शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

पालकमंत्र्यांकडून एकाच बैठकीत ३२ समस्या निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारला घेतलेल्या आढावा बैठकीत नागरिकांच्या विविध ३२ समस्या निकाली काढून राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना न्याय दिला आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : कृषीपंपासाठी वीज देण्याचा तातडीने निर्णय घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारला घेतलेल्या आढावा बैठकीत नागरिकांच्या विविध ३२ समस्या निकाली काढून राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना न्याय दिला आहे.यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मंजुषा ठवकर, अधिक्षक उत्पादन शुल्क ज्ञानेश्वरी आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते.ग्रामपंचायत परिचर पदभरती चौकशी, विविध आवास योजनांची अंमलबजावणी, कामबंद आंदोलन, समाजशास्त्र तज्ज्ञ या पदावर नियुक्ती, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती पट्टे मिळणे, वन जमीनीवरील अतिक्रमण, दिव्यांग व्यक्ती प्लाट, लघु कालव्यात गेलेल्या जमीनीचा मोबदला मिळणे, रुग्णवाहिका चालकांना न्याय मिळवून देणे, पिण्याचे पाणी व सिंचनासाठी सोय, व्याघ्र प्रकल्प बांधित शेतकऱ्यांना शेत जमीन मोबदला, जिल्हा क्षयरोग केंद्र येथे क्ष-किरण यंत्र पुरविणे, समाज मंदिर बांधकाम, मानसेवी होमगार्ड समादेशक रिक्त पद भरणे यासह अनेक समस्या नागरिकांनी या बैठकीत पालकमंत्र्याकडे लेखी स्वरुपात दाखल केल्या होत्या. या समस्यांचा निपटारा त्यांनी केला.जिल्हा क्षयरोग केंद्रात विशेष बाब म्हणून क्ष-किरण यंत्र पुरविण्याची मागणी यावेळी करण्यात आली असता खनिकर्म विकास निधीतून तात्काळ १५ लाख रुपये मंजूर करुन विशेष बाब म्हणून क्ष-किरण यंत्र खरेदी करण्याचे निर्देश ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोग्य विभागाला दिले. बावनथडी प्रकल्पाचे पाणी धर्मापुरी मायनरला मिळत नसल्याबाबत तक्रार आली असता शनिवारपर्यंत कॅनलचे पूर्ण काम करण्याबाबतचे निर्देश दिले.पुढील आठवडयात या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा तालुक्यातील धारगाव क्षेत्रातील शेती सिंचनासाठी विशेष योजना तयार करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.भंडारा जिल्ह्याातील शेतकºयांना दिवसा ९ ते ५ यावेळेत कृषिपंपासाठी वीज देण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असून यासंबंधीचा अहवाल वीज विभागाने पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. पवनी-करांडला व्याघ्र प्रकल्प बाधित शेतकºयांच्या उर्वरित शेतजमीनीचा मोबदला देण्याबाबतचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत वन विभागाने पाठवावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.