शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:44 IST

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : संसाधनांच्या बाबतीत विपुल समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात मागील काही दशकांपेक्षा आमागी वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे कधी नव्हे त्या जवळपास जिल्ह्यातील ६५३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची निवारणार्थ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत, असे म्हटल्यास ...

ठळक मुद्दे६५३ गावांमध्ये होणार पाणीटंचाईची कामे : कमी पर्जन्यमानाचा फटका

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : संसाधनांच्या बाबतीत विपुल समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात मागील काही दशकांपेक्षा आमागी वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे कधी नव्हे त्या जवळपास जिल्ह्यातील ६५३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची निवारणार्थ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला भंडारा जिल्हा आज दुसऱ्या क्रमाकांवर पोहचलेला आहे. माजी मालगुजारी तलावांसह अन्य तलावांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष, पाण्याची नासाडी व जल पुर्नभरणाच्या कामांकडे सातत्त्याने दुर्लक्ष होत गेले. दुसरीकडे वातावरणातील बदल, परिणामी निसर्गचक्र बदलल्यामुळे जिल्ह्यात पावसाने सरासरीही गाठलेली नाही. परिणामी जिल्हा प्रशसानाने संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना तीन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केल्या आहेत.दोन टप्प्यात होणार कामेजिल्हा हा टँकरमुक्त असल्याने टँकर बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. सदर नियोजनांतर्गत पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या मध्ये ७८ लक्ष ७३ हजारांचा खर्च पाणीटंचाईच्या निवारणार्थ खर्च केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे पहिला टप्पा डिसेंबर महिन्यातच संपणार आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ बृहत आराखड्यानुसार २६४ गावांमध्ये कामे केली जाणार आहेत.१ कोटी १२ लाखांचा खर्चसंभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ जानेवारी ते जून या दोन टप्प्यांतर्गत ६५३ गावांमध्ये कामे केली जाणार आहेत. यात विहिरी खोल करणे, गाळ उपसणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, नळयोजनेची दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे आदी कामांचा समावेश आहे. यासाठी १ कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

यावर्षी कमी पर्जन्यमान बरसल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता यावर्षी जलपुनर्रभरणाकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वात प्रथम पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यावर जिल्हा प्रशासनाचा उद्देश आहे. त्यानंतर शेतीव्यवसायासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. रोहयोच्या माध्यमातूनही जलस्त्रोत निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.-मनिषा दांडगे,उपजिल्हाधिकारी, रोहयो, भंडारा.