शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी तहसीलदारांची बदली करा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

सहा महिन्यांपूर्वी मोहाडी तहसील कार्यालयात रुजू झालेले तहसीलदार दीपक कारंडे यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला. त्यांची ओळख सिंघम म्हणून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात झाली. आता दहा दिवसांपूर्वी तहसीलदारांनी सर्वच घाटांवर २४ तास तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा खडा पहारा लावला आहे.

सिराज शेखलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रेती चोरीसाठी प्रसिद्ध मोहाडी तालुक्यातील मुंढरी, रोहा, कुरोडा, बेटाळा, मोहगाव देवी, खमारी, नेरी व पांचगाव रेतीघाटावर तहसीलदारांनी २४ तास खडा पहारा सुरू केला. नेहमी पहाटेला ट्रॅक्टर, जेसीबीने गजबज राहणाऱ्या या घाटांवर आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रेती माफियांची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे रेतीमाफिया आता लोकप्रतिनिधींना एकदाची तहसीलदारांची बदली करा हो, असे साकडे घालत आहेत.तालुक्यातून वाहणारी वैनगंगा व सुर नदी रेतीचोरांसाठी तसेच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. यातील काहींनी या काही वर्षात चांगली माया जमविली; मात्र सहा महिन्यांपूर्वी मोहाडी तहसील कार्यालयात रुजू झालेले तहसीलदार दीपक कारंडे यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला. त्यांची ओळख सिंघम म्हणून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात झाली. आता दहा दिवसांपूर्वी तहसीलदारांनी सर्वच घाटांवर २४ तास तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा खडा पहारा लावला आहे. नदीतून काढून कुरोडा स्मशानभूमीजवळील १५० ते २०० ब्रास व रोहा येथील उत्तरेकडील तलावाजवळील २०० ब्रास डम्पिंग केलेली रेतीसुद्धा जप्त करण्यात आली. नदीतून दररोज १०० ब्रास रेतीची होणारी चोरी बंद झाली. रोहा, बेटाळा येथे ट्रॅक्टर, टिप्पर, जेसीबी अंगणाची शोभा वाढवीत आहे. 

कोट्यवधींचा महसूल प्राप्त

- सहा महिन्यात तहसीलदार कारंडे यांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने जवळपास चार कोटींचा महसूल प्राप्त झाला. नागपूर विभागात हा एक रेकाॅर्ड आहे. जवळील भंडारा, तुमसर आणि पवनी तालुक्यातसुद्धा वैनगंगा नदीचे मोठे रेती घाट असून, तिथेही अवैध रेती उपसा सुरू असतो; मात्र धडक कारवाई होत नसल्याने इतका महसूल दोन वर्षातसुद्धा प्राप्त झाला नसेल.सुपूर्दनाम्यावर वाहन सोडणे बंद- वाहन जप्त करून दंड ठोठावला तर रेतीमाफिया दंड न भरता वाहन सुपूर्तनाम्यावर सोडवून घेत होते.  घेर्त्यामुळे वाहनावर कारवाई झाली तरी टेन्शन नव्हते. यावर येथील तहसीलदारांनी सोडून दिलेल्या वाहनाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शासनाच्यावतीने अपील  दाखल केले. याचिकेतील युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता पकडलेली वाहने दंड भरल्याशिवाय सुपूर्तनाम्यावर सोडणे बंद झाले.

 

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार