शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

गाळमुक्त तलाव योजनेचा लाभ घ्या

By admin | Updated: June 1, 2017 00:33 IST

तलावातील गाळ काढून तलाव खोल करणे व तलावाची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाने गाळमुक्त तलाव व गाळमुक्त शिवार ही अभिनव योजना अमलात आणली.

तहसीलदारांचे आवाहन : दोन दिवसात मिळणार परवानगी लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तलावातील गाळ काढून तलाव खोल करणे व तलावाची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाने गाळमुक्त तलाव व गाळमुक्त शिवार ही अभिनव योजना अमलात आणली. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन साकोली येथे नव्याने रूजू झालेले तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले.भंडारा व गोंदिया जिल्हा तलावांचा व भाताचे जिल्हे म्हणून नावलौकीकाला आहेत. या दोन्ही जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वीच्या काळी या तलावातील पाण्याने हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होत होती. कालांतराने तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात साचली.त्याचा उपसाच करण्यात आला नाही. त्यामुळे या तलावाची सिंचन क्षमता कमी झाली. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडूनही तलावात वर्षभर पुरेल एवढे पाणी साचत नाही. त्यामुळे सिंचनासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही अडचण निर्माण होते. वर्षानुवर्षे शेतात पिक घेतल्याने व रासायनिक खतांचा वारंवार उपयोग केल्याने जमिनीची पोत घसरली आहे. त्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे जमिनीत तलावाची गाळ टाकणे पर्यायी सोय होऊ शकते. यासाठी शासनातर्फे गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार ही योजना अस्तित्वात आणली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तलावातील गाळ आपल्या शेतात टाकण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी किंवा तहसीलदार यांना अर्ज सादर करावयाचा आहे. परवानगी मिळताच ट्रॅक्टर किंवा इतर वाहनाच्या सहाय्याने स्व:खर्चाने तलावातील गाळ आपल्या शेतात टाकायचे आहे. यासाठी कुठलाही खर्च तहसील विभागात भरायचा नाही. शेतकऱ्यांनी गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार हिंगे यांनी केले आहे.