शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सात महिन्यांपासून बोरगाव येथील पाणीपुरवठा योजना ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:38 IST

Bhandara : हर घर नल, हर घर जल या योजनेचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्क सिल्ली : तालुक्यातील बोरगाव बुज. पुनर्वसन येथील गावकऱ्यांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल दोन कोटी एकोणऐंशी लक्ष बावन्न हजार रुपये खर्च करण्यात आले. पाण्याच्या टाकीजवळ सोलर पॅनल लावण्यात आले. घरच्या नळाला पाणी आज येईल, उद्या येईल, अशी गावकऱ्यांना आशा होती. मात्र मागील सात महिन्यांपासून गावातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना ठप्प असून गावकऱ्यांच्या घरगुती नळाला पाणी आलेच नाही. त्यामुळे हर घर नल, हर घर जल या योजनेचा पूर्णतः फज्जा उडाल्याचे बोरगाव येथे चित्र आहे.

नागरिकांना या पाणीपुरवठा योजनेचा कोणताही लाभ झाला नसल्याने नाइलाजास्तव इतरत्र असलेल्या गढूळ पाण्याचे स्रोत शोधावे लागत असून शुद्ध पाण्याविना नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागामधे राहते. ग्रामीण भागातील जनतेस शुद्ध व स्वच्छ आरोग्यदायी पाणीपुरवठा करणे सरकारचा मुख्य उद्देश आहे.  

शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस ४० लीटर पाणी दरदिवशी दरमाणशी आवश्यक आहे. मात्र बोरगाव येथील टाकीतून एक थेंबही पाणी घरगुती नळाला येत नाही. ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी व आरोग्याच्या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून नळाला शुद्ध पाणी द्यायचे नव्हते तर लाखो रुपयांचा चुराडा का केला, अशी गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहे.

लक्ष देणार काय?सात महिन्यांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या पाठपुराव्याची गरज आहे

टॅग्स :bhandara-acभंडाराwater scarcityपाणी टंचाई