शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

आंतरराज्य बावनथडी पुलावरील वाहतूक पुन्हा केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती गावांमध्ये जावे लागते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक पुन्हा बंद केली आहे. पुलावरील रस्ता व नाली खोदकाम करण्यात आले.

ठळक मुद्देरुग्णवाहिकेचा मार्गही बंद : पूल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर कटंगी आंतरराज्य मार्गावर बावनथडी नदीवरील हादरे बसणाऱ्या पुलावरून दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होती; परंतु दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील रस्त्यावर नाली खोदकाम केले, त्यामुळे या वाहनांच्या वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. हलक्या वाहनांचा मार्ग बंद केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती एक वर्षापासून केली नाही. आंतरराज्य महामार्ग असूनही त्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याची गरज आहे.महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती गावांमध्ये जावे लागते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक पुन्हा बंद केली आहे. पुलावरील रस्ता व नाली खोदकाम करण्यात आले.मागील सप्टेंबर महिन्यात जड वाहतुकीकरिता पूल बंद करण्यात आला होता. नागरिकांनी विरोध केल्यानंतर दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक येथे सुरू करण्यात आली होती. सदर वाहतूक दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. मागील एक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती केली नाही. संबंधित विभाग निविदा काढण्यात आल्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत आहे; परंतु आंतरराज्य महामार्ग मागील एक वर्षापासून बंद असल्यामुळे वाहतुकीला या ठिकाणी फटका बसत आहे. किमान हलक्या वाहनांना येथे वाहतुकीला परवानगी देण्याची गरज आहे.  वाहतूक  बंदमुळे  तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरून फेरा मारून जावे लागते.सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या सोयीकरिता उन्हाळ्यात किमान नदी पात्रात तात्पुरता रपटा करण्याची गरज होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदर समस्येवर जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी लक्ष घालून तात्काळ ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पTrafficवाहतूक कोंडी