाव, पेंढरी, जामगाव याच गावांचे पुर्णत: पुनर्वसन झाले आहे. आणखी २८ गावांचे पुनर्वसन अधांतरी आहे. पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांचा योग्य मोबदल्यासाठी लढा सुरूच आहे. या न्यायासाठी शेतकऱ्यांची एक पिढी गारद होण्याच्या मार्गावर आहे.गोसीखुर्द प्रकल्पगोसीखुर्द (इंदिरासागर) धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर धरणाचे काम वेगाने झाले असले तरी बुडीत क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाची कामे रखडलेली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर धरणात पाणी अडविल्याने धरणाचे पाणी बाधितांच्या घरापर्यंत पोहचले आहे. भंडारा जिल्ह्यातील ३४ गावांचे २८ नवीन गावठाणावर पुनर्वसन करण्याची योजना होती. पुनर्वसन योजनेवर ७५० कोटी रुपये खर्च झाले. आतापर्यंत मेंढा, मालची, पेंढरी, मकरधोकडा, सिरसघाट, जाख (खोलापूर), पांदी, टाकळी (जुनी) या गावांचे पुर्णत तर सावरगावचे स्वेच्छा पुनर्वसन झाले आहे. या धरणामुळे १४ हजार ९०९ कुटूंब बाधित होऊन ६२ हजार ७९ नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील २,५०४ कुटुंबापैकी ९१६ कुटुंबांचे अद्याप स्थलातरण व्हायचे शिल्लक आहे. दुसऱ्या टप्प्यातील मकरधोकडा, सिरसघाट, संगम, पिपरी ही गावे स्थलांतरीत झाले आहेत.बावनथडी प्रकल्पमहाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सहकार्याने तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीवर हा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या चार गावांचे पुनर्वसन झाले आहे. परंतु या काहींना भूखंड मिळाले नाही तर काहींना सर्वसुविधा देण्यात आलेल्या नसल्याचे सांगून नदी काठावरील काही कुटूंब पुनर्वसित ठिकाणी गेले नाही. यासाठी नदीकाठावरील रेंगेपारवासियांनी १५ आॅगस्ट २०१३ रोजी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. यावेळी तीन जणांनी ‘जलसमाधी’ घेण्याच्या उद्देशाने पाण्यात उडी घेतली होती. (जिल्हा प्रतिनिधी)