शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागरी सुविधांअभावी रखडले पुनर्वसन

By admin | Updated: January 6, 2015 22:55 IST

हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून २६ वर्षांपूर्वी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांची लाखो

व्यथा प्रकल्पग्रस्तांची : गोसेखुर्दशिवाय जिल्ह्यातील सिंचन अपूर्ण भंडारा : हरितक्रांतीचे स्वप्न दाखवून २६ वर्षांपूर्वी गोसेखुर्द (इंदिरासागर) प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात आली होती. परंतु, या प्रकल्पापासून बाधित झालेल्या ३४ गावांपैकी मेंढा, मालची, पाथरी, सावरगाव, पेंढरी, जामगाव याच गावांचे पुर्णत: पुनर्वसन झाले आहे. आणखी २८ गावांचे पुनर्वसन अधांतरी आहे. पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांचा योग्य मोबदल्यासाठी लढा सुरूच आहे. या न्यायासाठी शेतकऱ्यांची एक पिढी गारद होण्याच्या मार्गावर आहे.गोसीखुर्द प्रकल्पगोसीखुर्द (इंदिरासागर) धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर धरणाचे काम वेगाने झाले असले तरी बुडीत क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाची कामे रखडलेली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर धरणात पाणी अडविल्याने धरणाचे पाणी बाधितांच्या घरापर्यंत पोहचले आहे. भंडारा जिल्ह्यातील ३४ गावांचे २८ नवीन गावठाणावर पुनर्वसन करण्याची योजना होती. पुनर्वसन योजनेवर ७५० कोटी रुपये खर्च झाले. आतापर्यंत मेंढा, मालची, पेंढरी, मकरधोकडा, सिरसघाट, जाख (खोलापूर), पांदी, टाकळी (जुनी) या गावांचे पुर्णत तर सावरगावचे स्वेच्छा पुनर्वसन झाले आहे. या धरणामुळे १४ हजार ९०९ कुटूंब बाधित होऊन ६२ हजार ७९ नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील २,५०४ कुटुंबापैकी ९१६ कुटुंबांचे अद्याप स्थलातरण व्हायचे शिल्लक आहे. दुसऱ्या टप्प्यातील मकरधोकडा, सिरसघाट, संगम, पिपरी ही गावे स्थलांतरीत झाले आहेत.बावनथडी प्रकल्पमहाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सहकार्याने तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीवर हा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या चार गावांचे पुनर्वसन झाले आहे. परंतु या काहींना भूखंड मिळाले नाही तर काहींना सर्वसुविधा देण्यात आलेल्या नसल्याचे सांगून नदी काठावरील काही कुटूंब पुनर्वसित ठिकाणी गेले नाही. यासाठी नदीकाठावरील रेंगेपारवासियांनी १५ आॅगस्ट २०१३ रोजी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. यावेळी तीन जणांनी ‘जलसमाधी’ घेण्याच्या उद्देशाने पाण्यात उडी घेतली होती. (जिल्हा प्रतिनिधी)