शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुरात पीक उद्ध्वस्त, नुकसानीमुळे नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने संपवलं जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2022 13:40 IST

लाखांदूर तालुक्यातील घटना, आंब्याच्या झाडाला दोर बांधून घेतला गळफास

लाखांदूर (भंडारा) : अतिवृष्टीने सलग तीनदा पुराचा फटका बसून शेतातील पीक उद्ध्वस्त झाल्याने नैराश्यातून एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथे सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

गोविंदराव महादेव दाणी (वय ६७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे किन्ही गुंजेपार शिवारात सहा एकर शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी धानासह इतर पिकांची लागवड केली होती. मागील जुलै व ऑगस्ट महिन्यांत तालुक्यातील पावसाने तब्बल तीनदा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. गोविंदराव यांच्या शेतातील पीक तीनदा पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले होते.

हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याने ते विवंचनेत होते. सोमवारी पहाटे घरातील मंडळी झोपेत असताना ते आपल्या शेतात पोहोचले. तेथे आंब्याच्या झाडाला नायलॉन दोर बांधून गळफास घेतला. सकाळी त्यांचा मुलगा शेतात गेला असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली. पोलीस हवालदार दिलीप भोयर व अंमलदार अनिल राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूbhandara-acभंडारा