शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:44 IST

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : संसाधनांच्या बाबतीत विपुल समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात मागील काही दशकांपेक्षा आमागी वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे कधी नव्हे त्या जवळपास जिल्ह्यातील ६५३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची निवारणार्थ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत, असे म्हटल्यास ...

ठळक मुद्दे६५३ गावांमध्ये होणार पाणीटंचाईची कामे : कमी पर्जन्यमानाचा फटका

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : संसाधनांच्या बाबतीत विपुल समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात मागील काही दशकांपेक्षा आमागी वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे कधी नव्हे त्या जवळपास जिल्ह्यातील ६५३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची निवारणार्थ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला भंडारा जिल्हा आज दुसऱ्या क्रमाकांवर पोहचलेला आहे. माजी मालगुजारी तलावांसह अन्य तलावांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष, पाण्याची नासाडी व जल पुर्नभरणाच्या कामांकडे सातत्त्याने दुर्लक्ष होत गेले. दुसरीकडे वातावरणातील बदल, परिणामी निसर्गचक्र बदलल्यामुळे जिल्ह्यात पावसाने सरासरीही गाठलेली नाही. परिणामी जिल्हा प्रशसानाने संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना तीन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केल्या आहेत.दोन टप्प्यात होणार कामेजिल्हा हा टँकरमुक्त असल्याने टँकर बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. सदर नियोजनांतर्गत पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या मध्ये ७८ लक्ष ७३ हजारांचा खर्च पाणीटंचाईच्या निवारणार्थ खर्च केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे पहिला टप्पा डिसेंबर महिन्यातच संपणार आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ बृहत आराखड्यानुसार २६४ गावांमध्ये कामे केली जाणार आहेत.१ कोटी १२ लाखांचा खर्चसंभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ जानेवारी ते जून या दोन टप्प्यांतर्गत ६५३ गावांमध्ये कामे केली जाणार आहेत. यात विहिरी खोल करणे, गाळ उपसणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, नळयोजनेची दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे आदी कामांचा समावेश आहे. यासाठी १ कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

यावर्षी कमी पर्जन्यमान बरसल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता यावर्षी जलपुनर्रभरणाकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वात प्रथम पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यावर जिल्हा प्रशासनाचा उद्देश आहे. त्यानंतर शेतीव्यवसायासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. रोहयोच्या माध्यमातूनही जलस्त्रोत निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.-मनिषा दांडगे,उपजिल्हाधिकारी, रोहयो, भंडारा.