शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

रानडुकरांनी केले ऊसपीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:46 AM

शेतशिवारापासून हाकेच्या अंतरावर जंगलाचे क्षेत्र सुरु होते. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे. चिखला परिसरात मागील दोन वर्षापासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे.

ठळक मुद्देचिखला शिवारातील प्रकार : शेतकऱ्यांवर संकट, वनविभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील चिखला परिसरात रानडुकरांनी शेतातील उभे ऊस पिकांची नासधुस करुन उध्दवस्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे झाले आहे. वन्यप्राण्यांपासून पीकांचा बचाव कसा करावा. या विवंचनेत येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.शेतशिवारापासून हाकेच्या अंतरावर जंगलाचे क्षेत्र सुरु होते. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे.चिखला परिसरात मागील दोन वर्षापासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. प्रत्येक शेतकरी येथे त्रस्त झाला आहे. प्रत्येकाचे किमान दोन ते तीन लाखांचे आर्थिक नुकसान वन्यप्राण्यांनी केले आहे. त्यामुळे येथील शेतकºयांवर संकट कोसळले आहे. रानडुकरांना हाकलून लावणे मोठे जिकरीचे व धोकादायक काम आहे.यासंदर्भात नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली. परंतु कारवाई शून्य आहे. पीकांचे नुकसानीचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे शेती कशी करावी असा प्रश्न त्यांना सतत भेडसावीत आहे. शेतात जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. उभ्या पिकांची नासाडी पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.चिखला परिसराला लागूनच जंगल आहे. त्यामुळे रानडुकरांच्या टोळ्या शेतातील उभी पीक नष्ट करीत आहेत. त्यांचा कायम बंदोबस्त वनविभागाने करण्याची गरज आहे. फटाके फोडून शेतकरी रानडुकर काही प्रमाणात परत पाठविण्यात यशस्वी होतात. परंतु रात्री व पहाटे पुन्हा रानडुकर उभ्या पिकांची नासाडी सतत करीत आहेत. वनविभागाने येथे कायम स्वरुपी उपाययोजना करुन तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती