पूर स्थितीवर यंत्रणांनी लक्ष ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:51+5:30

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, तहसीलदार अक्षय पोयाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास,भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, करसहाय्यक अधिकारी कपाटे, पोलिस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते.

The system should monitor the flood situation | पूर स्थितीवर यंत्रणांनी लक्ष ठेवावे

पूर स्थितीवर यंत्रणांनी लक्ष ठेवावे

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : पूरपरिस्थितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संततधार पावसामुळे मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भंडारा येथील कारधा पुलावरून पाण्याचा प्रवाह वेगात सुरू झाल्याने वैनगंगेला आलेल्या पूरपस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवार ९ सप्टेंबरला सकाळी कारधा पुलाला भेट दिली. यावेळी वैनंगगा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देत जिल्हयातील पुरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, तहसीलदार अक्षय पोयाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास,भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, करसहाय्यक अधिकारी कपाटे, पोलिस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते. संजय सरोवराचे १० दरवाजे १.८० मीटरने सोडण्यात आल्याने ७५.४०० क्यूसेस पाण्याच विसर्ग होत असून यामुळे वैनगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झालेली आहे.
भंडारा शहराला लागून असलेल्या कारधा नदीच्या पुलावरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू झालेला आहे. यामुळे नदीकाठांवरील गावांना धोका निर्माण झाला आहे. या पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी भेट दिली. यावेळी पुलावरून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग व पुरस्थितीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी पांचाळ यांनी पुरस्थितीची माहिती दिली. वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून यंत्रणांनी सज्ज राहावे असे निर्देश यावेळी दिले.

मदतीसाठी प्रशासनाला दिले निर्देश
वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बाधित होवून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो याकरिता नगर पालिका प्रशासनाने सज्ज राहावे. नागरिकांना पिण्यायोग्य शुध्द पाणी उपलब्ध करावे असे निर्देश मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना दिले. सोबत शहरातील पुरग्रस्त भागात वैनगंगा नदीचे पाणी शिरकाव झाल्यास येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.कारधा पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून नागरिकांना नदीपासून जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

Web Title: The system should monitor the flood situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर