शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

राज्यपालांनी जाणून घेतल्या जिल्ह्याच्या विकासविषयक अपेक्षा आणि संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:46 IST

विविध घटकांशी संवाद : सेवा-उद्योग क्षेत्राला बळकटी देण्याची व्यक्त केली गरज

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी भंडारा जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकासविषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन आणि प्रमुख उत्पादनाबाबत विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.

नियोजित दौऱ्यानुसार सकाळी १० वाजता राज्यपालांचे विश्रामगृहावर आगमन झाले. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी जिल्ह्यातील विविध योजनांचे सादरीकरण केले. या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यात जिल्ह्याच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक, भौगोलिक स्थितीबाबत, तसेच उद्योग व जिल्हा विकास आराखड्यानुसार विकासाच्या नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. 

राज्यपालांशी चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, वरिष्ठ पत्रकार, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी, उमेद व अंगणवाडी महिला प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त विपिन इटनकर, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपवनसंरक्षक राहुल गवई यासह वरिष्ठ विभागप्रमुख उपस्थित होते. शहापूर येथील हेलिपॅडवर प्रशासनाच्या वतीने राज्यपालांचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केले. 

टसर उद्योगाचे कौतुक जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या चळवळीविषयी, तसेच टसर, कोसा आणि अन्य रेशीम उत्पादनाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. पंतप्रधानांनी मन की बात'मध्ये या उपक्रमाचे कौतुक केल्याबद्दल त्यांनी महिला बचत गटाचे कौतुक केले. बचत गटांनी तयार केलेल्या साडीचेही त्यांनी अवलोकन करून त्यांच्या कार्याची प्रसंशा केली. 

मागासलेपणाची भावना ठेवू नका माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्यपाल म्हणाले, कोणत्याही जिल्ह्याने मागासलेपणाची भावना ठेवू नये. मनातून ती दूर करून विकासाच्या संधींमधून प्रगती साधायची आहे. राज्यात मुंबईचा विकास अधिक झाला आहे. मात्र, तेथून मिळणाऱ्या महसुलातूनच अन्य जिल्ह्यांतील विकासकामे होतात. त्यामधूनच राज्याचा एकत्रित विकास होतो. महाराष्ट्र माझ्यासाठी एकच घर आहे.

या मुद्यांवर झाली चर्चाराज्यपाल राधाकृष्णन यांच्या समोर प्रामुख्याने जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे आणि भविष्यात आवश्यक असलेल्या विकासकामांबाबत चर्चा झाली. यासोबतच, राष्ट्रीय महामार्गाची समस्या, वाहतुकीशी संबंधित बाबी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, गोसेखुर्द प्रकल्प- ग्रस्तांचे पुनर्वसन, वैद्यकीय महावि- द्यालय, वाळू उपसा, शैक्षणिक क्षेत्रातील समस्या आदी प्रमुख विषय मांडण्यात आले. उद्योग विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास, पारंपरिक उद्योगांना प्रोत्साहन, पर्यटन विकास, नाग नदीमुळे होणारे वैनगंगा नदीचे प्रदूषण, मत्स्य, झिंगा, लाख व शिंगाडा उत्पादन, भंडारा शहराचा रखडलेला ड्रोन सीटी सव्र्व्हे, दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन, धान रोवणी मजुरांचे वीज कोसळल्याने झालेले बळी, पवनीचा पर्यटन विकास आदी मांडलेले विषय राज्यपालांनी समजून घेतले. 

टॅग्स :bhandara-acभंडारा