लाखनी तहसील कार्यालयासमोर वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:18+5:30
तहसील कार्यालयासमोर समर्थनगर मुरमाडी येथील मार्गावर प्रवासी निवारा आहे. येथे एसटी महामंडळाच्या शिवशाही निमआराम, जलद बसेस थांबतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु असते. येथे खासगी आटो, काळीपिवळी टॅक्सी लागलेल्या असतात. बसच्या समोर अॅटो असल्याने तहसील कार्यालयासमोरील मार्ग अनेकदा वाहतूक कोंडीने बंद होतो. सदर परिसरात वाहनांचा नेहमीच गजबजाट असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

लाखनी तहसील कार्यालयासमोर वाहतुकीची कोंडी
चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : राष्ट्रीय महामार्गावरील तहसील कार्यालय चौकात प्रवासी निवाऱ्यासमोर होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असल्याने लाखनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. दैनंदिन होणारी वाहतूक कोंडी त्यामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने सर्वीस रोडवरून वाहतूक सुरु आहे.
तहसील कार्यालयासमोर समर्थनगर मुरमाडी येथील मार्गावर प्रवासी निवारा आहे. येथे एसटी महामंडळाच्या शिवशाही निमआराम, जलद बसेस थांबतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु असते. येथे खासगी आटो, काळीपिवळी टॅक्सी लागलेल्या असतात. बसच्या समोर अॅटो असल्याने तहसील कार्यालयासमोरील मार्ग अनेकदा वाहतूक कोंडीने बंद होतो. सदर परिसरात वाहनांचा नेहमीच गजबजाट असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
येथून समर्थ विद्यालय, गांधी विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, समर्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. सोबतच तालुक्याच्या ठिकाणी येणाºया नागरिकांची मोठी गर्दी असल्याने प्रवाशांच्या जीवीताला धोका आहे. येथे खासगी वाहनचालक रस्त्यावरच आपली वाहने उभी ठेवत असल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस विभागाची सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
प्रवासी निवाºयासमोर खासगी वाहने उभी असल्याने अनेकदा बस न थांबताच निघून जातात. त्यामुळे बसने जाणारे प्रवासी बसची तासन्तास वाट पाहतात. त्यांना नाईलाजाने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. अॅटो चालकांच्या मनमानी कारभाराने सुरक्षा कर्मचारी हतबल झाले आहेत. पोलीस विभाग याकडे कोणत्या कारणाने कानाडोळा करीत आहेत असा सवाल पोलिसांकडून विचारला जात आहे. अॅटोकरिता स्वतंत्र स्टँड हवे, बसथांब्याच्या जागेवर खासगी वाहनांना रोकणे गरजेचे असताना वरिष्ठ पोलीस याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे खासगी वाहनधारकांवर अंकुश ठेवण्याची मागणी नागरिकांमध्ये जोर धरत आहे.