शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

नागरी सुविधांअभावी रखडले पुनर्वसन

By admin | Updated: January 6, 2015 22:55 IST

हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून २६ वर्षांपूर्वी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांची लाखो

व्यथा प्रकल्पग्रस्तांची : गोसेखुर्दशिवाय जिल्ह्यातील सिंचन अपूर्ण भंडारा : हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून २६ वर्षांपूर्वी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात आली होती. परंतु, या प्रकल्पापासून बाधित झालेल्या ३४ गावांपैकी मेंढा, मालची, पाथरी, सावरगाव, पेंढरी, जामगाव याच गावांचे पुर्णत: पुनर्वसन झाले आहे. आणखी २८ गावांचे पुनर्वसन अधांतरी आहे. पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांचा योग्य मोबदल्यासाठी लढा सुरूच आहे. या न्यायासाठी शेतकऱ्यांची एक पिढी गारद होण्याच्या मार्गावर आहे.गोसीखुर्द प्रकल्पगोसीखुर्द (इंदिरासागर) धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर धरणाचे काम वेगाने झाले असले तरी बुडीत क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाची कामे रखडलेली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर धरणात पाणी अडविल्याने धरणाचे पाणी बाधितांच्या घरापर्यंत पोहचले आहे. भंडारा जिल्ह्यातील ३४ गावांचे २८ नवीन गावठाणावर पुनर्वसन करण्याची योजना होती. पुनर्वसन योजनेवर ७५० कोटी रुपये खर्च झाले. आतापर्यंत मेंढा, मालची, पेंढरी, मकरधोकडा, सिरसघाट, जाख (खोलापूर), पांदी, टाकळी (जुनी) या गावांचे पुर्णत तर सावरगावचे स्वेच्छा पुनर्वसन झाले आहे. या धरणामुळे १४ हजार ९०९ कुटूंब बाधित होऊन ६२ हजार ७९ नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील २,५०४ कुटुंबापैकी ९१६ कुटुंबांचे अद्याप स्थलातरण व्हायचे शिल्लक आहे. दुसऱ्या टप्प्यातील मकरधोकडा, सिरसघाट, संगम, पिपरी ही गावे स्थलांतरीत झाले आहेत.बावनथडी प्रकल्पमहाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सहकार्याने तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीवर हा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या चार गावांचे पुनर्वसन झाले आहे. परंतु या काहींना भूखंड मिळाले नाही तर काहींना सर्वसुविधा देण्यात आलेल्या नसल्याचे सांगून नदी काठावरील काही कुटूंब पुनर्वसित ठिकाणी गेले नाही. यासाठी नदीकाठावरील रेंगेपारवासियांनी १५ आॅगस्ट २०१३ रोजी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. यावेळी तीन जणांनी ‘जलसमाधी’ घेण्याच्या उद्देशाने पाण्यात उडी घेतली होती. (जिल्हा प्रतिनिधी)