अंतिम संस्कारातही मायेची सावली नाही

By Admin | Updated: May 25, 2014 23:20 IST2014-05-25T23:20:00+5:302014-05-25T23:20:00+5:30

मृत्यू हा जीवनातील अंतिम क्षण असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू आलेला बनत नसतो. त्याचा देह असते नाशिवंत. पण या नाश पावलेल्या देहाचा संस्कार करावाच लागतो. स्वत:च्या शरीराला जपणारा हा

There is no shade of silence even in last rites | अंतिम संस्कारातही मायेची सावली नाही

अंतिम संस्कारातही मायेची सावली नाही

राजू बांते -मोहाडी

मृत्यू हा जीवनातील अंतिम क्षण असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू आलेला बनत नसतो. त्याचा देह असते नाशिवंत. पण या नाश पावलेल्या देहाचा संस्कार करावाच लागतो. स्वत:च्या शरीराला जपणारा हा व्यक्ती मृत्यूनंतर जळणार्‍या देहाला किमान काही काळ तरी मायेची सावलीमिळत नसल्याचे तालुक्यात दिसून आले आहे.

ऊन, वारा व पाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना गरीब / श्रीमंत आपापल्या परीने करीत असतो. जीवंतपणी उन्हाचा दाह कमी करण्यासाठी घर असतो. घरात कुलर, पंखा, ए.सी. लावला जातो. पावसाच्या बचावासाठी रेनकोट, छत्र्यांचा वापर केला जातो. प्रत्येक व्यक्ती स्वत:ला जपत असतो. मृत्यूनंतरही त्याच्या देहलोकी शरीराला अग्नी देईपर्यंत जपणार्‍या संस्कार केला जातो. पण तो देह पूर्ण जळेपर्यंत त्याच्या जळणार्‍या देहाला वरच्या मायेच्या सावलीचा पांघरून मिळावा यासाठी स्मशानशेडची योजना आहे. पण मोहाडी तालुक्यात ४१ गावात स्मशानशेडची व्यवस्था नाही आहे. यात वासेरा, देऊळगाव, ताडगाव, पालडोंगरी, मलिदा, आंधळगाव, अकोला, चिचोली, शिवनी, सालेबर्डी, पांढराबोडी, काटेबाम्हणी, सालई बु., भिकारखेडा, महालगाव, पारडी, वडेगाव, सितेपार, दहेगाव, पिंपळगाव, भोसा, नेरी, बोथली, बीड सितेपार, देव्हाडा बु., निलज बु., निलख खु, नवेगाव बु., मोहगाव, करडी, करडी, मुंढरी खु., मुंढरी बु., कान्हळगाव / करडी, बोरी, किसनपूर, केसलवाडा, बोरगाव, ढिवरवाडा, खडकी, बोंद्रे, डोंगरदेव आदी गावात स्मशानशेडची कमतरता आहे. त्याशिवाय अंतिम संस्कारासाठी मातीत देह पुरण्यासाठी १४ गावात स्मशानभूमी नसल्याची माहिती दिसून आली. यात ढिवरवाडा, केसलवाडा, कान्हळगाव, मुंढरी, बोरगाव, मोरगाव, फुटाळा, ताडगाव, मुंढरी, मलीदा, सिरसोली का., घाटकुरोडा, जांभोरा, किसनपूरचा गावांना स्मशानभूमीच नाही. तसेच महसूल विभागाकडे स्मशानभूमीची नोंद नाही असे अकरा गावे आहेत. मोरगाव, वासेरा, फुटाळा, भिकारखेडा, धर्मापूरी, ताडगाव, मुंढरी खु., मलीदा, जांभोरा, किसनपूर या गावांचा समावेश आहे. खरा प्रश्न भेडसावतो त्या १४ गावांना ज्यांना प्रेत पुरण्यासाठी गावात जमीन नाही. ही बाब विधानसभेत विचारली गेली होती. स्थानिक आमदारांनी तारांकीत प्रश्न विधानसभेत मांडला गेला होता. ज्या गावात जन्माची नाळ गाडली गेली त्यासाठी घरची भूमी वापरात येते. मात्र त्यांचे मातीत अंतिम संस्कार करण्यासाठी गावाची भूमि मिळत नाही ही बाब विचार करणारी आहे.

गाव तेथे स्मशानशेड असावे. मातीत संस्कार करण्यासाठी स्मशानभूमी असावी असे असताना स्वातंत्र्यांच्या ६७ व्या वर्षीही अंतिम संस्काराच्या सोयी सुविधा करण्यास प्रशासन / शासन दूर राहिली आहे. ही बाब एवढ्यावरच थांबली नाही. अंतिम संस्काराचे सोयरसूतक करण्यासाठी पाण्याचीही मोठी बोंब असते. गावच्या स्मशानभूमीत एक तरी हातपंप असावे अशी किमान मागणीही शासन पूर्ण करू शकलेला नाही. उन्हाळ्यात नाले, ओढे, नद्या कोरड्या पडतात अशा वेळी अंतिम संस्कार करण्यासाठी पंचवीस कि.मी. अंतरावर असणारी वैनगंगा नदीवर नेणे हाच एक पर्याय असतो. पण हे सगळ्यांनाच जमत नाही. त्याचा पर्याय शोधला जातो. नजीकच्या विहिरीवरून पाणी शोधून अंतिम संस्काराचे सूतक केले जातात. लहान नदीमध्ये रेती ओढून पाण्याचा शोध लावूनही मोठय़ा कष्टाने अंतिम संस्कार केले जात आहेत. मृत्यूनंतरही थट्टा थांबविण्यासाठी शासनाने स्मशानभूमी, एक हातपंप, शोकमंडपाची सुविधा करणे गरजेचे आहे.

Web Title: There is no shade of silence even in last rites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.