शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

राज्यपालांनी जाणून घेतल्या जिल्ह्याच्या विकासविषयक अपेक्षा आणि संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:46 IST

विविध घटकांशी संवाद : सेवा-उद्योग क्षेत्राला बळकटी देण्याची व्यक्त केली गरज

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी भंडारा जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकासविषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन आणि प्रमुख उत्पादनाबाबत विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.

नियोजित दौऱ्यानुसार सकाळी १० वाजता राज्यपालांचे विश्रामगृहावर आगमन झाले. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी जिल्ह्यातील विविध योजनांचे सादरीकरण केले. या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यात जिल्ह्याच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक, भौगोलिक स्थितीबाबत, तसेच उद्योग व जिल्हा विकास आराखड्यानुसार विकासाच्या नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. 

राज्यपालांशी चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, वरिष्ठ पत्रकार, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी, उमेद व अंगणवाडी महिला प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त विपिन इटनकर, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपवनसंरक्षक राहुल गवई यासह वरिष्ठ विभागप्रमुख उपस्थित होते. शहापूर येथील हेलिपॅडवर प्रशासनाच्या वतीने राज्यपालांचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केले. 

टसर उद्योगाचे कौतुक जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या चळवळीविषयी, तसेच टसर, कोसा आणि अन्य रेशीम उत्पादनाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. पंतप्रधानांनी मन की बात'मध्ये या उपक्रमाचे कौतुक केल्याबद्दल त्यांनी महिला बचत गटाचे कौतुक केले. बचत गटांनी तयार केलेल्या साडीचेही त्यांनी अवलोकन करून त्यांच्या कार्याची प्रसंशा केली. 

मागासलेपणाची भावना ठेवू नका माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्यपाल म्हणाले, कोणत्याही जिल्ह्याने मागासलेपणाची भावना ठेवू नये. मनातून ती दूर करून विकासाच्या संधींमधून प्रगती साधायची आहे. राज्यात मुंबईचा विकास अधिक झाला आहे. मात्र, तेथून मिळणाऱ्या महसुलातूनच अन्य जिल्ह्यांतील विकासकामे होतात. त्यामधूनच राज्याचा एकत्रित विकास होतो. महाराष्ट्र माझ्यासाठी एकच घर आहे.

या मुद्यांवर झाली चर्चाराज्यपाल राधाकृष्णन यांच्या समोर प्रामुख्याने जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे आणि भविष्यात आवश्यक असलेल्या विकासकामांबाबत चर्चा झाली. यासोबतच, राष्ट्रीय महामार्गाची समस्या, वाहतुकीशी संबंधित बाबी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, गोसेखुर्द प्रकल्प- ग्रस्तांचे पुनर्वसन, वैद्यकीय महावि- द्यालय, वाळू उपसा, शैक्षणिक क्षेत्रातील समस्या आदी प्रमुख विषय मांडण्यात आले. उद्योग विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास, पारंपरिक उद्योगांना प्रोत्साहन, पर्यटन विकास, नाग नदीमुळे होणारे वैनगंगा नदीचे प्रदूषण, मत्स्य, झिंगा, लाख व शिंगाडा उत्पादन, भंडारा शहराचा रखडलेला ड्रोन सीटी सव्र्व्हे, दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन, धान रोवणी मजुरांचे वीज कोसळल्याने झालेले बळी, पवनीचा पर्यटन विकास आदी मांडलेले विषय राज्यपालांनी समजून घेतले. 

टॅग्स :bhandara-acभंडारा