शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

असे कसे सरकार? जलसमृद्धीच्या वैभवाला बनवले 'मामा'

By ज्ञानेश्वर मुंदे | Updated: November 17, 2022 11:45 IST

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे सात हजार मामा तलाव

भंडारा : पूर्व विदर्भाचे वैभव ठरलेले माजी मालगुजारी तलाव अर्थात मामा तलाव आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एक एकरापासून ५० एकरापर्यंत क्षेत्र असलेल्या या तलावांचे तळे झाले आहे. काही तलाव तर नामशेष झाले आहेत. देखभाल दुरुस्ती आणि गाळ काढण्यासाठी तर दूरच, चार वर्षांपासून अतिक्रमण काढण्यासाठी साध्या मोजणीसाठीही निधी मिळाला नाही. परिणामी एकट्या भंडारा जिल्ह्यातील १,१५४ मामा तलाव अखेरची घटका मोजत आहे.

गोंड राजाच्या साम्राज्यात पूर्व विदर्भात ३५० वर्षांपूर्वी तलावांची निर्मिती करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या काळात हे तलाव जमीनदार अर्थात मालगुजारी करणाऱ्यांच्या ताब्यात गेले. त्यानंतर राज्य शासनाच्या अखत्यारीत आले. सध्या या तलावांवर जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे सात हजार मामा तलाव आहेत; मात्र या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात तुडुंब दिसणारे तलाव हिवाळा संपताच कोरडे पडायला लागतात. सिंचनाच्या उपयोगासाठी असलेले तलाव केवळ मत्स्यपालनाच्या उपयोगाचे झाले आहेत.

भंडारा जिल्ह्यात १,१५४ मामा तलाव आहेत. या तलावांची साठवण क्षमता ८७.२४ दशलक्ष घनमीटर असून २४ हजार ९२५ हेक्टर सिंचन क्षमता आहे. २०१८ पासून कोणताही निधी मिळाला नाही. सर्व तलाव गाळाने भरले आहेत. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी मोजणीची गरज आहे. निधीसाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने शासनाला प्रस्ताव पाठविला आहे; मात्र शासनस्तरावर त्याची दखलच झाली नाही.

पाच वर्षांपूर्वी १५० कोटींची तरतूद

दुरुस्ती, देखभाल व नूतनीकरणासाठी राज्य अर्थसंकल्पात २०१६-१७ च्या १५० कोटींची तरतूद केली होती. डिसेंबर २०१७ मध्ये टाटा कन्सल्टन्सीने पुनरुज्जीवनासाठी ३० कोटी रुपये दिले होते; मात्र तेव्हापासून या तलावाकडे कायमचे दुर्लक्ष होत आहे.

आधुनिक पद्धतीने सर्वेक्षणाची गरज

या तलावांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन करण्यासाठी अतिक्रमण काढण्याची गरज आहे; मात्र निधीअभावी जिल्हास्तरावरील यंत्रणा हतबल आहे. पूर्व विदर्भाचे वैभव टिकवायचे असल्यास सर्वेक्षण करून अतिक्रमण काढण्याची गरज आहे; मात्र कुणाचेही लक्ष नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पVidarbhaविदर्भzpजिल्हा परिषदagricultureशेतीWaterपाणी