शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

तुडतुडा, अतिवृष्टीने धानपिकाला मारले तर भाजीपाल्याने सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:01 IST

जानेवारी महिन्यात प्रथम अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसाचा हा सातत्य पण फेब्रुवारी व मार्च महिन्यात ही कायम होता दोन महिने थोडा फार कमी जास्त प्रमाणात त्याचा फटका सहन करावा लागला असला तरी पुन्हा एकदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या नैसर्गिक संकटाला पुन्हा एकदा तोंड द्यावे लागले ऑगस्ट महिन्याच्या २८, २९ व ३० रोजी आलेल्या महापुराने अक्षरशः जीवन ढवळून निघाले. नदीकाठावरील तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले याचा सर्वात जास्त फटका पिकांनाही बसला.

ठळक मुद्देसरते वर्ष, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोना महामारी ने संपूर्ण जग हादरून गेले असताना त्यात जगाचा पोशिंदा असलेला बळीराजालाही प्रचंड फटका सहन करावा लागला. आधीच अस्मानी संकट डोक्यावर असताना सुलतानी संकटाने ही बळीराजाला चांगलेच पछाडले.  जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत कधी अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टी तर कधी कीड व रोग यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अशातच धानाचे नुकसान सोसावे लागले थोड्या प्रमाणात का असेना शेवटच्या दोन महिन्यात भाजीपाला पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी निघाल्याने शेतकऱ्यांना मदत झाली. सरत्या वर्षात कृषी व व त्याच्याशी संबंधित असलेल्या घडामोडींवर नजर घातल्यास शेतकऱ्यांसाठी व भाजीपाला उत्पादकांसाठी हा वर्ष तेवढा फारसा चांगला म्हणता येणार नाही.जानेवारी महिन्यात प्रथम अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसाचा हा सातत्य पण फेब्रुवारी व मार्च महिन्यात ही कायम होता दोन महिने थोडा फार कमी जास्त प्रमाणात त्याचा फटका सहन करावा लागला असला तरी पुन्हा एकदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या नैसर्गिक संकटाला पुन्हा एकदा तोंड द्यावे लागले ऑगस्ट महिन्याच्या २८, २९ व ३० रोजी आलेल्या महापुराने अक्षरशः जीवन ढवळून निघाले. नदीकाठावरील तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले याचा सर्वात जास्त फटका पिकांनाही बसला. भाजीपाला पिके ही उदध्वस्त झाली. हजारो हेक्टरमधील शेती पाण्याखाली आल्याने धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी धान अक्षरशः जमीनदोस्त झाले.दुसरीकडे मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाला.  त्यामुळे अशा भीतीमध्येही शेतकऱ्यांचा भाजीपाला नासाडी होऊ नये यासाठी कृषी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणत्याही सुविधा नसतानाही कोरणा योद्धा म्हणून आपत्ती काळात आपली सेवा बजावली. यामध्ये काहींना मृत्यूचा सामना करावा लागला तर काहींना कोरोना बाधित व्हावे लागले. मात्र तरीही न डगमगता बळीराजा सह अनेकांनी आपले योगदान दिले.  यावर्षी नैसर्गिक संकटांनी ही बळीराजाला पुरते हैराण करून सोडले. मात्र अशाही संकटात सकारात्मक विचार करून भाजीपाला लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याने तारले असे म्हणायला हरकत नाही. भंडारा तालुक्यातील चिखली येथील शेतकरी तानाजी गायधने यांनी बोलताना सांगितले की वरुणाने बळीराजालाही एक नवा धडा दिला आहे. आजपर्यंत शेतकरी कोणतेही नियोजन करत नव्हते मात्र आता आपण शेतकरी बचत गट, उत्पादक कंपन्यांच्यामार्फत आंतरराज्य तसेच इतर जिल्ह्यात दर्जेदार शेतमाल विक्री करू शकतो हे शिकलो.  लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी उमेश गरपडे म्हणाले, बाजारपेठेचा अभ्यास करून नफा-तोटा लक्षात घेत वर्तमानात शेती करणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याची शेती केल्यास निश्चितच अधिक पैसे मिळतात. धानाच्या शेतीला खर्च अधिक व नफा कमी अशी परिस्थिती जिल्हावाशी आपण अनुभवुन आहोत. तेव्हा पावसाळ्यात धानाची शेती कमी करून भाजीपाल्याची शेती करा, असे ते म्हणाले.

बळीराजासह कृषी कर्मचारीच खरे कोरोना योद्धे  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळाल्या नसतानाही अशा संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून आपत्ती काळात आपली सेवा बजावली.  राज्यात सर्वाधिक मृत्यू कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे झाले तर अनेकांना कोरोना बाधित व्हावे लागले. 

अतिवृष्टी, महापुर, तुडतुड्याचा फटका जिल्ह्यात २८,२९,३० ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी, महापुर आणि तुडतुड्याने  धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा फटका ३८  हजार९३१ शेतकऱ्यांना बसला होता. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ८५ हजार ८५४ हेक्टरवर धानाजी लागवड करण्यात आली होती. खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४०११ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. 

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती