शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तुडतुडा, अतिवृष्टीने धानपिकाला मारले तर भाजीपाल्याने सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:01 IST

जानेवारी महिन्यात प्रथम अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसाचा हा सातत्य पण फेब्रुवारी व मार्च महिन्यात ही कायम होता दोन महिने थोडा फार कमी जास्त प्रमाणात त्याचा फटका सहन करावा लागला असला तरी पुन्हा एकदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या नैसर्गिक संकटाला पुन्हा एकदा तोंड द्यावे लागले ऑगस्ट महिन्याच्या २८, २९ व ३० रोजी आलेल्या महापुराने अक्षरशः जीवन ढवळून निघाले. नदीकाठावरील तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले याचा सर्वात जास्त फटका पिकांनाही बसला.

ठळक मुद्देसरते वर्ष, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोना महामारी ने संपूर्ण जग हादरून गेले असताना त्यात जगाचा पोशिंदा असलेला बळीराजालाही प्रचंड फटका सहन करावा लागला. आधीच अस्मानी संकट डोक्यावर असताना सुलतानी संकटाने ही बळीराजाला चांगलेच पछाडले.  जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत कधी अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टी तर कधी कीड व रोग यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अशातच धानाचे नुकसान सोसावे लागले थोड्या प्रमाणात का असेना शेवटच्या दोन महिन्यात भाजीपाला पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी निघाल्याने शेतकऱ्यांना मदत झाली. सरत्या वर्षात कृषी व व त्याच्याशी संबंधित असलेल्या घडामोडींवर नजर घातल्यास शेतकऱ्यांसाठी व भाजीपाला उत्पादकांसाठी हा वर्ष तेवढा फारसा चांगला म्हणता येणार नाही.जानेवारी महिन्यात प्रथम अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसाचा हा सातत्य पण फेब्रुवारी व मार्च महिन्यात ही कायम होता दोन महिने थोडा फार कमी जास्त प्रमाणात त्याचा फटका सहन करावा लागला असला तरी पुन्हा एकदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या नैसर्गिक संकटाला पुन्हा एकदा तोंड द्यावे लागले ऑगस्ट महिन्याच्या २८, २९ व ३० रोजी आलेल्या महापुराने अक्षरशः जीवन ढवळून निघाले. नदीकाठावरील तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले याचा सर्वात जास्त फटका पिकांनाही बसला. भाजीपाला पिके ही उदध्वस्त झाली. हजारो हेक्टरमधील शेती पाण्याखाली आल्याने धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी धान अक्षरशः जमीनदोस्त झाले.दुसरीकडे मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाला.  त्यामुळे अशा भीतीमध्येही शेतकऱ्यांचा भाजीपाला नासाडी होऊ नये यासाठी कृषी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणत्याही सुविधा नसतानाही कोरणा योद्धा म्हणून आपत्ती काळात आपली सेवा बजावली. यामध्ये काहींना मृत्यूचा सामना करावा लागला तर काहींना कोरोना बाधित व्हावे लागले. मात्र तरीही न डगमगता बळीराजा सह अनेकांनी आपले योगदान दिले.  यावर्षी नैसर्गिक संकटांनी ही बळीराजाला पुरते हैराण करून सोडले. मात्र अशाही संकटात सकारात्मक विचार करून भाजीपाला लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याने तारले असे म्हणायला हरकत नाही. भंडारा तालुक्यातील चिखली येथील शेतकरी तानाजी गायधने यांनी बोलताना सांगितले की वरुणाने बळीराजालाही एक नवा धडा दिला आहे. आजपर्यंत शेतकरी कोणतेही नियोजन करत नव्हते मात्र आता आपण शेतकरी बचत गट, उत्पादक कंपन्यांच्यामार्फत आंतरराज्य तसेच इतर जिल्ह्यात दर्जेदार शेतमाल विक्री करू शकतो हे शिकलो.  लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी उमेश गरपडे म्हणाले, बाजारपेठेचा अभ्यास करून नफा-तोटा लक्षात घेत वर्तमानात शेती करणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याची शेती केल्यास निश्चितच अधिक पैसे मिळतात. धानाच्या शेतीला खर्च अधिक व नफा कमी अशी परिस्थिती जिल्हावाशी आपण अनुभवुन आहोत. तेव्हा पावसाळ्यात धानाची शेती कमी करून भाजीपाल्याची शेती करा, असे ते म्हणाले.

बळीराजासह कृषी कर्मचारीच खरे कोरोना योद्धे  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळाल्या नसतानाही अशा संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून आपत्ती काळात आपली सेवा बजावली.  राज्यात सर्वाधिक मृत्यू कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे झाले तर अनेकांना कोरोना बाधित व्हावे लागले. 

अतिवृष्टी, महापुर, तुडतुड्याचा फटका जिल्ह्यात २८,२९,३० ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी, महापुर आणि तुडतुड्याने  धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा फटका ३८  हजार९३१ शेतकऱ्यांना बसला होता. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ८५ हजार ८५४ हेक्टरवर धानाजी लागवड करण्यात आली होती. खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४०११ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. 

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती