शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आंतरराज्य बावनथडी पुलावरील वाहतूक पुन्हा केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती गावांमध्ये जावे लागते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक पुन्हा बंद केली आहे. पुलावरील रस्ता व नाली खोदकाम करण्यात आले.

ठळक मुद्देरुग्णवाहिकेचा मार्गही बंद : पूल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर कटंगी आंतरराज्य मार्गावर बावनथडी नदीवरील हादरे बसणाऱ्या पुलावरून दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होती; परंतु दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील रस्त्यावर नाली खोदकाम केले, त्यामुळे या वाहनांच्या वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. हलक्या वाहनांचा मार्ग बंद केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती एक वर्षापासून केली नाही. आंतरराज्य महामार्ग असूनही त्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याची गरज आहे.महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती गावांमध्ये जावे लागते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक पुन्हा बंद केली आहे. पुलावरील रस्ता व नाली खोदकाम करण्यात आले.मागील सप्टेंबर महिन्यात जड वाहतुकीकरिता पूल बंद करण्यात आला होता. नागरिकांनी विरोध केल्यानंतर दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक येथे सुरू करण्यात आली होती. सदर वाहतूक दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. मागील एक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती केली नाही. संबंधित विभाग निविदा काढण्यात आल्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत आहे; परंतु आंतरराज्य महामार्ग मागील एक वर्षापासून बंद असल्यामुळे वाहतुकीला या ठिकाणी फटका बसत आहे. किमान हलक्या वाहनांना येथे वाहतुकीला परवानगी देण्याची गरज आहे.  वाहतूक  बंदमुळे  तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरून फेरा मारून जावे लागते.सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या सोयीकरिता उन्हाळ्यात किमान नदी पात्रात तात्पुरता रपटा करण्याची गरज होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदर समस्येवर जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी लक्ष घालून तात्काळ ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पTrafficवाहतूक कोंडी