शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
4
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
5
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
6
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
7
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
9
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
10
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
11
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
12
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
13
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
15
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
16
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ
17
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
18
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
19
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
20
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

तुडतुडा, अतिवृष्टीने धानपिकाला मारले तर भाजीपाल्याने सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:01 IST

जानेवारी महिन्यात प्रथम अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसाचा हा सातत्य पण फेब्रुवारी व मार्च महिन्यात ही कायम होता दोन महिने थोडा फार कमी जास्त प्रमाणात त्याचा फटका सहन करावा लागला असला तरी पुन्हा एकदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या नैसर्गिक संकटाला पुन्हा एकदा तोंड द्यावे लागले ऑगस्ट महिन्याच्या २८, २९ व ३० रोजी आलेल्या महापुराने अक्षरशः जीवन ढवळून निघाले. नदीकाठावरील तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले याचा सर्वात जास्त फटका पिकांनाही बसला.

ठळक मुद्देसरते वर्ष, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोना महामारी ने संपूर्ण जग हादरून गेले असताना त्यात जगाचा पोशिंदा असलेला बळीराजालाही प्रचंड फटका सहन करावा लागला. आधीच अस्मानी संकट डोक्यावर असताना सुलतानी संकटाने ही बळीराजाला चांगलेच पछाडले.  जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत कधी अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टी तर कधी कीड व रोग यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अशातच धानाचे नुकसान सोसावे लागले थोड्या प्रमाणात का असेना शेवटच्या दोन महिन्यात भाजीपाला पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी निघाल्याने शेतकऱ्यांना मदत झाली. सरत्या वर्षात कृषी व व त्याच्याशी संबंधित असलेल्या घडामोडींवर नजर घातल्यास शेतकऱ्यांसाठी व भाजीपाला उत्पादकांसाठी हा वर्ष तेवढा फारसा चांगला म्हणता येणार नाही.जानेवारी महिन्यात प्रथम अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसाचा हा सातत्य पण फेब्रुवारी व मार्च महिन्यात ही कायम होता दोन महिने थोडा फार कमी जास्त प्रमाणात त्याचा फटका सहन करावा लागला असला तरी पुन्हा एकदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या नैसर्गिक संकटाला पुन्हा एकदा तोंड द्यावे लागले ऑगस्ट महिन्याच्या २८, २९ व ३० रोजी आलेल्या महापुराने अक्षरशः जीवन ढवळून निघाले. नदीकाठावरील तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले याचा सर्वात जास्त फटका पिकांनाही बसला. भाजीपाला पिके ही उदध्वस्त झाली. हजारो हेक्टरमधील शेती पाण्याखाली आल्याने धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी धान अक्षरशः जमीनदोस्त झाले.दुसरीकडे मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाला.  त्यामुळे अशा भीतीमध्येही शेतकऱ्यांचा भाजीपाला नासाडी होऊ नये यासाठी कृषी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणत्याही सुविधा नसतानाही कोरणा योद्धा म्हणून आपत्ती काळात आपली सेवा बजावली. यामध्ये काहींना मृत्यूचा सामना करावा लागला तर काहींना कोरोना बाधित व्हावे लागले. मात्र तरीही न डगमगता बळीराजा सह अनेकांनी आपले योगदान दिले.  यावर्षी नैसर्गिक संकटांनी ही बळीराजाला पुरते हैराण करून सोडले. मात्र अशाही संकटात सकारात्मक विचार करून भाजीपाला लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याने तारले असे म्हणायला हरकत नाही. भंडारा तालुक्यातील चिखली येथील शेतकरी तानाजी गायधने यांनी बोलताना सांगितले की वरुणाने बळीराजालाही एक नवा धडा दिला आहे. आजपर्यंत शेतकरी कोणतेही नियोजन करत नव्हते मात्र आता आपण शेतकरी बचत गट, उत्पादक कंपन्यांच्यामार्फत आंतरराज्य तसेच इतर जिल्ह्यात दर्जेदार शेतमाल विक्री करू शकतो हे शिकलो.  लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी उमेश गरपडे म्हणाले, बाजारपेठेचा अभ्यास करून नफा-तोटा लक्षात घेत वर्तमानात शेती करणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याची शेती केल्यास निश्चितच अधिक पैसे मिळतात. धानाच्या शेतीला खर्च अधिक व नफा कमी अशी परिस्थिती जिल्हावाशी आपण अनुभवुन आहोत. तेव्हा पावसाळ्यात धानाची शेती कमी करून भाजीपाल्याची शेती करा, असे ते म्हणाले.

बळीराजासह कृषी कर्मचारीच खरे कोरोना योद्धे  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळाल्या नसतानाही अशा संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून आपत्ती काळात आपली सेवा बजावली.  राज्यात सर्वाधिक मृत्यू कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे झाले तर अनेकांना कोरोना बाधित व्हावे लागले. 

अतिवृष्टी, महापुर, तुडतुड्याचा फटका जिल्ह्यात २८,२९,३० ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी, महापुर आणि तुडतुड्याने  धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा फटका ३८  हजार९३१ शेतकऱ्यांना बसला होता. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ८५ हजार ८५४ हेक्टरवर धानाजी लागवड करण्यात आली होती. खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४०११ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. 

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती