शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

पालकमंत्र्यांकडून एकाच बैठकीत ३२ समस्या निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारला घेतलेल्या आढावा बैठकीत नागरिकांच्या विविध ३२ समस्या निकाली काढून राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना न्याय दिला आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : कृषीपंपासाठी वीज देण्याचा तातडीने निर्णय घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारला घेतलेल्या आढावा बैठकीत नागरिकांच्या विविध ३२ समस्या निकाली काढून राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना न्याय दिला आहे.यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मंजुषा ठवकर, अधिक्षक उत्पादन शुल्क ज्ञानेश्वरी आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते.ग्रामपंचायत परिचर पदभरती चौकशी, विविध आवास योजनांची अंमलबजावणी, कामबंद आंदोलन, समाजशास्त्र तज्ज्ञ या पदावर नियुक्ती, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती पट्टे मिळणे, वन जमीनीवरील अतिक्रमण, दिव्यांग व्यक्ती प्लाट, लघु कालव्यात गेलेल्या जमीनीचा मोबदला मिळणे, रुग्णवाहिका चालकांना न्याय मिळवून देणे, पिण्याचे पाणी व सिंचनासाठी सोय, व्याघ्र प्रकल्प बांधित शेतकऱ्यांना शेत जमीन मोबदला, जिल्हा क्षयरोग केंद्र येथे क्ष-किरण यंत्र पुरविणे, समाज मंदिर बांधकाम, मानसेवी होमगार्ड समादेशक रिक्त पद भरणे यासह अनेक समस्या नागरिकांनी या बैठकीत पालकमंत्र्याकडे लेखी स्वरुपात दाखल केल्या होत्या. या समस्यांचा निपटारा त्यांनी केला.जिल्हा क्षयरोग केंद्रात विशेष बाब म्हणून क्ष-किरण यंत्र पुरविण्याची मागणी यावेळी करण्यात आली असता खनिकर्म विकास निधीतून तात्काळ १५ लाख रुपये मंजूर करुन विशेष बाब म्हणून क्ष-किरण यंत्र खरेदी करण्याचे निर्देश ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोग्य विभागाला दिले. बावनथडी प्रकल्पाचे पाणी धर्मापुरी मायनरला मिळत नसल्याबाबत तक्रार आली असता शनिवारपर्यंत कॅनलचे पूर्ण काम करण्याबाबतचे निर्देश दिले.पुढील आठवडयात या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा तालुक्यातील धारगाव क्षेत्रातील शेती सिंचनासाठी विशेष योजना तयार करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.भंडारा जिल्ह्याातील शेतकºयांना दिवसा ९ ते ५ यावेळेत कृषिपंपासाठी वीज देण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असून यासंबंधीचा अहवाल वीज विभागाने पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. पवनी-करांडला व्याघ्र प्रकल्प बाधित शेतकºयांच्या उर्वरित शेतजमीनीचा मोबदला देण्याबाबतचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत वन विभागाने पाठवावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.