शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

असे कसे सरकार? जलसमृद्धीच्या वैभवाला बनवले 'मामा'

By ज्ञानेश्वर मुंदे | Updated: November 17, 2022 11:45 IST

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे सात हजार मामा तलाव

भंडारा : पूर्व विदर्भाचे वैभव ठरलेले माजी मालगुजारी तलाव अर्थात मामा तलाव आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एक एकरापासून ५० एकरापर्यंत क्षेत्र असलेल्या या तलावांचे तळे झाले आहे. काही तलाव तर नामशेष झाले आहेत. देखभाल दुरुस्ती आणि गाळ काढण्यासाठी तर दूरच, चार वर्षांपासून अतिक्रमण काढण्यासाठी साध्या मोजणीसाठीही निधी मिळाला नाही. परिणामी एकट्या भंडारा जिल्ह्यातील १,१५४ मामा तलाव अखेरची घटका मोजत आहे.

गोंड राजाच्या साम्राज्यात पूर्व विदर्भात ३५० वर्षांपूर्वी तलावांची निर्मिती करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या काळात हे तलाव जमीनदार अर्थात मालगुजारी करणाऱ्यांच्या ताब्यात गेले. त्यानंतर राज्य शासनाच्या अखत्यारीत आले. सध्या या तलावांवर जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे सात हजार मामा तलाव आहेत; मात्र या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात तुडुंब दिसणारे तलाव हिवाळा संपताच कोरडे पडायला लागतात. सिंचनाच्या उपयोगासाठी असलेले तलाव केवळ मत्स्यपालनाच्या उपयोगाचे झाले आहेत.

भंडारा जिल्ह्यात १,१५४ मामा तलाव आहेत. या तलावांची साठवण क्षमता ८७.२४ दशलक्ष घनमीटर असून २४ हजार ९२५ हेक्टर सिंचन क्षमता आहे. २०१८ पासून कोणताही निधी मिळाला नाही. सर्व तलाव गाळाने भरले आहेत. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी मोजणीची गरज आहे. निधीसाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने शासनाला प्रस्ताव पाठविला आहे; मात्र शासनस्तरावर त्याची दखलच झाली नाही.

पाच वर्षांपूर्वी १५० कोटींची तरतूद

दुरुस्ती, देखभाल व नूतनीकरणासाठी राज्य अर्थसंकल्पात २०१६-१७ च्या १५० कोटींची तरतूद केली होती. डिसेंबर २०१७ मध्ये टाटा कन्सल्टन्सीने पुनरुज्जीवनासाठी ३० कोटी रुपये दिले होते; मात्र तेव्हापासून या तलावाकडे कायमचे दुर्लक्ष होत आहे.

आधुनिक पद्धतीने सर्वेक्षणाची गरज

या तलावांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन करण्यासाठी अतिक्रमण काढण्याची गरज आहे; मात्र निधीअभावी जिल्हास्तरावरील यंत्रणा हतबल आहे. पूर्व विदर्भाचे वैभव टिकवायचे असल्यास सर्वेक्षण करून अतिक्रमण काढण्याची गरज आहे; मात्र कुणाचेही लक्ष नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पVidarbhaविदर्भzpजिल्हा परिषदagricultureशेतीWaterपाणी