शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:44 IST

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : संसाधनांच्या बाबतीत विपुल समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात मागील काही दशकांपेक्षा आमागी वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे कधी नव्हे त्या जवळपास जिल्ह्यातील ६५३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची निवारणार्थ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत, असे म्हटल्यास ...

ठळक मुद्दे६५३ गावांमध्ये होणार पाणीटंचाईची कामे : कमी पर्जन्यमानाचा फटका

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : संसाधनांच्या बाबतीत विपुल समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात मागील काही दशकांपेक्षा आमागी वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे कधी नव्हे त्या जवळपास जिल्ह्यातील ६५३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची निवारणार्थ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला भंडारा जिल्हा आज दुसऱ्या क्रमाकांवर पोहचलेला आहे. माजी मालगुजारी तलावांसह अन्य तलावांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष, पाण्याची नासाडी व जल पुर्नभरणाच्या कामांकडे सातत्त्याने दुर्लक्ष होत गेले. दुसरीकडे वातावरणातील बदल, परिणामी निसर्गचक्र बदलल्यामुळे जिल्ह्यात पावसाने सरासरीही गाठलेली नाही. परिणामी जिल्हा प्रशसानाने संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना तीन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केल्या आहेत.दोन टप्प्यात होणार कामेजिल्हा हा टँकरमुक्त असल्याने टँकर बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. सदर नियोजनांतर्गत पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या मध्ये ७८ लक्ष ७३ हजारांचा खर्च पाणीटंचाईच्या निवारणार्थ खर्च केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे पहिला टप्पा डिसेंबर महिन्यातच संपणार आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ बृहत आराखड्यानुसार २६४ गावांमध्ये कामे केली जाणार आहेत.१ कोटी १२ लाखांचा खर्चसंभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ जानेवारी ते जून या दोन टप्प्यांतर्गत ६५३ गावांमध्ये कामे केली जाणार आहेत. यात विहिरी खोल करणे, गाळ उपसणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, नळयोजनेची दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे आदी कामांचा समावेश आहे. यासाठी १ कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

यावर्षी कमी पर्जन्यमान बरसल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता यावर्षी जलपुनर्रभरणाकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वात प्रथम पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यावर जिल्हा प्रशासनाचा उद्देश आहे. त्यानंतर शेतीव्यवसायासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. रोहयोच्या माध्यमातूनही जलस्त्रोत निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.-मनिषा दांडगे,उपजिल्हाधिकारी, रोहयो, भंडारा.