शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोहाडी तहसीलदारांची बदली करा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

सहा महिन्यांपूर्वी मोहाडी तहसील कार्यालयात रुजू झालेले तहसीलदार दीपक कारंडे यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला. त्यांची ओळख सिंघम म्हणून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात झाली. आता दहा दिवसांपूर्वी तहसीलदारांनी सर्वच घाटांवर २४ तास तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा खडा पहारा लावला आहे.

सिराज शेखलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रेती चोरीसाठी प्रसिद्ध मोहाडी तालुक्यातील मुंढरी, रोहा, कुरोडा, बेटाळा, मोहगाव देवी, खमारी, नेरी व पांचगाव रेतीघाटावर तहसीलदारांनी २४ तास खडा पहारा सुरू केला. नेहमी पहाटेला ट्रॅक्टर, जेसीबीने गजबज राहणाऱ्या या घाटांवर आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रेती माफियांची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे रेतीमाफिया आता लोकप्रतिनिधींना एकदाची तहसीलदारांची बदली करा हो, असे साकडे घालत आहेत.तालुक्यातून वाहणारी वैनगंगा व सुर नदी रेतीचोरांसाठी तसेच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. यातील काहींनी या काही वर्षात चांगली माया जमविली; मात्र सहा महिन्यांपूर्वी मोहाडी तहसील कार्यालयात रुजू झालेले तहसीलदार दीपक कारंडे यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला. त्यांची ओळख सिंघम म्हणून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात झाली. आता दहा दिवसांपूर्वी तहसीलदारांनी सर्वच घाटांवर २४ तास तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा खडा पहारा लावला आहे. नदीतून काढून कुरोडा स्मशानभूमीजवळील १५० ते २०० ब्रास व रोहा येथील उत्तरेकडील तलावाजवळील २०० ब्रास डम्पिंग केलेली रेतीसुद्धा जप्त करण्यात आली. नदीतून दररोज १०० ब्रास रेतीची होणारी चोरी बंद झाली. रोहा, बेटाळा येथे ट्रॅक्टर, टिप्पर, जेसीबी अंगणाची शोभा वाढवीत आहे. 

कोट्यवधींचा महसूल प्राप्त

- सहा महिन्यात तहसीलदार कारंडे यांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने जवळपास चार कोटींचा महसूल प्राप्त झाला. नागपूर विभागात हा एक रेकाॅर्ड आहे. जवळील भंडारा, तुमसर आणि पवनी तालुक्यातसुद्धा वैनगंगा नदीचे मोठे रेती घाट असून, तिथेही अवैध रेती उपसा सुरू असतो; मात्र धडक कारवाई होत नसल्याने इतका महसूल दोन वर्षातसुद्धा प्राप्त झाला नसेल.सुपूर्दनाम्यावर वाहन सोडणे बंद- वाहन जप्त करून दंड ठोठावला तर रेतीमाफिया दंड न भरता वाहन सुपूर्तनाम्यावर सोडवून घेत होते.  घेर्त्यामुळे वाहनावर कारवाई झाली तरी टेन्शन नव्हते. यावर येथील तहसीलदारांनी सोडून दिलेल्या वाहनाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शासनाच्यावतीने अपील  दाखल केले. याचिकेतील युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता पकडलेली वाहने दंड भरल्याशिवाय सुपूर्तनाम्यावर सोडणे बंद झाले.

 

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार