शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

आज प्रेमोत्सवाचा दिवस!

By admin | Updated: February 14, 2017 00:18 IST

पाऊस पडत नसला तरी, प्रेम असतं भिजलेलं, त्याच्या तिच्या कुशीमध्ये अलगद निजलेलं...

प्रशांत देसाई भंडारा पाऊस पडत नसला तरी, प्रेम असतं भिजलेलं,त्याच्या तिच्या कुशीमध्ये अलगद निजलेलं...अशी सर्वसाधारण हळवी भावना प्रेमाचा विषय निघाला की आपल्या हृदयात येते. हो हृदयातच! कारण प्रेम हा डोक्याचा विषय नव्हे किंवा बुद्धीचा तर मूळीच नव्हे. तो हृदयाचा विषय. ती एका हृदयाची भावना आहे. थेट दुसऱ्या हृदयापर्यंत पोचणारी. अर्थात विचार करणाऱ्या डोक्यालाही हृदयाशिवाय पर्याय नाही. रक्तातून डोक्याला आवश्यक ती ऊर्जा पोचविण्याचं कामही हृदयच करत असतं!आज व्हॅलेंटाईन. अगदी हळुवार जपण्याचा दिवस. प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला क्षण न क्षण... तिच्याशी केलेला सुखसंवाद... पाऊस, चंद्र, चांदणी यांच्यासोबतच्या त्याच्या, तिच्या आठवणी. लडिवाळपणाचे मौन. रूसवा, फुगवा वगैरे वगैरे. ते चांदण्यांनी मंतरलेलं गुलाबी दिवस. कधीतरी नको असताना हे सगळं थांबून जातं. मग ‘रूटीन लाईफ’ सुरू होतं. कमी जास्त फरकाने प्रत्येकाच्या वाट्याला अशा हळव्या आठवणी असतातच. आज सोबत असोत अथवा नसोत. आजच्या दिवशी या सगळ्या आठवणी अगदी ताज्या होऊन समोर नाचू लागतात. निरनिराळा रंग, आकार, सुगंध असलेल्या फुलांची माळ शोभून दिसते. तशीच या आठवणींची माळ तयार होते. प्रेम ही नाजूकशी अन हळूवार भावना आहे. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. ती प्रत्येकानं अनुभवाची असते, अन आपापल्या परीनं तिची व्याख्या करायची असते. प्रेमात हळवेपणा असतो, आदर असतो, सन्मान असतो, परस्परांना चुकांसह समजून घेण्याची वृत्ती असते. म्हणून तर प्रेमात जग जिंकण्याची ताकद असते असं म्हणतात.प्रेम करणं खरचं एक विलक्षण अनुभूती आहे. ती एवढी विलक्षण आहे की आपलं प्रेम कोणी स्वीकारलं अथवा नाकारलं तरीसुद्धा आपल्या हृदयात प्रेमाची उत्पत्ती होत राहते. खरेखुरे प्रेम हे फुलांप्रमाणे असते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्याला तर ते गंध देतेच, मात्र पायदळी तुडविणाऱ्यांना देखील तोच अन तेवढाच गंध देते. पायदळी तुडविल्यावरदेखील प्रेम करणारं. प्रेमभंग ही कल्पना का व कशी रूढ झाली समजत नाही. जे तुटतं, भंग पावतं ते प्रेम असूच कसं शकेल. नश्वर अन क्षणार्धात नष्ट होऊ शकणाऱ्या गोष्टी भंग पावतात. भंग पावतात त्या भोगण्याच्या, वासनेच्या क्रूर इच्छा.... भंग पावते ती स्वार्थी वृत्ती.. एकवेळ देहसुद्धा भंग पावतो, नष्ट होतो. मात्र प्रेम कधीच नष्ट होत नाही. अर्थात भंग होणारं गोष्टीला आपण प्रेम म्हणूच शकत नाही.प्रेमाचं जगच वेगळं असतं. प्रेम कधीही ओरबाडून घेता येत नसतं. ते हळुवारपणानं मिळत असतं. स्वत:च्या हृदयात प्रेमाची उत्पत्ती होणं अन त्यामुळे अवघ्या देहाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त होणं म्हणजे खरं प्रेम असतं. ती अनुभूती भंग कशी पावेल? प्रेम कोणावरही करता येतं. झाडांवर, फुलांवर, पानावर, दगडावर, मातीवर, माणसा माणसांवर प्रेम करता येतं... फार दूर कशाला प्रेम स्वत:वरदेखील करता येतं. त्यामुळं हळव्या आठवणी वाट्याला आल्या नाहीत म्हणून शोक करत बसण्यापेक्षा या क्षणापासून सर्व सृष्टीवर प्रेम करण्यास सुरुवात करा. बघा, स्वत:लाच बदल जाणवेल.बजरंग दलाचा विरोध भंडारा : पाश्चिमात्याच्या नावावर व्हॅलेन्टाईन-डे च्या माध्यमातून होणाऱ्या अश्लिलता आणि विभत्स्यतेचा विरोध करण्यात येणार असून जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक पर्यटनस्थळी १४ फेब्रुवारी रोजी विकृतवर्तन करणाऱ्या प्रेमीयुगुलांना धडा शिकविणार असल्याचे बजरंग दलातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. व्हॅलेन्टाईन-डे सारख्या पाश्चात्य उत्सवांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे अनुकरण करुन जगात सर्वश्रेष्ठ मानली जाणारी भारतीय संस्कृतीचे विकृतीकरण करण्याचे कार्य होत आहे.