शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

असे कसे सरकार? जलसमृद्धीच्या वैभवाला बनवले 'मामा'

By ज्ञानेश्वर मुंदे | Updated: November 17, 2022 11:45 IST

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे सात हजार मामा तलाव

भंडारा : पूर्व विदर्भाचे वैभव ठरलेले माजी मालगुजारी तलाव अर्थात मामा तलाव आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एक एकरापासून ५० एकरापर्यंत क्षेत्र असलेल्या या तलावांचे तळे झाले आहे. काही तलाव तर नामशेष झाले आहेत. देखभाल दुरुस्ती आणि गाळ काढण्यासाठी तर दूरच, चार वर्षांपासून अतिक्रमण काढण्यासाठी साध्या मोजणीसाठीही निधी मिळाला नाही. परिणामी एकट्या भंडारा जिल्ह्यातील १,१५४ मामा तलाव अखेरची घटका मोजत आहे.

गोंड राजाच्या साम्राज्यात पूर्व विदर्भात ३५० वर्षांपूर्वी तलावांची निर्मिती करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या काळात हे तलाव जमीनदार अर्थात मालगुजारी करणाऱ्यांच्या ताब्यात गेले. त्यानंतर राज्य शासनाच्या अखत्यारीत आले. सध्या या तलावांवर जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे सात हजार मामा तलाव आहेत; मात्र या तलावांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात तुडुंब दिसणारे तलाव हिवाळा संपताच कोरडे पडायला लागतात. सिंचनाच्या उपयोगासाठी असलेले तलाव केवळ मत्स्यपालनाच्या उपयोगाचे झाले आहेत.

भंडारा जिल्ह्यात १,१५४ मामा तलाव आहेत. या तलावांची साठवण क्षमता ८७.२४ दशलक्ष घनमीटर असून २४ हजार ९२५ हेक्टर सिंचन क्षमता आहे. २०१८ पासून कोणताही निधी मिळाला नाही. सर्व तलाव गाळाने भरले आहेत. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी मोजणीची गरज आहे. निधीसाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने शासनाला प्रस्ताव पाठविला आहे; मात्र शासनस्तरावर त्याची दखलच झाली नाही.

पाच वर्षांपूर्वी १५० कोटींची तरतूद

दुरुस्ती, देखभाल व नूतनीकरणासाठी राज्य अर्थसंकल्पात २०१६-१७ च्या १५० कोटींची तरतूद केली होती. डिसेंबर २०१७ मध्ये टाटा कन्सल्टन्सीने पुनरुज्जीवनासाठी ३० कोटी रुपये दिले होते; मात्र तेव्हापासून या तलावाकडे कायमचे दुर्लक्ष होत आहे.

आधुनिक पद्धतीने सर्वेक्षणाची गरज

या तलावांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन करण्यासाठी अतिक्रमण काढण्याची गरज आहे; मात्र निधीअभावी जिल्हास्तरावरील यंत्रणा हतबल आहे. पूर्व विदर्भाचे वैभव टिकवायचे असल्यास सर्वेक्षण करून अतिक्रमण काढण्याची गरज आहे; मात्र कुणाचेही लक्ष नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पVidarbhaविदर्भzpजिल्हा परिषदagricultureशेतीWaterपाणी